शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायती होणार आॅनलाइन

By admin | Updated: August 21, 2015 02:20 IST

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून भारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून आॅप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे

खालापूर : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून भारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून आॅप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉड बॅन्ड इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार आधुनिक होणार असून कारभारात अधिक पारदर्शकता येणार आहे. खालापूर तालुक्यात ग्रामपंचायतींना कनेक्शन देण्यासाठीचे काम सुरू करण्यात आले असून यासाठी लागणारी केबल टाकताना स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल यांनी केले आहे.राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार आॅनलाइन करून ग्रामपंचायती थेट पंचायत समिती, जिल्हा परिषद व राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाशी जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कामात पारदर्शकता येणार असून ग्रामस्थांना रेकॉर्ड पाहता येणार आहे. विविध प्रकारचे दाखलेही ग्रामस्थांना वेळेत मिळतील. त्या दृष्टीने सध्या ग्रामपंचायतींना इंटरनेटचे कनेक्शन देण्याची तयारी सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील जनतेला सार्वजनिक सेवा ग्रामपंचायतीद्वारे आॅप्टीकल फायबरच्या माध्यमातून ब्रॉड बॅन्डद्वारे पुरवण्यात येणार आहे. खालापूर तालुक्यात त्यासाठी केबल टाकण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. ही केबल टाकताना स्थानिकांच्या जमिनीचा वापर करावा लागणार असल्याने स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अशा प्रकारे ग्रामपंचायती आॅनलाइन झाल्यानंतर ग्रामसेवक व कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताणही कमी होईल, शिवाय आॅनलाइन पद्धतीमुळे गैरव्यवहारांनाही पायबंद घालता येणार आहे. (वार्ताहर)