शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ग्रामपंचायती होणार आॅनलाइन

By admin | Updated: August 21, 2015 02:20 IST

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून भारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून आॅप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे

खालापूर : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून भारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून आॅप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉड बॅन्ड इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार आधुनिक होणार असून कारभारात अधिक पारदर्शकता येणार आहे. खालापूर तालुक्यात ग्रामपंचायतींना कनेक्शन देण्यासाठीचे काम सुरू करण्यात आले असून यासाठी लागणारी केबल टाकताना स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल यांनी केले आहे.राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार आॅनलाइन करून ग्रामपंचायती थेट पंचायत समिती, जिल्हा परिषद व राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाशी जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कामात पारदर्शकता येणार असून ग्रामस्थांना रेकॉर्ड पाहता येणार आहे. विविध प्रकारचे दाखलेही ग्रामस्थांना वेळेत मिळतील. त्या दृष्टीने सध्या ग्रामपंचायतींना इंटरनेटचे कनेक्शन देण्याची तयारी सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील जनतेला सार्वजनिक सेवा ग्रामपंचायतीद्वारे आॅप्टीकल फायबरच्या माध्यमातून ब्रॉड बॅन्डद्वारे पुरवण्यात येणार आहे. खालापूर तालुक्यात त्यासाठी केबल टाकण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. ही केबल टाकताना स्थानिकांच्या जमिनीचा वापर करावा लागणार असल्याने स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अशा प्रकारे ग्रामपंचायती आॅनलाइन झाल्यानंतर ग्रामसेवक व कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताणही कमी होईल, शिवाय आॅनलाइन पद्धतीमुळे गैरव्यवहारांनाही पायबंद घालता येणार आहे. (वार्ताहर)