शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

ग्रामपंचायत संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात, सहा ते सात महिने पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 03:08 IST

संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींत काम करणारे आणि डिजिटल महाराष्ट्र घडविण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे सुमारे २२ हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत.

म्हसळा -  संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींत काम करणारे आणि डिजिटल महाराष्ट्र घडविण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे सुमारे २२ हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत. २०१६ पासून याच संगणक परिचालकांची ‘आपले सरकार सेवा’ केंद्रांतर्गत नव्याने नियुक्ती करून, त्यांना केंद्रचालक हे पद देऊन आॅनलाइन कामे करून घेतली जात आहेत. मात्र, दोन वर्षांपासून परिचालकांवर अन्याय होत आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संगणक परिचालकांना मानधन मिळाले नसल्याने त्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.एकीकडे, ‘आपले सरकार सेवा’च्या नावाखाली वेगवेगळ्या मार्गाने पैसे उकळण्यात येत असल्याने केंद्र शासनाची सीएससी-एसपीव्ही ही कंपनीच ग्रामपंचायतींच्या पैशांवर डल्ला मारतेय, अशीही परिस्थिती निर्माण झाली आहे.शासनाने सर्व संगणक परिचालकांचे पद निश्चित करून, माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळाकडून नियुक्ती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेकडून करण्यात येत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवून शासनाने संगणक परिचालकांना न्याय द्यावा, अशी विनंती राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे. संगणक परिचालकांना (केंद्र चालकांना) एकूण रकमेपैकी मानधन म्हणून फक्त ६०००/- प्रतिमाह देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ते देण्यात न आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.वेळेत मानधन न होण्याची काही कारणे आहेत, त्यापैकी हजेरी न लावणे, इन्व्हाइस क्लेम न करणे, अशी काही कारणे आहेत. आता पेमेंट सिस्टीममध्ये बदल करण्यात आला आहे. नुकतेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखाधिकारी यांच्या सहीने सीएससी कंपनीच्या खात्यात एक कोटी २० लाख रु पये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी सर्व संगणक परिचालकांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा होईल.- जयेश म्हात्रे, जिल्हा व्यवस्थापक, रायगड, आपले सरकार सेवा केंद्रआपले सरकार सेवा केंद्राच्या नावाखाली सरकार आणि कंपनी अक्षरश: जनतेची फसवणूक करीत आहेत. तर आॅनलाइनची कामे करणारे संगणक परिचालक उपाशी असल्याची परिस्थिती आहे. १४ वा वित्त आयोग निधीतून ‘आपले सरकार सेवा’च्या नावाखाली ग्रामपंचायतीकडून आगाऊ रक्कम घेतली जात आहे, मग या परिचालकांना वेळेत मानधन का मिळत नाही, हा प्रश्न आहे.- किशोर काजारे, सरपंच,वळके, ता. मुरु डग्रामपंचायतींचा भरमसाठ पैसा खर्च केला जात आहे आणि त्या बदल्यात कंपनीने ज्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत गावातील नागरिकांना दिल्या पाहिजेत, त्या सेवा प्रकल्प सुरू होऊन दोन वर्षे होत आली तरी योग्य पद्धतीने सुरू झालेल्या नाहीत, याचा अर्थ शासनाच्या ‘आपले सरकार सेवा’ केंद्र या प्रकल्पाचा बोजवारा उडाला आहे.- मयूर कांबळे,राज्य सचिव तथा जिल्हाध्यक्ष

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत