शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात, सहा ते सात महिने पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 03:08 IST

संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींत काम करणारे आणि डिजिटल महाराष्ट्र घडविण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे सुमारे २२ हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत.

म्हसळा -  संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींत काम करणारे आणि डिजिटल महाराष्ट्र घडविण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे सुमारे २२ हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत. २०१६ पासून याच संगणक परिचालकांची ‘आपले सरकार सेवा’ केंद्रांतर्गत नव्याने नियुक्ती करून, त्यांना केंद्रचालक हे पद देऊन आॅनलाइन कामे करून घेतली जात आहेत. मात्र, दोन वर्षांपासून परिचालकांवर अन्याय होत आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संगणक परिचालकांना मानधन मिळाले नसल्याने त्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.एकीकडे, ‘आपले सरकार सेवा’च्या नावाखाली वेगवेगळ्या मार्गाने पैसे उकळण्यात येत असल्याने केंद्र शासनाची सीएससी-एसपीव्ही ही कंपनीच ग्रामपंचायतींच्या पैशांवर डल्ला मारतेय, अशीही परिस्थिती निर्माण झाली आहे.शासनाने सर्व संगणक परिचालकांचे पद निश्चित करून, माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळाकडून नियुक्ती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेकडून करण्यात येत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवून शासनाने संगणक परिचालकांना न्याय द्यावा, अशी विनंती राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे. संगणक परिचालकांना (केंद्र चालकांना) एकूण रकमेपैकी मानधन म्हणून फक्त ६०००/- प्रतिमाह देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ते देण्यात न आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.वेळेत मानधन न होण्याची काही कारणे आहेत, त्यापैकी हजेरी न लावणे, इन्व्हाइस क्लेम न करणे, अशी काही कारणे आहेत. आता पेमेंट सिस्टीममध्ये बदल करण्यात आला आहे. नुकतेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखाधिकारी यांच्या सहीने सीएससी कंपनीच्या खात्यात एक कोटी २० लाख रु पये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी सर्व संगणक परिचालकांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा होईल.- जयेश म्हात्रे, जिल्हा व्यवस्थापक, रायगड, आपले सरकार सेवा केंद्रआपले सरकार सेवा केंद्राच्या नावाखाली सरकार आणि कंपनी अक्षरश: जनतेची फसवणूक करीत आहेत. तर आॅनलाइनची कामे करणारे संगणक परिचालक उपाशी असल्याची परिस्थिती आहे. १४ वा वित्त आयोग निधीतून ‘आपले सरकार सेवा’च्या नावाखाली ग्रामपंचायतीकडून आगाऊ रक्कम घेतली जात आहे, मग या परिचालकांना वेळेत मानधन का मिळत नाही, हा प्रश्न आहे.- किशोर काजारे, सरपंच,वळके, ता. मुरु डग्रामपंचायतींचा भरमसाठ पैसा खर्च केला जात आहे आणि त्या बदल्यात कंपनीने ज्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत गावातील नागरिकांना दिल्या पाहिजेत, त्या सेवा प्रकल्प सुरू होऊन दोन वर्षे होत आली तरी योग्य पद्धतीने सुरू झालेल्या नाहीत, याचा अर्थ शासनाच्या ‘आपले सरकार सेवा’ केंद्र या प्रकल्पाचा बोजवारा उडाला आहे.- मयूर कांबळे,राज्य सचिव तथा जिल्हाध्यक्ष

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत