शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
4
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
5
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
6
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
7
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
8
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
9
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
10
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
11
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
12
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
13
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
14
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
15
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
16
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
17
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
18
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
19
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
20
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

ग्रामपंचायत संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात, सहा ते सात महिने पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 03:08 IST

संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींत काम करणारे आणि डिजिटल महाराष्ट्र घडविण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे सुमारे २२ हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत.

म्हसळा -  संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींत काम करणारे आणि डिजिटल महाराष्ट्र घडविण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे सुमारे २२ हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत. २०१६ पासून याच संगणक परिचालकांची ‘आपले सरकार सेवा’ केंद्रांतर्गत नव्याने नियुक्ती करून, त्यांना केंद्रचालक हे पद देऊन आॅनलाइन कामे करून घेतली जात आहेत. मात्र, दोन वर्षांपासून परिचालकांवर अन्याय होत आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संगणक परिचालकांना मानधन मिळाले नसल्याने त्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.एकीकडे, ‘आपले सरकार सेवा’च्या नावाखाली वेगवेगळ्या मार्गाने पैसे उकळण्यात येत असल्याने केंद्र शासनाची सीएससी-एसपीव्ही ही कंपनीच ग्रामपंचायतींच्या पैशांवर डल्ला मारतेय, अशीही परिस्थिती निर्माण झाली आहे.शासनाने सर्व संगणक परिचालकांचे पद निश्चित करून, माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळाकडून नियुक्ती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेकडून करण्यात येत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवून शासनाने संगणक परिचालकांना न्याय द्यावा, अशी विनंती राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे. संगणक परिचालकांना (केंद्र चालकांना) एकूण रकमेपैकी मानधन म्हणून फक्त ६०००/- प्रतिमाह देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ते देण्यात न आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.वेळेत मानधन न होण्याची काही कारणे आहेत, त्यापैकी हजेरी न लावणे, इन्व्हाइस क्लेम न करणे, अशी काही कारणे आहेत. आता पेमेंट सिस्टीममध्ये बदल करण्यात आला आहे. नुकतेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखाधिकारी यांच्या सहीने सीएससी कंपनीच्या खात्यात एक कोटी २० लाख रु पये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी सर्व संगणक परिचालकांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा होईल.- जयेश म्हात्रे, जिल्हा व्यवस्थापक, रायगड, आपले सरकार सेवा केंद्रआपले सरकार सेवा केंद्राच्या नावाखाली सरकार आणि कंपनी अक्षरश: जनतेची फसवणूक करीत आहेत. तर आॅनलाइनची कामे करणारे संगणक परिचालक उपाशी असल्याची परिस्थिती आहे. १४ वा वित्त आयोग निधीतून ‘आपले सरकार सेवा’च्या नावाखाली ग्रामपंचायतीकडून आगाऊ रक्कम घेतली जात आहे, मग या परिचालकांना वेळेत मानधन का मिळत नाही, हा प्रश्न आहे.- किशोर काजारे, सरपंच,वळके, ता. मुरु डग्रामपंचायतींचा भरमसाठ पैसा खर्च केला जात आहे आणि त्या बदल्यात कंपनीने ज्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत गावातील नागरिकांना दिल्या पाहिजेत, त्या सेवा प्रकल्प सुरू होऊन दोन वर्षे होत आली तरी योग्य पद्धतीने सुरू झालेल्या नाहीत, याचा अर्थ शासनाच्या ‘आपले सरकार सेवा’ केंद्र या प्रकल्पाचा बोजवारा उडाला आहे.- मयूर कांबळे,राज्य सचिव तथा जिल्हाध्यक्ष

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत