शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

सरकार दरबारी हुतात्मा उपेक्षितच

By admin | Updated: July 12, 2015 22:36 IST

अवघे २२ वर्षांचे कोवळे वय, जिगर मात्र भारतमातेच्या सुपुत्रासारखीच...१ आॅगस्ट १९९८ साली जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला सीमेवर रक्षणासाठी तो तैनात होता..

आविष्कार देसाई, अलिबागअवघे २२ वर्षांचे कोवळे वय, जिगर मात्र भारतमातेच्या सुपुत्रासारखीच...१ आॅगस्ट १९९८ साली जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला सीमेवर रक्षणासाठी तो तैनात होता... त्याचवेळी सीमेपलीकडून पाक सैनिकांचा बेछूट गोळीबार सुुरू होतो आणि प्रत्युत्तर करीत असतानाच शत्रूच्या बंदुकीची गोळी त्याचा काळजाचा ठाव घेते... तो धारातीर्थी पडतो... भारतमाता की जय....असे स्वर आळवतो आणि गतप्राण होतो. ही कहाणी आहे अलिबागचा सुपुत्र नीलेश नारायण तुणतुणे याची.नीलेशच्या परिवाराला सरकारने जमीन देण्याचे कबूल केले होते, मात्र १७ वर्षांनंतर आजही हा हुतात्मा सरकार दरबारी उपेक्षितच राहिला आहे. नीलेशचे वडील नारायण रामभाऊ तुणतुणे यांना तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जमिनीचा तुकडा देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नारायण तुणतुणे यांनी १६ जून १९९८ साली कागदी सोपस्कार पूर्णही केले. अलिबाग तालुक्यातील मौजे भादाणे येथील जमिनीचा तुकडा लागवडीसाठी द्यावा, अशी मागणी तुणतुणे यांनी केली आहे. देशपांडे यांनी जलदगतीने तुणतुणे यांची फाईल मार्गी लावण्याचे आटोकाट प्रयत्न केले. त्यांची बदली झाल्यानंतर येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनीही तुणतुणे यांचे काम लवकर व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता. ही फाईल सरकार दरबारी मंजुरीसाठी गेली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. तब्बल १७ वर्षे झाली आहेत, तरी अद्याप जमिनीचा तुकडा देण्यात प्रशासन अथवा सरकार यशस्वी झालेले नाही. याचे नेमके कारण काय? असा प्रशन आहे.ज्याने देशासाठी रक्त सांडले आपल्या प्राणाचे बलिदान दिले याचे सोयरसुतक सरकारला नाही. खरेच प्रशासनाला आणि सरकारला नीलेशच्या बलिदानाची कदर असती, तर आज नीलेशच्या वडिलांनी मागणी केलेल्या जमिनीचा तुकडा त्यांना कधीच बहाल केला असता. आमचे प्रकरण सरकार दरबारी पोचले असेल, तर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे, आम्ही त्यांच्याकडे काही मागितले नव्हते, त्यांनीच जमीन देतो असे सांगितले होते. आम्हीही पाठपुरावा करतो आहोत मात्र यश आलेले नाही, अशी खंत नीलेशचे वडील नारायण तुणतुणे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.दरम्यान, १ आॅगस्ट हा नीलेशचा शहीद दिवस आहे. खानाव ग्रामपंचायत हद्दीत उभारलेल्या नीलेशच्या पुतळ््याला श्रध्दांजली वाहण्यासाठी राजकारणी, प्रतिष्ठित व्यक्ती आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी येतील आणि निघूनही जातील. तेवढ्याने प्रश्न सुटणार नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन नीलेशच्या परिवाराला न्याय देणे हीच खरी नीलेशला श्रध्दांजली ठरेल.