शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

सरकार दरबारी हुतात्मा उपेक्षितच

By admin | Updated: July 12, 2015 22:36 IST

अवघे २२ वर्षांचे कोवळे वय, जिगर मात्र भारतमातेच्या सुपुत्रासारखीच...१ आॅगस्ट १९९८ साली जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला सीमेवर रक्षणासाठी तो तैनात होता..

आविष्कार देसाई, अलिबागअवघे २२ वर्षांचे कोवळे वय, जिगर मात्र भारतमातेच्या सुपुत्रासारखीच...१ आॅगस्ट १९९८ साली जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला सीमेवर रक्षणासाठी तो तैनात होता... त्याचवेळी सीमेपलीकडून पाक सैनिकांचा बेछूट गोळीबार सुुरू होतो आणि प्रत्युत्तर करीत असतानाच शत्रूच्या बंदुकीची गोळी त्याचा काळजाचा ठाव घेते... तो धारातीर्थी पडतो... भारतमाता की जय....असे स्वर आळवतो आणि गतप्राण होतो. ही कहाणी आहे अलिबागचा सुपुत्र नीलेश नारायण तुणतुणे याची.नीलेशच्या परिवाराला सरकारने जमीन देण्याचे कबूल केले होते, मात्र १७ वर्षांनंतर आजही हा हुतात्मा सरकार दरबारी उपेक्षितच राहिला आहे. नीलेशचे वडील नारायण रामभाऊ तुणतुणे यांना तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जमिनीचा तुकडा देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नारायण तुणतुणे यांनी १६ जून १९९८ साली कागदी सोपस्कार पूर्णही केले. अलिबाग तालुक्यातील मौजे भादाणे येथील जमिनीचा तुकडा लागवडीसाठी द्यावा, अशी मागणी तुणतुणे यांनी केली आहे. देशपांडे यांनी जलदगतीने तुणतुणे यांची फाईल मार्गी लावण्याचे आटोकाट प्रयत्न केले. त्यांची बदली झाल्यानंतर येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनीही तुणतुणे यांचे काम लवकर व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता. ही फाईल सरकार दरबारी मंजुरीसाठी गेली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. तब्बल १७ वर्षे झाली आहेत, तरी अद्याप जमिनीचा तुकडा देण्यात प्रशासन अथवा सरकार यशस्वी झालेले नाही. याचे नेमके कारण काय? असा प्रशन आहे.ज्याने देशासाठी रक्त सांडले आपल्या प्राणाचे बलिदान दिले याचे सोयरसुतक सरकारला नाही. खरेच प्रशासनाला आणि सरकारला नीलेशच्या बलिदानाची कदर असती, तर आज नीलेशच्या वडिलांनी मागणी केलेल्या जमिनीचा तुकडा त्यांना कधीच बहाल केला असता. आमचे प्रकरण सरकार दरबारी पोचले असेल, तर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे, आम्ही त्यांच्याकडे काही मागितले नव्हते, त्यांनीच जमीन देतो असे सांगितले होते. आम्हीही पाठपुरावा करतो आहोत मात्र यश आलेले नाही, अशी खंत नीलेशचे वडील नारायण तुणतुणे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.दरम्यान, १ आॅगस्ट हा नीलेशचा शहीद दिवस आहे. खानाव ग्रामपंचायत हद्दीत उभारलेल्या नीलेशच्या पुतळ््याला श्रध्दांजली वाहण्यासाठी राजकारणी, प्रतिष्ठित व्यक्ती आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी येतील आणि निघूनही जातील. तेवढ्याने प्रश्न सुटणार नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन नीलेशच्या परिवाराला न्याय देणे हीच खरी नीलेशला श्रध्दांजली ठरेल.