शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

सरकार दरबारी हुतात्मा उपेक्षितच

By admin | Updated: July 12, 2015 22:36 IST

अवघे २२ वर्षांचे कोवळे वय, जिगर मात्र भारतमातेच्या सुपुत्रासारखीच...१ आॅगस्ट १९९८ साली जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला सीमेवर रक्षणासाठी तो तैनात होता..

आविष्कार देसाई, अलिबागअवघे २२ वर्षांचे कोवळे वय, जिगर मात्र भारतमातेच्या सुपुत्रासारखीच...१ आॅगस्ट १९९८ साली जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला सीमेवर रक्षणासाठी तो तैनात होता... त्याचवेळी सीमेपलीकडून पाक सैनिकांचा बेछूट गोळीबार सुुरू होतो आणि प्रत्युत्तर करीत असतानाच शत्रूच्या बंदुकीची गोळी त्याचा काळजाचा ठाव घेते... तो धारातीर्थी पडतो... भारतमाता की जय....असे स्वर आळवतो आणि गतप्राण होतो. ही कहाणी आहे अलिबागचा सुपुत्र नीलेश नारायण तुणतुणे याची.नीलेशच्या परिवाराला सरकारने जमीन देण्याचे कबूल केले होते, मात्र १७ वर्षांनंतर आजही हा हुतात्मा सरकार दरबारी उपेक्षितच राहिला आहे. नीलेशचे वडील नारायण रामभाऊ तुणतुणे यांना तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जमिनीचा तुकडा देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नारायण तुणतुणे यांनी १६ जून १९९८ साली कागदी सोपस्कार पूर्णही केले. अलिबाग तालुक्यातील मौजे भादाणे येथील जमिनीचा तुकडा लागवडीसाठी द्यावा, अशी मागणी तुणतुणे यांनी केली आहे. देशपांडे यांनी जलदगतीने तुणतुणे यांची फाईल मार्गी लावण्याचे आटोकाट प्रयत्न केले. त्यांची बदली झाल्यानंतर येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनीही तुणतुणे यांचे काम लवकर व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता. ही फाईल सरकार दरबारी मंजुरीसाठी गेली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. तब्बल १७ वर्षे झाली आहेत, तरी अद्याप जमिनीचा तुकडा देण्यात प्रशासन अथवा सरकार यशस्वी झालेले नाही. याचे नेमके कारण काय? असा प्रशन आहे.ज्याने देशासाठी रक्त सांडले आपल्या प्राणाचे बलिदान दिले याचे सोयरसुतक सरकारला नाही. खरेच प्रशासनाला आणि सरकारला नीलेशच्या बलिदानाची कदर असती, तर आज नीलेशच्या वडिलांनी मागणी केलेल्या जमिनीचा तुकडा त्यांना कधीच बहाल केला असता. आमचे प्रकरण सरकार दरबारी पोचले असेल, तर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे, आम्ही त्यांच्याकडे काही मागितले नव्हते, त्यांनीच जमीन देतो असे सांगितले होते. आम्हीही पाठपुरावा करतो आहोत मात्र यश आलेले नाही, अशी खंत नीलेशचे वडील नारायण तुणतुणे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.दरम्यान, १ आॅगस्ट हा नीलेशचा शहीद दिवस आहे. खानाव ग्रामपंचायत हद्दीत उभारलेल्या नीलेशच्या पुतळ््याला श्रध्दांजली वाहण्यासाठी राजकारणी, प्रतिष्ठित व्यक्ती आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी येतील आणि निघूनही जातील. तेवढ्याने प्रश्न सुटणार नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन नीलेशच्या परिवाराला न्याय देणे हीच खरी नीलेशला श्रध्दांजली ठरेल.