शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

पर्यटनवृद्धीसाठी सरकारने ११ ग्रामपंचायतींची केली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 06:02 IST

जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी सरकारने ११ ग्रामपंचायतींची निवड केली आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल सागर तट अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना २० लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण पर्यटन वाढून, त्यांची आर्थिक चक्रे गतिमान होण्यास मदत मिळणार आहे.

अलिबाग : जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी सरकारने ११ ग्रामपंचायतींची निवड केली आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल सागर तट अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना २० लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण पर्यटन वाढून, त्यांची आर्थिक चक्रे गतिमान होण्यास मदत मिळणार आहे.रायगडला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर नेण्यासाठी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी तयारीही सुरू केली आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी सरकारने विविध योजना आखल्या आहेत. शहरांमध्ये येणारे पर्यटक ग्रामीण भागांमध्ये पोहोचावेत, यासाठी निर्मल सागर तट अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे समुद्रकिनाºयांच्या स्वच्छतेबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने गावांचा विकास केला जाणार आहे. जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींची यासाठी निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींना किनारा व्यवस्थापन व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २० लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये सागरतट व्यवस्थापन समिती स्थापन केली जाणार आहे. निवड झालेल्या ग्रामपंचायतींना दिल्या जाणाºया निधीचे तीन टप्प्यांमध्ये वाटप केले जाणार आहे. निधीतून किनाºयावरील स्वच्छतेसाठी उपाययोजना करणे, कचराकुंड्या बसविणे, बायोगॅस प्रकल्प, सौरदिवे, पर्यटकांसाठी वाहनतळ, निवारा शेड, रेस्टिंग खुर्च्या, एटीएम व्यवस्था, वाय-फाय सुविधा, स्वच्छतागृह, स्नानगृह यांसारख्या सुविधा विकसित कराव्या लागणार आहेत.अलिबाग तालुक्यातील नागाव, रेवदंडा, आक्षी, मिळकतखार, किहिम आणि आवास या सहा ग्रामपंचायतींचा, तर मुरुड तालुक्यातील काशिद, श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, हरिहरेश्वर, उरण तालुक्यातील पिरवाडी, नागाव ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामधील काही ग्रामपंचायतींना निधीचे वाटपही करण्यात आलेले आहे.