शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

रायगड जिल्ह्यात शिपायांची ९०० पदे रद्द , सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 01:09 IST

Peon : यापुढे शिपाई संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगड : राज्यातील शिपाई संवर्गातील पदे रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ९०० शिपाई पदांना या निर्णयाचा थेट फटका बसणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. सरकारने तातडीने हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा; अन्यथा १ जानेवारी २०२१ पासून एकही कर्मचारी शाळेत कामावर जाणार नाही, असा निर्धार केला आहे.नजीकच्या काळात राज्यात शिपायांची ५२ हजार पदे रिक्त होणार आहेत. तर रायगड जिल्ह्यातील सुमारे ९०० पदे रिक्त हाेत आहेत. यापुढे शिपाई संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रातील शिपायांसाठी २० हजार रुपये मानधन, नगरपालिका क्षेत्रात साडेसात हजार रुपये आणि ग्रामीण भागांमध्ये फक्त पाच हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. शिपाई पदाचे काम सर्वत्र समानच आहे; मग मानधनात तफावत का, असा प्रश्न रायगड जिल्हा माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघाचे जिल्‍हाध्‍यक्ष मिलिंद जोशी यांनी केला. कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची भेट घेणार असल्याकडेही जाेशी यांनी लक्ष वेधले. यासंदर्भातील सरकारी निर्णय यापूर्वीही बदलण्‍यात आले आहेत. २३ ऑक्‍टोबर २०१३च्‍या आकृतीबंधाबाबत उच्‍च न्‍यायालयात प्रलंबित याचिकेनुसार पदांबाबत कोणतीही नकारात्‍मक भूमिका घेऊ नये, असे आदेश आहेत. 

टॅग्स :Raigadरायगड