शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

खोलात जाऊन ज्ञान मिळवा

By admin | Updated: January 20, 2016 02:00 IST

शिक्षण महत्त्वाचे आहे असे सांगून कोळशातून जसा हिरा ताऊन सुलाखून बाहेर येतो तसे हिऱ्यासारखे तुम्ही या महाविद्यालयातून बाहेर पडले पाहिजे.

कर्जत : शिक्षण महत्त्वाचे आहे असे सांगून कोळशातून जसा हिरा ताऊन सुलाखून बाहेर येतो तसे हिऱ्यासारखे तुम्ही या महाविद्यालयातून बाहेर पडले पाहिजे. जहाज खोल पाण्यात असते तसे तुम्ही खोलवर लांब जाऊन ज्ञान प्राप्त करायला हवे तरच या युगात आपला टिकाव लागेल, असे प्रतिपादन रिलायन्स पॉलीस्टर इंडस्ट्रीज पाताळगंगा रसायनीचे अध्यक्ष हेमंत बाळ यांनी केले.कोकण ज्ञानपीठ कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय आणि कर्जत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा संपन्न झाला. मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षीपासून महाविद्यालयांमध्ये पदवीदान सोहळा करण्याचे निर्देश दिल्याने या सोहळ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकण ज्ञानपीठाच्या सेमिनार हॉलमध्ये पदवीदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रिलायन्स पॉलीस्टर इंडस्ट्रीज पाताळगंगा रसायनीचे अध्यक्ष हेमंत बाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्र माचा शुभारंभ करण्यात आला. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष कॅप्टन सारीपुता वांगडी, खजिनदार झुलकरनैन डाभिया, सचिव प्रदीप शृंगारपुरे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन केतन पाटील व केतकी पाटील यांनी केले तर आभार विजयानंद चित्रगार यांनी मानले. (वार्ताहर)