शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

परिवर्तनाच्या प्रयत्नांचा गौरव

By admin | Updated: January 26, 2017 04:39 IST

धर्माधिकारी घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधन कार्याची परंपरा असून, ही परंपरा तिसऱ्या पिढीचे ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

अलिबाग : धर्माधिकारी घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधन कार्याची परंपरा असून, ही परंपरा तिसऱ्या पिढीचे ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सातासमुद्रापार घेऊन जाण्यात यश मिळविले असतानाच, बुधवारी भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर केल्याने, देश-परदेशातील बैठकांमध्ये आनंदाची लाटच पसरली आहे.आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची बैठकांमधून मशागत करताना, निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ज्येष्ठ निरूपणकार डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अथक परिश्रम घेऊन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांगीण पुरु षार्थाची ओळख त्यांनी, स्वत:ची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. त्यातून मानव निर्मितीचे अनन्यसाधारण कार्य केले. बैठकांच्या मौखिक निरूपणाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसंपन्न समाजनिर्मितीची प्रक्रिया सुरूकरून, त्याचाच भाग म्हणून त्यांनी हाती घेतलेल्या पर्यावरण रक्षण आणि संरक्षणाच्या मोहिमेत लाखो बैठक सदस्य सहभागी झाले आणि कोट्यवधी वृक्षलागवड त्यातून झाली.आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीसाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईसह देशभरातील विविध शहरांमध्ये ज्या स्वच्छता मोहिमा बैठकीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आल्या, त्या माध्यमातून आरोग्यसंपन्न समाजनिर्मिती होत असतानाच, या मोहिमांची नोंद ‘गिनिज बुक’मध्ये झाली. मराठवाड्यासह राज्यातील जलदुर्भीक्षावर जनसहभागातूनच मात करण्याकरिता जलसंवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून, शेकडो गावांमध्ये उन्हाळी पाणीटंचाईवर मात करण्यात यश मिळते आहे. (विशेष प्रतिनिधी)