शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

चॉकलेटचे दहा रॅपर द्या अन् एक कॅडबरी मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:34 IST

कर्जत नगरपरिषदेचा उपक्रम : विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागृतीसाठी अनोखा फंडा

कर्जत : शाळेच्या परिसरात कचरा टाकू नये यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी कर्जत नगरपरिषदेने अनोखी युक्ती काढली आहे. चॉकलेटच्या दहा रॅपरवर विद्यार्थ्यांना एक कॅडबरी मिळणार आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत झालेल्या स्वच्छता सर्व्हेमध्ये कर्जत नगरपरिषदेचे देशात पहिल्या पन्नासमध्ये नाव आहे. त्यामुळे कर्जत नगरपरिषदेला ५ कोटींचे बक्षीस जाहीर झाले आहे. त्यामधील अडीच कोटींची रक्कम नगपरिषदेच्या खात्यात जमा झाली आहे. उरलेल्या अडीच कोटींचा धनादेश बक्षीस समारंभात देण्यात येणार आहे. बक्षिसाची रक्कम स्वच्छता व पाणी योजनेवर खर्च करण्यात येणार असून २०२० स्वच्छ सर्वेक्षण अभियानात आपल्या शहराला देशात पहिले आणायचे असल्याचा निर्धार मुख्याधिकारी कोकरे यांनी व्यक्त केला असून त्यास सभागृहाने संमती दर्शवली.

कर्जत नगरपरिषद क्षेत्रात स्वच्छतेविषयी, कचरा वर्गीकरणाविषयी बऱ्यापैकी जागृती झाली आहे. शाळेच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी येणारा ओला कचरा यामध्ये चॉकलेट, कॅडबरी, शाम्पू, छोट्या मसाल्याच्या पुड्या यांचे वर्गीकरण योग्य प्रकारे होत नाही, रिकामी पाकिटे नगरपरिषदेमध्ये जमा केल्यास प्रत्येक दहा नगासाठी एक कॅटबरी बक्षीस देण्याची संकल्पना सभागृहात मांडली, तसे पत्र सर्व शाळांना देण्यात आले.च्मुले शाळेत जाताना किंवा शाळेतून घरी जाताना चॉकलेट, वेफर्स खात असतात ते खाऊन झाली की चॉकलेट किंवा वेफर्सची रिकामी पाकिटे रस्त्यावर टाकतात. त्यामुळे त्याठिकाणी छोट्या छोट्या रॅपरचा कचरा मोठ्या प्रमाणात होतो.च्मुलांनी तो कचरा रस्त्यावर टाकू नये म्हणून दहा रॅपरवर एक कॅटबरी देण्याचे नगरपरिषदेने कबूल केले आहे. मुलांनी हे रॅपर नगरपरिषद कार्यालयात जमा करायचे आहे व कॅटबरी न्यायची आहे.

च्शाळेतील मुले नवीन चांगल्या गोष्टी लहान वयात शिकत असतात, त्यांच्या शरीराला शालेय वयात एक चांगले वळण लावण्यासाठी आपण खाल्लेले चॉकलेट किंवा वेफर्स याचा रॅपर रस्त्यावर न टाकता ते खिशात ठेवून शाळेतील किंवा घरच्या डस्टबिनमध्ये टाकले पाहिजे यासाठी नगरपरिषदेने हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.च्उपक्रमास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, विद्यार्थ्यांनी आणलेले रॅपर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी स्वीकारले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, बांधकाम सभापती राहुल डाळींबकर, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, लिपिक रवींद्र लाड, शेखर लोहकरे आदी उपस्थित होते.च्अनोख्या उपक्रमाचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. यामुळे विद्यार्थीही स्वच्छतेबाबत जागृत होत आहे.