शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

"शेतकऱ्यांना आचारसंहितेपूर्वी भरपाई द्या"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:41 IST

समुद्राच्या उधाणामुळे शेती पिकांचे आणि शेतजमिनीचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा राज्याचे खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी केली आहे.

अलिबाग : समुद्राच्या उधाणामुळे शेती पिकांचे आणि शेतजमिनीचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा राज्याचे खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी केली आहे. खरेतर रायगड जिल्ह्यात खारभूमी विभागाच्या तब्बल ३० वर्षांच्या निष्क्रियतेमुळे भातशेती जमिनी नापीक झाल्या आहेत. अशा रायगडमधील नापीक भातशेती जमीनधारकांना आता लोकसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना शुक्रवारी पाठविले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.शासनाने गुरुवारी नुकसानभरपाई देणार असे जाहीर केले आहे. सन १९८२ पासून खारभूमीच्या उपजाऊ क्षेत्रात खारे पाणी घुसून ज्या जमिनी नापीक झाल्या त्याची कोणतीही नोंद महसूल, कृषी व खारभूमी विभागाकडे नाही. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन नुकसानभरपाई कशी देणार, अशी शंका याच पत्रात उपस्थित करून, जिल्हाधिकारी या नात्याने आपण यात पुढाकार घेऊन तातडीने शासनाकडे नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक नुकसानग्रस्त शेतकरी व क्षेत्र अशी आकडेवारीसह माहिती द्यावी, अन्यथा केवळ निवडणुकीसाठी घेतलेला हा निर्णय ठरेल, अशी भीती शेतकºयांनी या पत्रात नमूद केली आहे.गेल्या ३२ वर्षांत ५० टक्के खारभूमी क्षेत्रात समुद्र उधाणाचे खारे पाणी घुसून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर श्रमिक मुक्ती दलाने १६ मे २०१६ रोजी सुमारे एक हजार २०० शेतकºयांचा मोर्चा नुकसानभरपाईच्या अर्जासह अलिबाग येथील खारभूमी कार्यालयावर नेला होता. त्या वेळी ५४० शेतकºयांनी नुकसानभरपाईचे लेखी अर्ज दिले असल्याचे या पत्रात नमूद के ले आहे.शासनास प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हाधिकाºयांना विनंतीतत्काळ नुकसानभरपाईची मागणी कोकण विभागीय आयुक्त आणि मदत व पुनर्वसन विभागाचे अवर सचिव यांच्याकडे विशेष बाब म्हणून आर्थिक मदत मंजूर करण्यासाठीचे विनंतीवजा पत्रदेखील दिले आहे. प्रथमच खारेपाटातील लाभक्षेत्रात खारे पाणी घुसून झालेल्या नुकसानीची नोंद घेऊन भरपाईसाठी शासनास प्रस्ताव सादर केला आहे व त्यात त्यांनी ‘विशेष बाब’ म्हणून आर्थिक मदत मंजूर करावी, असा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर केला आहे. याचाच पुढील टप्पा म्हणून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आल्याचे भगत यांनी सांगितले.>समुद्राच्या उधाणामुळे नुकसान झालेल्या शेतजमिनींना नुकसानभरपाई देण्याबाबतचा झालेला निर्णय हा ऐतिहासिक आहे. या निर्णयानुसार शासनाचा जी.आर. निघाल्यावर नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसानभरपाई मिळू शकणार आहे. आमच्या कार्यालयाकडून नुकसानग्रस्त शेतकरी व क्षेत्र याबाबतची माहिती आम्ही शासनास आधीच पाठविली आहे.- सुरेश शिरसाट, अभियंता, खारभूमी विभाग, अलिबाग