शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ द्यावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:15 IST

नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षांत शेती निगडित कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकलेली नाही.

अलिबाग : नैसिर्गक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षांत शेती निगडित कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झालेला आहे. त्यांना शेतकामांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.सरकारने शेतकºयांना कर्जमुक्ती देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते.आधार लिंक हा या योजनेचा मूळगाभा असल्यामुळे शेतकºयांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्या कर्जखात्याशी आधार कार्ड लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकºयांना अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठित, फेर पुनर्गठित कर्ज विचारात घेण्यात येणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ च्या अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी सरकार निर्णयाच्या अटी व शर्तीनुसार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले. संगणकीय सादरीकरणाद्वारेही योजनेची माहिती उपस्थितांना दाखविण्यात आली.या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे तसेच तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बँक अधिकारी आदी उपस्थित होते.