शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप, विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:14 IST

ढोल-ताशा, डीजेच्या तालावर मिरवणुका; समुद्र, तलाव, नदी, खाड्यांवर चोख बंदोबस्त

अलिबाग : रायगड जिल्ह्यात शनिवारी ७२ हजार २२७ गौरी-गणेशमूर्तींना भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. यात ९३ सार्वजनिक, तर ५७ हजार ९४७ घरगुती गणेशमूर्तींचे आणि १४ हजार १८७ गौरीच्या मूर्तींचे समुद्र, तलाव, नदी या ठिकाणी विसर्जन करण्यात आले.

बाप्पाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यांच्या जोडीला ढोल-ताशाचा गजर आणि डीजेच्या दणदणाटाने परिसर चांगलाच दुमदुमून गेला होता. अधूनमधून पाऊस पडत असतानाही गणेशभक्त बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये तल्लीन होऊन नाचत होते. विसर्जनस्थळी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याने जत्रेचे स्वरूप आले होते.

गेले सहा दिवस बाप्पाच्या आगमनाची धूम गणेशभक्तांच्या घरामध्ये सुरू होती. आप्तेष्ट, मित्रमंडळी असा लवाजमा बाप्पाच्या आगमनाने चांगलाच खूश झाला होता. अनेकांनी जागरण करून विविध खेळ, गाणी, नाच-मस्तीने रात्र जागवून काढल्या. सायंकाळी ४ नंतर बाप्पाला विसर्जनस्थळी नेण्यास सुरुवात झाली. कोणी टाळ-मृदुंगाचा गजर करीत, तर कोणी डीजेच्या तालावर धमाल मस्ती करत बाप्पाला निरोप दिला.

महाडमधील भोईवाडा, पेटकरअळी, परिटअळी, गणेशनगर, जाधववाडी, न्हावीकोंड, दासगांवकर वाडी, बामणे कोंड, आणि वांद्रेकोड या नऊ वाड्यांमध्ये मोठ्या आनंदात गणेश उत्सव साजरा करण्यात आला. गावातील या वाड्यांमधील गणेश मूर्तींचे गावालगतच्या नदीवर तर पेटकर आळी आणि भोईवाडा येथील मूर्तींचे सावित्री खाडीत विसर्जन करण्यात आले.

विसर्जनस्थळी धार्मिक कार्यक्रममोहोपाडा तलाव, पाताळगंगा नदी, रिस पूल, कांबे गणेशघाट, वावेघर गणेशघाट, गुळसुंदे-पाताळगंगा नदीपात्र, वाशिवली, लोहोप, कासपनदीपात्र, तळेगाववाडी गणेशघाट आदी ठिकाणी भजन गाऊन पाच दिवसांच्या शेकडो गणेशमूर्तींचे तर गौराईमूर्तींचे पाताळगंगा नदीवर विसर्जन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. बाप्पाला निरोप देताना लहान मुलांसह कुटुंबातील सदस्य भावूक झाले होते.

गणेश आगमनापासून कोसळणाऱ्या पावसाने शनिवारीही सायंकाळी हजेरी लावल्याने विसर्जन सोहळ्यात नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, लाडक्या एकदंताला निरोप देताना भाविकांचा कंठ दाटून आल्याचे चित्र विसर्जनस्थळी पाहावयास मिळाले. मोहोपाडा येथील तलावावर पाच दिवसांच्या ४०० पेक्षा जास्त गणरायमूर्तींचे तर पाताळगंगा नदीवर ३०० पेक्षा जास्त गौराईचे विसर्जन करण्यात आले. भजन-कीर्तन, पूजा, अर्चा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल या वेळी पाहायला मिळाली.

ठिकठिकाणी चोख बंदोबस्तच्पाली : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकरच या... अशा जयघोषात सुधागडकरांनी पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. सायंकाळपर्यंत अनेक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पाली पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाली, राबगाव, रासळ, पेडली, जांभुळपाडा, परळी, करचुंडे अंबानदी येथे गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.

आसमंतात घुमणारा शंखनाद, फुलांची उधळण, ढोल-ताशांचा दणदणाट, बाप्पा मोरयाचा जयघोष करत, वरुणराजाच्या साक्षीने भक्तांनी साश्रू नयनांनी गौरी-गणरायाला निरोप दिला. विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पाली पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. या वेळी पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर हेदेखील उपस्थित होते.

टॅग्स :RaigadरायगडGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019