शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कचरा देशाला भेडसावणारी समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:32 IST

कर्जतच्या इतिहासामधील आजचा दिवस चांगला आहे. या प्रकल्पातून वीजनिर्मितीबरोबर कचºयाचे विघटन महत्त्वाचे आहे, कचरा देशाला भेडसावणारी समस्या आहे

कर्जत : कर्जतच्या इतिहासामधील आजचा दिवस चांगला आहे. या प्रकल्पातून वीजनिर्मितीबरोबर कचºयाचे विघटन महत्त्वाचे आहे, कचरा देशाला भेडसावणारी समस्या आहे, स्वच्छतेविषयी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन आ. सुरेश लाड यांनी के ले.नगरपरिषद हद्दीतील मौजे मुद्रे येथील अग्निशमन केंद्राजवळ उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पाचे मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी लाड बोलत होते.नगराध्यक्षा रजनी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी गटनेते राजेश लाड यांनी प्रास्ताविकात स्वच्छतेच्या दृष्टीने हा बायोगॅस प्रकल्प महत्त्वाचा आहे, असे सांगितले. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी ओल्या कचºयापासून बायोगॅसच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा हा प्रकल्प आहे. स्वच्छतेमध्ये कर्जत नगरपरिषद नंबर एकवर असेल असा विश्वास व्यक्तके ला.याप्रसंगी गटनेते राजेश लाड, विरोधी पक्षनेत्या यमुताई विचारे, सभापती लालधारी पाल, सभापती पुष्पा दगडे, सभापती मिलिंद चिखलकर, सभापती उमेश गायकवाड, नगरसेविका अर्चना बैलमारे, अरु णा वायकर, सुवर्णा जोशी, बिनिता घुमरे, शीतल लाड, सई वारे आदी उपस्थित होते.स्वच्छ भारत अभियान व नागरी घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ यातील मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून कर्जत नगरपरिषदेने ओल्या कचºयावर प्रक्रि या करण्यासाठी भाभा अणुशक्ती रिसर्च सेंटरने निसर्ग तंत्रज्ञानावर आधारित पाच मेट्रिक टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारला आहे.कर्जत नगरपरिषद हद्दीत निर्माण होणाºया ओल्या कचºयावर म्हणजेच भाजी मंडईतील, हॉटेलमधील व नागरिकांकडून वर्गीकृत स्वरूपात प्राप्त होणाºया ओल्या कचºयावर प्रक्रि या करण्यात येणार आहे.या प्रकल्पामुळे कर्जत शहरातील ओला कचरा डम्पिंग ग्राउंडवर न जाता त्यावर बायोगॅस प्रकल्पात प्रक्रि या करण्यात येणार आहे, त्यामुळे डम्पिंग ग्राउंडची जागा व वाहतुकीच्या खर्चात बचत होणार आहे.या प्रकल्पात ५००० किलो ओल्या कचºयावर प्रक्रि या केल्यास दररोज १०० किलो गॅस मिळणे अपेक्षित आहे. या गॅसवर जनरेटर चालवून त्यापासून वीजनिर्मिती करणे प्रस्तावित आहे.नगरपरिषदेच्या मालकीच्या चार गुंठे जागेत सुमारे एक कोटी रु पये खर्च करून हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. डोंबिवली येथील औवनी एंटरप्राइजेसने या प्रकल्पाचे काम केले आहे.