शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कर्जत मालवाडी नाल्यात कचऱ्याचे ढीग

By admin | Updated: June 4, 2017 03:58 IST

एकीकडे मोठ्या गजावाजात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले जात आहे. कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरली आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील

- लोकमत न्यूज नेटवर्क

नेरळ : एकीकडे मोठ्या गजावाजात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले जात आहे. कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरली आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील मालवाडीमधून वाहणाऱ्या मुख्य नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य असूनही संबंधित ग्रामपंचायत प्रशासकीय यंत्रणा मात्र याबाबत उदासीन असल्याने पावसाळा तोंडावर येऊनही परिस्थिती जैसे थे आहे. कर्जत नगरपरिषद हद्दीला लागून असलेल्या किरवली ग्रामपंचायतीतील मालवाडी गावातून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्यत्र नालेसफाईची कामे सुरू असताना मालवाडी नाला दुर्लक्षित आहे. किरवली ग्रामपंचायत हद्दीतील मालवाडीत नव्याने वसाहती उभारण्यात आल्या आहेत; परंतु या वसाहतींना ग्रामपंचायतीतर्फे मूलभूत सुविधा पुरविल्या नाहीत. ग्रामपंचायत कचरा गोळा करणारी घंटा गाडी तथा अन्य कोणतीही सुविधा नसल्याने या वसाहतीमधील नागरिक नाल्यामध्ये सर्व कचरा आणून टाकत आहेत. महिनोन्महिने हा कचरा उचलण्यात न आल्याने नाल्यात कचरा साचले. जरी हा नाला कर्जत नगरपरिषद हद्दीला लागून असला, तरी त्याची नोंद किरवली ग्रामपंचायत मालवाडीमध्ये होत असल्याने नगरपरिषद बघ्याची भूमिका घेत आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने या नाल्याची सफाई यापूर्वीच होणे अपेक्षित होती; परंतु अद्याप परिस्थिती जैसे थे आहे. पावसाळ्यापूर्वी कचरा न उचलल्यास पावसाळ्यात पाण्याबरोबर हा कचरा दूरवर पसरेल. या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा समावेश आहे. त्यामुळे जनावरांनीही जर कचरा खाल्ला तर त्यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन रोगराईलाही निमंत्रण मिळू शकते. तरी पावसाळ्यापूर्वी या नाल्यातील कचरा उचलावा, अशी मागणी जोर धरत आहे. सुविधांअभावी कचऱ्याचे ढीगग्रामपंचायत हद्दीत नव्याने वसाहती उभारण्यात आल्या आहेत; परंतु या वसाहतींना ग्रामपंचायत मार्फत योग्य सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. ग्रामपंचायतीकडे कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी व अन्य कोणतीही सुविधा नसल्याने या वसाहतीमधील नागरिक जवळच असलेल्या नाल्यामध्ये सर्व कचरा टाकत असल्याचे चित्र आहे.किरवली ग्रामपंचायतीतर्फे लवकरच डम्पिंग ग्राउंडची निर्मिती करण्यात येईल. या नाल्याच्या पलीकडील हद्द कर्जत नगरपालिकेची असून, त्या हद्दीतील इमारतीमधील रहिवासी तेथे मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकतात. - ज्योती बडेकर, उपसरपंच, किरवली