शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

कर्जत मालवाडी नाल्यात कचऱ्याचे ढीग

By admin | Updated: June 4, 2017 03:58 IST

एकीकडे मोठ्या गजावाजात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले जात आहे. कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरली आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील

- लोकमत न्यूज नेटवर्क

नेरळ : एकीकडे मोठ्या गजावाजात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले जात आहे. कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरली आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील मालवाडीमधून वाहणाऱ्या मुख्य नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य असूनही संबंधित ग्रामपंचायत प्रशासकीय यंत्रणा मात्र याबाबत उदासीन असल्याने पावसाळा तोंडावर येऊनही परिस्थिती जैसे थे आहे. कर्जत नगरपरिषद हद्दीला लागून असलेल्या किरवली ग्रामपंचायतीतील मालवाडी गावातून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्यत्र नालेसफाईची कामे सुरू असताना मालवाडी नाला दुर्लक्षित आहे. किरवली ग्रामपंचायत हद्दीतील मालवाडीत नव्याने वसाहती उभारण्यात आल्या आहेत; परंतु या वसाहतींना ग्रामपंचायतीतर्फे मूलभूत सुविधा पुरविल्या नाहीत. ग्रामपंचायत कचरा गोळा करणारी घंटा गाडी तथा अन्य कोणतीही सुविधा नसल्याने या वसाहतीमधील नागरिक नाल्यामध्ये सर्व कचरा आणून टाकत आहेत. महिनोन्महिने हा कचरा उचलण्यात न आल्याने नाल्यात कचरा साचले. जरी हा नाला कर्जत नगरपरिषद हद्दीला लागून असला, तरी त्याची नोंद किरवली ग्रामपंचायत मालवाडीमध्ये होत असल्याने नगरपरिषद बघ्याची भूमिका घेत आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने या नाल्याची सफाई यापूर्वीच होणे अपेक्षित होती; परंतु अद्याप परिस्थिती जैसे थे आहे. पावसाळ्यापूर्वी कचरा न उचलल्यास पावसाळ्यात पाण्याबरोबर हा कचरा दूरवर पसरेल. या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा समावेश आहे. त्यामुळे जनावरांनीही जर कचरा खाल्ला तर त्यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन रोगराईलाही निमंत्रण मिळू शकते. तरी पावसाळ्यापूर्वी या नाल्यातील कचरा उचलावा, अशी मागणी जोर धरत आहे. सुविधांअभावी कचऱ्याचे ढीगग्रामपंचायत हद्दीत नव्याने वसाहती उभारण्यात आल्या आहेत; परंतु या वसाहतींना ग्रामपंचायत मार्फत योग्य सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. ग्रामपंचायतीकडे कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी व अन्य कोणतीही सुविधा नसल्याने या वसाहतीमधील नागरिक जवळच असलेल्या नाल्यामध्ये सर्व कचरा टाकत असल्याचे चित्र आहे.किरवली ग्रामपंचायतीतर्फे लवकरच डम्पिंग ग्राउंडची निर्मिती करण्यात येईल. या नाल्याच्या पलीकडील हद्द कर्जत नगरपालिकेची असून, त्या हद्दीतील इमारतीमधील रहिवासी तेथे मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकतात. - ज्योती बडेकर, उपसरपंच, किरवली