शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

गणेशोत्सवापूर्वी सर्वच खड्डे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:21 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ आॅगस्टपर्यंत भरण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येतील

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ आॅगस्टपर्यंत भरण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात केंद्रीय योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.केंद्रीय मंत्र्यांच्या या आदेशाने महामार्गावरून प्रवास करणाºयांना दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची खड्ड्यांतील प्रवासातून सुटका होणार आहे, गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील चाकरमानी या कालावधीत मोठ्या संख्येने कोकणात येतात. पावसामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी पत्रकारांनी केली. महामार्गावरील खड्डे भरण्याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. १५ आॅगस्टपर्यंत खड्डे भरण्यात येतील, असे गीते यांनी स्पष्ट केले.रोजगार हमी योजनेचा रायगड जिल्ह्यातील शेतकºयांंनाही फायदा व्हावा यासाठी आता शेतकºयांनी त्यांच्या शेतावर घातलेला बांध आणि कंपोस्ट खतांसाठी केलेले खड्डे ही आता रोजगार हमी योजनेच्या कक्षेत धरले जाणार आहेत. त्यामुळे शेतकºयांसाठी ही चांगली योजना असल्याने त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गीते यांनी केले. या आढावा बैठकीच्या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे आदी उपस्थित होते.विकासकामातचालढकल करू नकाठेकेदारासह अधिकाºयांनी विकासकामात चालढकल केली तर, त्याची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा सजड दमच गीते यांनी भरला. विकासकामांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला फ्रीहॅण्डदिला आहे. तुमच्या कामात मी कधीच ढवळाढवळ केली नाही. त्यामुळे कामात दिरंगाई नको आणि ज्यांनी प्रामाणिकपणे कामे केली आहेत त्यांची बिले अडवू नका, अन्यथा माझ्या पद्धतीने काम करावे लागेल, असा इशाराही गीते यांनी दिला.1800शेतकºयांना योजनेचा लाभ1रायगड जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे ८० टक्के लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या आठ दिवसांमध्ये १०० टक्के लावणीची कामे पूर्ण होतील. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाचा हंगाम चांगला जाणार आहे.2सरकारने पीक विमा योजनेमध्येआता भाताच्या पिकालाही संरक्षित केले आहे. हेक्टरी ३९ हजार रुपयांचे संरक्षण मिळणार आहे. यासाठी फक्त एकदाच ७५० रु पये हप्ता शेतकºयांना भरावा लागणार आहे. आतापर्यंत १८ हजार शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून १२९ कोटीरु पयांची विजेसंबंधीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे आताविजेच्या कोणत्याच तक्र ारीराहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.कैद्यांकरितानिधी मंजूरअलिबाग येथील जिल्हा कारागृहातील कैद्यांना रु ग्णालयात नेण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे कारागृहासाठी एक रु ग्णवाहिका मिळावी, अशी मागणी जिल्हा कारागृह अधीक्षकांनी गीते यांच्याकडे अर्जाद्वारे केली. त्याला तत्काळ मंजुरी देत त्यांनी नऊ लाख २५ हजार ७४५ रु पयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे कारागृहातील कैद्यांसाठी आता रुग्णवाहिका उपलब्ध होण्यातील अडथळा दूर झाला आहे.‘रोहयो’साठी निधीरायगड जिल्ह्यात रोजगार हमी योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी आहे; परंतु जिल्ह्यात जॉबकार्ड असणाºयांची संख्या खूपच कमी असल्याची माहितीकें द्रीय मंत्रीअनंत गीते यांनी दिली.