शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

गणेशोत्सवापूर्वी सर्वच खड्डे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:21 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ आॅगस्टपर्यंत भरण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येतील

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ आॅगस्टपर्यंत भरण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात केंद्रीय योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.केंद्रीय मंत्र्यांच्या या आदेशाने महामार्गावरून प्रवास करणाºयांना दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची खड्ड्यांतील प्रवासातून सुटका होणार आहे, गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील चाकरमानी या कालावधीत मोठ्या संख्येने कोकणात येतात. पावसामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी पत्रकारांनी केली. महामार्गावरील खड्डे भरण्याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. १५ आॅगस्टपर्यंत खड्डे भरण्यात येतील, असे गीते यांनी स्पष्ट केले.रोजगार हमी योजनेचा रायगड जिल्ह्यातील शेतकºयांंनाही फायदा व्हावा यासाठी आता शेतकºयांनी त्यांच्या शेतावर घातलेला बांध आणि कंपोस्ट खतांसाठी केलेले खड्डे ही आता रोजगार हमी योजनेच्या कक्षेत धरले जाणार आहेत. त्यामुळे शेतकºयांसाठी ही चांगली योजना असल्याने त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गीते यांनी केले. या आढावा बैठकीच्या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे आदी उपस्थित होते.विकासकामातचालढकल करू नकाठेकेदारासह अधिकाºयांनी विकासकामात चालढकल केली तर, त्याची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा सजड दमच गीते यांनी भरला. विकासकामांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला फ्रीहॅण्डदिला आहे. तुमच्या कामात मी कधीच ढवळाढवळ केली नाही. त्यामुळे कामात दिरंगाई नको आणि ज्यांनी प्रामाणिकपणे कामे केली आहेत त्यांची बिले अडवू नका, अन्यथा माझ्या पद्धतीने काम करावे लागेल, असा इशाराही गीते यांनी दिला.1800शेतकºयांना योजनेचा लाभ1रायगड जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे ८० टक्के लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या आठ दिवसांमध्ये १०० टक्के लावणीची कामे पूर्ण होतील. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाचा हंगाम चांगला जाणार आहे.2सरकारने पीक विमा योजनेमध्येआता भाताच्या पिकालाही संरक्षित केले आहे. हेक्टरी ३९ हजार रुपयांचे संरक्षण मिळणार आहे. यासाठी फक्त एकदाच ७५० रु पये हप्ता शेतकºयांना भरावा लागणार आहे. आतापर्यंत १८ हजार शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून १२९ कोटीरु पयांची विजेसंबंधीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे आताविजेच्या कोणत्याच तक्र ारीराहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.कैद्यांकरितानिधी मंजूरअलिबाग येथील जिल्हा कारागृहातील कैद्यांना रु ग्णालयात नेण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे कारागृहासाठी एक रु ग्णवाहिका मिळावी, अशी मागणी जिल्हा कारागृह अधीक्षकांनी गीते यांच्याकडे अर्जाद्वारे केली. त्याला तत्काळ मंजुरी देत त्यांनी नऊ लाख २५ हजार ७४५ रु पयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे कारागृहातील कैद्यांसाठी आता रुग्णवाहिका उपलब्ध होण्यातील अडथळा दूर झाला आहे.‘रोहयो’साठी निधीरायगड जिल्ह्यात रोजगार हमी योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी आहे; परंतु जिल्ह्यात जॉबकार्ड असणाºयांची संख्या खूपच कमी असल्याची माहितीकें द्रीय मंत्रीअनंत गीते यांनी दिली.