शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कष्टकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 03:24 IST

रेशनवर धान्य देण्याऐवजी लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याचे सरकारचे धोरण म्हणजे अन्न सुरक्षा कायदा नाकारण्यासारखेच आहे.

अलिबाग - रेशनवर धान्य देण्याऐवजी लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याचे सरकारचे धोरण म्हणजे अन्न सुरक्षा कायदा नाकारण्यासारखेच आहे. या विरोधात रायगड जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांनी वज्रमूठ आवळून सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. सरकारने याबाबत तातडीने फेरविचार न केल्यास जनतेच्या रोषाला सामारे जावे लागेल, असा इशारा सर्वहरा जन आंदोलनाच्या प्रमुख उल्का महाजन यांनी दिला.सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने धडक दिली. आपल्या मागण्यांचे निवेदनही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.देशभरातील विविध संघटनांसह पुरोगामी राजकीय पक्षांनी जन आंदोलन उभारून आधीच्या सरकारला अन्न सुरक्षा कायदा करायला भाग पाडले. २०१३ मध्ये संयुक्त पुरोगामी युवक संघटनेने कायदा केला. त्यामुळे गरिबांना रेशन धान्य दुकानावर स्वस्त धान्य मिळण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला होता. मात्र सातत्याने गरिबांविरोधात धोरण आखणाºया भाजपा सरकारने हा हक्कच मोडीत काढण्याचा डाव आखला आहे. याबाबतचा सरकारी निर्णय २१आॅगस्ट रोजी सरकारने काढला आहे. मुंबईमधील काही दुकानांमध्ये असा प्रयोग १ सप्टेंबरपासून सुरू केला असल्याचे उल्का महाजन यांनी सांगितले.सरकारच्या या धोरणामुळे धान्याच्या बाजारामध्ये थेट मक्तेदारी मिळवू पाहणाºया मोठ्या देशी-विदेशी कंपन्यांचा आर्थिक फायदा करून देण्याचाच हा घाट आहे. त्यामुळे गरिबांच्या अन्न सुरक्षेवर, शेती आणि शेतकºयांवर दूरगामी परिणाम होणार असल्याने घातक आहे.सरकार शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा वादा करते तर, दुसरीकडे हमीभाव देऊन धान्य खरेदी करण्याची देशव्यापी यंत्रणा म्हणजे अन्न महामंडळ मोडीत काढण्याची सरकारचा डाव आहे. सरकारचे हे दुटप्पी धोरण हाणून पाडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. याप्रसंगी बबन गोपाळ नाईक, जानू दामा डुमणे, चिमाजी वारगुडे यांच्यासह हजारो कष्टकरी जनता उपस्थित होती.प्रमुख मागण्यारेशन व्यवस्था बंद करून लाभार्थ्यांना थेट रक्कम देण्याचा प्रयोग रद्द करावा, रेशन यंत्रणा अधिक मजबूत व पारदर्शक, सार्वत्रिक आणि लोकाभिमुख करण्यात यावी, यासाठी संघटनेशी चर्चा करावी, अन्न सुरक्षा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, ज्वारी, बाजरी, नाचणी हे धान्य रेशन दुकानावर उपलब्ध करून द्यावे, रेशनवर सर्वांना साखर, खाद्यतेल, डाळ देण्यात यावी, रॉकेल पुरेशा प्रमाणात द्यावे, आधारकार्ड नसल्यामुळे कोणालाही रेशनिंगचा लाभ नाकारू नये.विश्व व्यापार संघटनेचा दबावसरकारने हा निर्णय घेताना या प्रश्नावर काम करणाºया विविध जन संघटना, रेशन कार्डधारक, लोकप्रतिनिधी यांचे कोणाचेही मत विचारात घेतले नाही. मात्र अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी अ‍ॅक्शन लॅब नावाच्या कंपनी (एनजीओशी) याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कंपनीबरोबर कोणता करार करण्यात आला आहे याची माहिती गुलदस्त्यातच आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या