शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

भिरा जलविद्युत प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा

By admin | Updated: July 27, 2016 03:11 IST

माणगाव तालुक्यातील भिरा जलविद्युत प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक करून ताब्यात घेतलेल्या जमिनी तत्काळ परत करा, या मागणीसाठी सर्वहारा आंदोलनाच्या नेत्या उल्का

महाड : माणगाव तालुक्यातील भिरा जलविद्युत प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक करून ताब्यात घेतलेल्या जमिनी तत्काळ परत करा, या मागणीसाठी सर्वहारा आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखाली माणगाव प्रांत कार्यालयावर मंगळवारी प्रकल्पग्रस्तांचा भव्य मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात विळे, पाटणूस, वरची वाडी, भाऊची आळी, भैरीची वाडी, खाळजे, म्हसेवाडी, लव्हली वाडी, साजे व भिरा गावातील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.१९८१ मध्ये भिरा जलविद्युत प्रकल्पासाठी केवळ माती काढण्यासाठी नाममात्र मोबदला देऊन शासनाने या परिसरातील १० ते १२ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर १५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सुमारे १,२०० एकर जमीन विनावापर केवळ माती काढण्यासाठी शासनाने ताब्यात घेतल्या, या जमिनीची सातबारापत्रकी ‘भिरा प्रकल्प महाराष्ट्र शासन’ अशा नोंदी पडल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या शेतकऱ्यांच्या लक्षात आले. ही फसवणूक होऊनही संयम बाळगत प्रकल्पग्रस्त दाखल्याची मागणी करूनही आजतागायत हे दाखले शेतकऱ्यांना दिले गेले नाहीत. तर निवाड्याची मागणी करूनही निवाडे दिले जात नसल्याने शेतकऱ्यांना अंधारात ठेवून शासनाने जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप यावेळी आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी केला.नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ च्या कलम २४ प्रमाणे शासनाने ताब्यात घेतलेल्या जमिनी संपादन केल्यापासून पाच वर्षे विनावापर पडून राहिली असेल, तर अशी जमीन मूळ मालकांना किंवा वारसांना परत करण्याची कार्यवाही करता येते. रक्कम वेळोवेळीच्या व्याजदराने बँके त भरूनताबा घेतल्याच्या तारखेपासून बोजाविरहित जमीन मूळ मालकांना परत करता येते, अशी तरतूद असल्याचे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)