शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुके आठतास अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:20 IST

बोईसर सबस्टेटशनच्या वाहिनीत बिघाड : नागरिकांची दैना; महावितरणचा एसएमएस अलर्ट

डहाणू/ बोईसर : बोईसर खैरपाडा येथील सबस्टेशनमधील १३२ केव्ही या अतिउच्चदाबाच्या विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने गुरु वारी सायंकाळी साडेसात ते पहाटे साडेतीन या काळात बोईसर औद्योगिक वसाहतीतील काही भागासह जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि मोखाडा हे तालुके अंधारात होते.

येथील सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीकरिता किमान अडीच तासाचा अवधी लागू शकतो, ही शक्यता विचारात घेऊन एमएससीबीतर्फे ग्राहकांना या बाबतची माहिती देणारे एसएमएस पाठविण्यात आले. त्यानंतर साडेआठच्या सुमारास पंधरा ते वीस मिनिटांकरिता पुरवठा पुन्हा खंडीत झाला. त्यानंतर अकरा आणि एक वाजता पुरवठा सुरळीत होईल असे संदेश आले परंतु वीज आली नाही. उकाडा आणि डासांचा त्रास सहन करणाऱ्या ग्राहकांची उरली सुरली आशा हवेतच विरली. दरम्यान वीज कर्मचाऱ्यांच्या आठ तासांच्या प्रयत्नांना शुक्र वारी पहाटे साडेतीन वाजता यश आले. त्यानंतर काही तास चांगली झोप लागल्याची प्रतिक्रि या नागरिकांनी लोकमतशी बोलताना दिली. तर आठवड्यातून दर शुक्र वारी तांत्रिक कारणास्तव होणारा वीज पुरवठा खंडीत करण्यात न आल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात सुटका मिळाली.

सध्या वातावरणातील तापमान कक्षा वाढली असून उन्हाच्या काहिलीने लोकांच्या जीवाची लाही लाही होत असताना महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीने डहाणूकर जनतेला विजेचा शॉक दिला आहे. गुरु वारी रात्री (दि.११) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तालुक्यातील वीजपुरवठा अकस्मात खंडित करण्यात आला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही वीजपुरवठा सुरळीतपणे सुरु न केल्याने लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळे काळोख्या अंधारात व उकाड्यात जागूनच लोकांना रात्र काढावी लागली.

पावसाळ्यापूर्वीच महावितरणच्या या भोंगळ तमशामुळे तालुक्यात जनक्षोभ पसरला आहे. डहाणूच्या पश्चिम भागातील गाव पाड्यामध्ये उन्हाळ्यात महावितरण कंपनीकडून ३ ते ४ तास वीजपुरवठा खंडित केला जातो. या भागात समुद्रकिनारी दमट हवामान आढळते. त्यामुळे वातावरणात वाहती हवा थांबली की, प्रचंड उकाडा जाणवतो. रात्रभर वीज नसल्याने अनेकांना झोपमोड सहन करावी लागली. महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात मोर्चा काढण्यात येईल, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील चिंचणी, वाणगाव, वरोर फिडर अंतर्गत पन्नास गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून वीजपुरवठा अनियमित आहे. त्यामुळे येथील लोकांच्या रोजगारावर त्याचा विपरीत परिणाम होत असून डायमेकिंग चा व्यवसाय कोलमडला आहे.नागरिक संतप्तडहाणूला वीजपुरवठा करणाºया बोईसर येथील १३२ के व्ही युनिटचे ब्रेक डाऊन झाल्याने गुरु वारी रात्री साडेसात वाजता वीजप्रवाह बंद झाला होता. महावितरण कंपनीने ग्राहकांना एसएमएस करून रात्री १ वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल असा संदेश पाठविला. मात्र, वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी दुसरा दिवस उजाडला. दि.१२ रोजी सकाळी ८ वाजता वीजपुरवठा सुरु करण्यात आला. त्यामुळे तालुक्यातील गावांमध्ये सुमारे १२ तास वीज नसल्याने नागरिक त्रस्त होते.