शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

चार महिन्यांचा थकला पगार

By admin | Updated: November 3, 2015 00:50 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ठेकेदारी पध्दतीवर काम करणाऱ्या ६१ कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासूनचे सुमारे ३० लाख रुपयांचे वेतन थकले आहे.

- आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ठेकेदारी पध्दतीवर काम करणाऱ्या ६१ कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासूनचे सुमारे ३० लाख रुपयांचे वेतन थकले आहे. सरकारकडे निधी नसल्याने २०१५-१६ या आर्थिक वर्षातील सुमारे दीड कोटी रुपये अद्यापही रायगड जिल्हा परिषदेकडे वर्ग केले नसल्याचे समोर आले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच निधी कमतरतेचा बार फुटल्याने कर्मचारी मात्र चांगलेच हादरले आहेत.२००५ सालापासूनच सरकारने कर्मचाऱ्यांच्या नवीन भरतीवर बंधने आणली आहेत. सध्याच्या सरकारनेही ठेकेदारी पध्दत सरकारी सेवेत मान्य केल्याने रायगड जिल्हा परिषदेमध्येही खासगी ठेकेदाराकडून आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली आहे. ३४ वाहन चालकांसह २९ सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. जून २०१५ मध्ये याबाबतची नवीन निविदा प्रक्रिया पार पडली होती. वाहन चालकांना १३ हजार ९०० प्रत्येकी आणि २९ सफाई कर्मचाऱ्यांना सुमारे १० हजार रुपये प्रत्येकी वेतन मंजूर केले आहे. एक वर्षासाठी सुमारे दीड कोटी रुपयांच्या निधीची मागणी सरकारकडे आरोग्य उपसंचालक यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मात्र सरकारकडे निधीची तरतूद नसल्याने त्यांच्याकडून निधी वर्ग झालेला नाही. सरकारकडून लवकरात लवकर निधी प्राप्त व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली.महिन्याच्या २५-२६ दिवस मेहनत करायची मात्र महिन्याच्या शेवटी मात्र हातात एकही रुपया पडत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ठेकेदाराकडे पगार मागितला तर तो म्हणतो आरोग्य विभागाने बिले काढलेलीच नाहीत. आरोग्य विभागाकडे निधी वर्ग झाला नसल्याने ते पगार देऊ शकत नाहीत. घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. दिवाळी काही दिवसांवरच येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे सण कसा साजरा करायचा अशा चिंतेत हे कर्मचारी आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी (प्रशासन) प्रकाश खोपकर यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.एक वर्षासाठी सुमारे दीड कोटी रुपयांच्या निधीची मागणी सरकारकडे आरोग्य उपसंचालक यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मात्र सरकारकडे निधीची तरतूद नसल्याने त्यांच्याकडून निधी वर्ग झालेला नाही. सरकारकडून लवकर निधी प्राप्त व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.