शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

तेलंगवाडीत भातशेतीवर वनविभागाची कारवाई! आदिवासी, श्रमजीवी संघटना करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 23:43 IST

कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीत तेलंगवाडी आदिवासीवाडी असून, येथील शेतकरी पूर्वीपासून भातशेती करत असतात; परंतु ते कसत असलेली जमीन ही वनविभागाच्या ताब्यात आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील तेलंगवाडी येथील आदिवासी बांधव वाडवडिलांपासून भातशेती करत आहेत; परंतु ही जागा वनविभागाच्या ताब्यात आहे. या जागेत पूर्वीपासून आदिवासी बांधव भातशेती लावत आहेत; परंतु कोणतीही सूचना न देता लावलेली भातशेती पोलिसांनी आणि वनविभागाने उद्ध्वस्त केली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर आदिवासी संघटना आणि श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे.कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीत तेलंगवाडी आदिवासीवाडी असून, येथील शेतकरी पूर्वीपासून भातशेती करत असतात; परंतु ते कसत असलेली जमीन ही वनविभागाच्या ताब्यात आहे. दरवर्षी आदिवासी बांधव तिथे भाताचे पीक घेत असतात; परंतु यावर्षी लावलेली भातशेती वनविभाग आणि पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना, नोटीस न देता भाताचे पीक मशिनने कापून आणि हातानेउद्ध्वस्त केले आहे. तसेच येथील आदिवासी बांधवांना पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप केला आहे.निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा- या सर्व प्रकारचा आदिवासी बांधवांनी निषेध केला असून आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. आदिवासी समाजावर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी, अन्याय दूर करण्यासाठी श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने सोमवारी कर्जत प्रांत कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. यात आचारसंहितेचा भंग झाल्यास हे वन अधिकारी आणि पोलीस जबाबदार राहतील, असा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे. तसेच आमच्या शेतीच्या नुकसानीची भरपाई त्वरित न दिल्यास आम्ही सर्व आदिवासी बांधव मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशाराही आदिवासी बांधवांनी दिला आहे.तेलंगवाडी येथे वाडवडिलांपासून आम्ही भातशेती करत आहोत. ती जागा वनविभागच्या अखत्यारित येते; परंतु शेती लावण्याच्या अगोदर जर सूचना दिली असती तर शेती लावली नसती. पीक तयार झाल्यानंतर वनविभाग आणि पोलिसांनी ही भातशेती उद्ध्वस्त केली असल्याने आमच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या संदर्भात आम्ही पोलीस आणि वनविभागाच्या विरोधात आंदोलन करणार आहोत.- जानू मोतीराम पादीर, शेतकरी, तेलंगवाडीवनविभागाने अतिक्रमण काढण्यासंदर्भात लेखी पोलीस स्टेशनला कळविले होते, त्यानुसार बंदोबस्त देण्यात आला होता. भातशेती काढून टाकण्याची कारवाई वनविभागाने केली आहे.- केतन सांगळे, पोलीस उपनिरीक्षक, नेरळतेलंगवाडी हद्दीत ३३ कोटी वृक्ष अंतर्गत १३ हजार रोपांची लागवड केली आहे. त्या लागवडीमध्ये आदिवासींनी भात लागवड केली आहे. या संदर्भात त्यांना अनेक वेळा सूचना केल्या होत्या. वन हक्क कायद्यांतर्गत तक्रारी किंवा दावा दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. मंजुरीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवून देऊ, असेदेखील सांगण्यात आले होते; परंतु तसे काही त्यांनी केले नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.- जे. एम. सुपे, वनपाल, बोरगाव

टॅग्स :Raigadरायगड