शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
4
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
5
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
7
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
8
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
9
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
10
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
11
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
12
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
13
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
14
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
15
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
16
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
17
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
18
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
19
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
20
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगवाडीत भातशेतीवर वनविभागाची कारवाई! आदिवासी, श्रमजीवी संघटना करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 23:43 IST

कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीत तेलंगवाडी आदिवासीवाडी असून, येथील शेतकरी पूर्वीपासून भातशेती करत असतात; परंतु ते कसत असलेली जमीन ही वनविभागाच्या ताब्यात आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील तेलंगवाडी येथील आदिवासी बांधव वाडवडिलांपासून भातशेती करत आहेत; परंतु ही जागा वनविभागाच्या ताब्यात आहे. या जागेत पूर्वीपासून आदिवासी बांधव भातशेती लावत आहेत; परंतु कोणतीही सूचना न देता लावलेली भातशेती पोलिसांनी आणि वनविभागाने उद्ध्वस्त केली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर आदिवासी संघटना आणि श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे.कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीत तेलंगवाडी आदिवासीवाडी असून, येथील शेतकरी पूर्वीपासून भातशेती करत असतात; परंतु ते कसत असलेली जमीन ही वनविभागाच्या ताब्यात आहे. दरवर्षी आदिवासी बांधव तिथे भाताचे पीक घेत असतात; परंतु यावर्षी लावलेली भातशेती वनविभाग आणि पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना, नोटीस न देता भाताचे पीक मशिनने कापून आणि हातानेउद्ध्वस्त केले आहे. तसेच येथील आदिवासी बांधवांना पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप केला आहे.निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा- या सर्व प्रकारचा आदिवासी बांधवांनी निषेध केला असून आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. आदिवासी समाजावर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी, अन्याय दूर करण्यासाठी श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने सोमवारी कर्जत प्रांत कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. यात आचारसंहितेचा भंग झाल्यास हे वन अधिकारी आणि पोलीस जबाबदार राहतील, असा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे. तसेच आमच्या शेतीच्या नुकसानीची भरपाई त्वरित न दिल्यास आम्ही सर्व आदिवासी बांधव मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशाराही आदिवासी बांधवांनी दिला आहे.तेलंगवाडी येथे वाडवडिलांपासून आम्ही भातशेती करत आहोत. ती जागा वनविभागच्या अखत्यारित येते; परंतु शेती लावण्याच्या अगोदर जर सूचना दिली असती तर शेती लावली नसती. पीक तयार झाल्यानंतर वनविभाग आणि पोलिसांनी ही भातशेती उद्ध्वस्त केली असल्याने आमच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या संदर्भात आम्ही पोलीस आणि वनविभागाच्या विरोधात आंदोलन करणार आहोत.- जानू मोतीराम पादीर, शेतकरी, तेलंगवाडीवनविभागाने अतिक्रमण काढण्यासंदर्भात लेखी पोलीस स्टेशनला कळविले होते, त्यानुसार बंदोबस्त देण्यात आला होता. भातशेती काढून टाकण्याची कारवाई वनविभागाने केली आहे.- केतन सांगळे, पोलीस उपनिरीक्षक, नेरळतेलंगवाडी हद्दीत ३३ कोटी वृक्ष अंतर्गत १३ हजार रोपांची लागवड केली आहे. त्या लागवडीमध्ये आदिवासींनी भात लागवड केली आहे. या संदर्भात त्यांना अनेक वेळा सूचना केल्या होत्या. वन हक्क कायद्यांतर्गत तक्रारी किंवा दावा दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. मंजुरीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवून देऊ, असेदेखील सांगण्यात आले होते; परंतु तसे काही त्यांनी केले नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.- जे. एम. सुपे, वनपाल, बोरगाव

टॅग्स :Raigadरायगड