शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:32 IST

निवडणूक विभागाकडून मुदतीबाबत संभ्रम; नोंदणीचा कालावधी स्पष्ट नसल्याने तक्रारी

- योगेश पिंगळेनवी मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतिम टप्प्यात निवडणूक यादीमध्ये नव्याने नाव नोंदविण्यासाठी मतदार निवडणूक कोकण भवन येथील कार्यालयात जात आहेत, परंतु अंतिम तारीख संपली असून नवीन नोंदणी बंद असल्याचे सांगण्यात येत असल्याने मतदारांच्या पदरी निराशा पडत आहे. यामुळे नाव नोंदणीच्या मुदतीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम पसरला असून नाव नोंदणीच्या कालावधीची स्पष्टता नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्र म जाहीर केला आहे. नवी मुंबई शहरातील अनेक मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज भरले आहेत, परंतु यादीमध्ये अद्याप नावे समाविष्ट झालेली नाहीत. तसेच आॅनलाइन अर्ज भरताना अडचणी येत असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदार फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रांसह थेट मतदान कार्यालयात धाव घेत आहेत. परंतु या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्या असून नाव नोंदणीची तारीख संपल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मतदारांमध्ये नाराजी पसरत असून समाज माध्यमांमध्ये नोंदणी सुरू असल्याच्या बातम्या यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.१ जानेवारी २0१९ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरु ण मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून अनेक वेळा आॅफलाइन नोंदणी करूनही मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट न झालेल्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवी मुंबई शहरातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु नोंदणी होत नसल्याने पुन्हा या मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे.नोंदणी सुरू असल्याचा प्रशासनाचा दावानवीन मतदार नोंदणीसाठी आॅनलाइन आणि आॅफलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याचा दावा नायब तहसीलदार नाथजी सगट यांनी केला असून नव्याने नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना जुन्या ठिकाणी असलेले नाव कमी करण्याचा सल्ला दिला जात आहे.नवीन नावाची नोंदणी करताना इतर ठिकाणच्या मतदार यादीमधील नाव असल्यास सदर नाव कमी करण्यासाठी देखील फॉर्म भरून घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.आॅनलाइन नोंदणी होत नसल्याने आॅफलाइन मतदार नोंदणीसाठी कोकण भवन येथील निवडणूक कार्यालयात अनेक नागरिक येत आहेत, परंतु नवीन नोंदणी बंद झाल्याचे सांगून नागरिकांना परत पाठविले जात आहे. याबाबत बराच वेळ वाद झाल्यावर नोंदणी बंद असल्याचे मी येथील अधिकाऱ्यांना लेखी मागितले त्यानंतर माझ्या नावाची नोंदणी करून घेतली. अधिकाºयांकडून मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार निवडणूक कार्यालयात घडत असून हे चुकीचे आहे.- व्ही.टी.पवार, नागरिक सीवूड

टॅग्स :Votingमतदान