शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:32 IST

निवडणूक विभागाकडून मुदतीबाबत संभ्रम; नोंदणीचा कालावधी स्पष्ट नसल्याने तक्रारी

- योगेश पिंगळेनवी मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतिम टप्प्यात निवडणूक यादीमध्ये नव्याने नाव नोंदविण्यासाठी मतदार निवडणूक कोकण भवन येथील कार्यालयात जात आहेत, परंतु अंतिम तारीख संपली असून नवीन नोंदणी बंद असल्याचे सांगण्यात येत असल्याने मतदारांच्या पदरी निराशा पडत आहे. यामुळे नाव नोंदणीच्या मुदतीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम पसरला असून नाव नोंदणीच्या कालावधीची स्पष्टता नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्र म जाहीर केला आहे. नवी मुंबई शहरातील अनेक मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज भरले आहेत, परंतु यादीमध्ये अद्याप नावे समाविष्ट झालेली नाहीत. तसेच आॅनलाइन अर्ज भरताना अडचणी येत असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदार फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रांसह थेट मतदान कार्यालयात धाव घेत आहेत. परंतु या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्या असून नाव नोंदणीची तारीख संपल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मतदारांमध्ये नाराजी पसरत असून समाज माध्यमांमध्ये नोंदणी सुरू असल्याच्या बातम्या यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.१ जानेवारी २0१९ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरु ण मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून अनेक वेळा आॅफलाइन नोंदणी करूनही मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट न झालेल्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवी मुंबई शहरातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु नोंदणी होत नसल्याने पुन्हा या मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे.नोंदणी सुरू असल्याचा प्रशासनाचा दावानवीन मतदार नोंदणीसाठी आॅनलाइन आणि आॅफलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याचा दावा नायब तहसीलदार नाथजी सगट यांनी केला असून नव्याने नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना जुन्या ठिकाणी असलेले नाव कमी करण्याचा सल्ला दिला जात आहे.नवीन नावाची नोंदणी करताना इतर ठिकाणच्या मतदार यादीमधील नाव असल्यास सदर नाव कमी करण्यासाठी देखील फॉर्म भरून घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.आॅनलाइन नोंदणी होत नसल्याने आॅफलाइन मतदार नोंदणीसाठी कोकण भवन येथील निवडणूक कार्यालयात अनेक नागरिक येत आहेत, परंतु नवीन नोंदणी बंद झाल्याचे सांगून नागरिकांना परत पाठविले जात आहे. याबाबत बराच वेळ वाद झाल्यावर नोंदणी बंद असल्याचे मी येथील अधिकाऱ्यांना लेखी मागितले त्यानंतर माझ्या नावाची नोंदणी करून घेतली. अधिकाºयांकडून मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार निवडणूक कार्यालयात घडत असून हे चुकीचे आहे.- व्ही.टी.पवार, नागरिक सीवूड

टॅग्स :Votingमतदान