शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वाहतुकीच्या नियमांचे पालन करा

By admin | Updated: January 21, 2016 02:40 IST

धकाधकीच्या जीवनात माणसाकडे कामे खूप आणि वेळ कमी पडू लागला आहे. झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे माणूस माणसापासून

धाटाव : धकाधकीच्या जीवनात माणसाकडे कामे खूप आणि वेळ कमी पडू लागला आहे. झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे माणूस माणसापासून अधिकच दूर जात असल्याचे जाणवू लागले आहे. दळणवळणासाठी गाव तिथे रस्त्याचा विकास होत असल्याने कित्येक गावे रस्त्यांमुळे एकमेकांना जोडली आहेत. यामुळे दिवसेंदिवस रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत अधिकच वाढ होत असल्याचे दिसते. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हीच काळाची गरज आहे, असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते संजय वाढवळ यांनी व्यक्त केले.अपघातात निरपराधांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र काहींना गंभीर दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व घेऊन जगावे लागत आहे. तर अनेकांची कुटुंबे बेघर झाल्याचे ऐकावयास मिळत आहेत, असे वाढवळ म्हणाले. वरदायिनी हायस्कूल महागाव येथे इ. ८ वी ते १० वीच्या विद्यार्थी वर्गाला नुकत्याच आयोजित रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्र मात अपघातातून सावधानता कशा प्रकारे बाळगावी या संदर्भात संबोधिताना ते बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापक सागडे, खिलारे यांसह सर्व कर्मचारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढवळ म्हणाले की, ८० टक्के अपघात हे माणसअच्या चुकांमुळे होतात. मोबाइल कानाला लावून वाहन चालवणे, मोबाइलच्या हेडफोनवरु न गाणी ऐकणे तर काही अपघात तंबाखू सेवन व मद्यपान करीत ओव्हरटेक करताना होत आहेत. मात्र या व्यतिरिक्त सध्या तरुणाईला सेल्फीचे वेड लागल्यामुळे डोंगरदऱ्या- खोऱ्यातून जीवाची तमा न बाळगता फोटो काढताना अनेक जणांना जीव गमवावा लागत आहे. (वार्ताहर)