शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीकरिता शेकापने केला पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:05 IST

राज्यात पुरोगामी विचार टिकवण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे. राज्याच्या राजकारणात देखील शेकापची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे.

नेरळ : राज्यात पुरोगामी विचार टिकवण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे. राज्याच्या राजकारणात देखील शेकापची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. शेतकरी कर्जमाफीकरिता शेकापने सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीमध्ये देखील सरकारला शेकापला स्थान द्यावे लागल्याचे प्रतिपादन शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाचा ७० वा वर्धापन दिन २ आॅगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात साजरा करण्यात आला, यावेळी आ.पाटील बोलत होते.कोकण पदवीधर मतदार संघासह यंदा झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेकापने बाजी मारली आहे. विजयाची ही परंपरा कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना सन १९२५ मध्ये झाली आणि देशाला स्वातंत्र्य सन १९४७ ला मिळाले, मात्र देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत या बावीस वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही हुतात्मा झाला नाही किंवा स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा काही सहभाग राहिला नाही. ब्रिटिशधार्जिणी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यावेळी स्वीकारल्याने ही परिस्थिती होती, हा इतिहास विचारात घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आ.जयंत पाटील यांनीके ले.यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी प्रास्ताविकात मागील काळात पार पडलेल्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाने देदीप्यमान कामगिरी केली. कर्जत, माणगाव, पनवेल या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले, तसेच अलिबाग, पेण, उरण खोपोली, मुरु ड व श्रीवर्धनमध्येही पक्षाला चांगले यश मिळाले असून जिल्हा परिषद निवडणुकीत ५९ जागांपैकी २३ जागांवर विजय मिळविण्यात यश आले, त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. त्यानंतर अनेक तालुका आणि जिल्हा चिटणीस पदांवर नियुक्त्या केलेल्यांची नावे जाहीर यावेळी करण्यातआली.यावेळी आमदार बाळाराम पाटील,आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार विवेक पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जे. एम. म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.