शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

शेतकरी कर्जमाफीकरिता शेकापने केला पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:05 IST

राज्यात पुरोगामी विचार टिकवण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे. राज्याच्या राजकारणात देखील शेकापची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे.

नेरळ : राज्यात पुरोगामी विचार टिकवण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे. राज्याच्या राजकारणात देखील शेकापची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. शेतकरी कर्जमाफीकरिता शेकापने सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीमध्ये देखील सरकारला शेकापला स्थान द्यावे लागल्याचे प्रतिपादन शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाचा ७० वा वर्धापन दिन २ आॅगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात साजरा करण्यात आला, यावेळी आ.पाटील बोलत होते.कोकण पदवीधर मतदार संघासह यंदा झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेकापने बाजी मारली आहे. विजयाची ही परंपरा कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना सन १९२५ मध्ये झाली आणि देशाला स्वातंत्र्य सन १९४७ ला मिळाले, मात्र देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत या बावीस वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही हुतात्मा झाला नाही किंवा स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा काही सहभाग राहिला नाही. ब्रिटिशधार्जिणी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यावेळी स्वीकारल्याने ही परिस्थिती होती, हा इतिहास विचारात घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आ.जयंत पाटील यांनीके ले.यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी प्रास्ताविकात मागील काळात पार पडलेल्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाने देदीप्यमान कामगिरी केली. कर्जत, माणगाव, पनवेल या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले, तसेच अलिबाग, पेण, उरण खोपोली, मुरु ड व श्रीवर्धनमध्येही पक्षाला चांगले यश मिळाले असून जिल्हा परिषद निवडणुकीत ५९ जागांपैकी २३ जागांवर विजय मिळविण्यात यश आले, त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. त्यानंतर अनेक तालुका आणि जिल्हा चिटणीस पदांवर नियुक्त्या केलेल्यांची नावे जाहीर यावेळी करण्यातआली.यावेळी आमदार बाळाराम पाटील,आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार विवेक पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जे. एम. म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.