शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

आक्षी गावांतील पाटील कुंटूंबातील पाच जणांनी केले विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 16:24 IST

दिड वर्षाच्या स्वराज आणि स्वरालीची प्रकृती चिंताजनक

जयंत धुळप 

अलिबाग जवळच्याच आक्षी गावांतील पाटील कुटूंबातील पाच सदस्यांनी विष प्राषन केल्याने ते त्यांच्याच घरात  बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अत्यावस्थ अवस्थेत असल्याचे शेजारच्यांना लक्षात आल्यावर शेजारी मंडळींनी या पाचही जणांना तत्काळ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती अलिबाग उप विभागीय पाेलीस अधिकारी दत्तात्रेय निघाेट यांनी दिली आहे.

दिड वर्षाच्या स्वराज आणि स्वराली यांना मुंबईस नेण्याची तयारी

विष प्राशन केलेल्या पाटील कुंटूंबातील या पाच सदस्यांमध्ये रामचंद्र दत्तात्रेय पाटील(६०), त्यांची पत्नी रंजना रामचंद्र पाटील(५०), सून कविता राहूल पाटील(२५), नातू स्वराज राहूल पाटील(दिड वर्ष) आणि नात स्वराली राहूल पाटील(दिड वर्ष) यांचा समावेश आहे. सर्वांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. विष प्राषन केलेल्यांपैकी नातू स्वराज राहूल पाटील(दिड वर्ष) आणि नात स्वराली राहूल पाटील(दिड वर्ष) या दाेघांच्या डाेक्या पर्यंत विष पाेहाेचले असल्याचा निष्कर्श वैद्यकिय अदिकार्‍यांचा असल्याने या दाेघांची प्रकृती चिंताजनक आहे. परिणामी त्या दाेघांना मुंबईच्या जे.जे.रुग्णालयात हलवावे लागणार असल्याची माहिती अलिबाग पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरिक्षक दशरथ पाटील यांनी दिली.

विष का प्राशन केले याचा शाेध घेत आहेत पाेलीसपाटील कुटूंबियांनी हे विषप्राशन मंगळवारी रात्री केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घरामध्ये विष सदृष रसायनाची २५० एमएलची एक रिकामी बाटली व एक भरलेली बाटली पाेलीसांना प्राप्त झाली आहे. मात्र हेच नेमके विष त्यांनी प्राषन केले वा अन्य या बाबत मात्र अद्याप सुस्पष्टता हाेवू शकलेली नाही. दरम्यान पाटील कुटूंबियांनी विष मुळात का प्राशन केले हे पाेलीस तपासांतीच स्पष्ट हाेवू शकणार आहे.

१०८ क्रमांकाची सरकारी रुग्णवाहीका आणि रुग्णवाहीकेत जाण्यासाठी डाॅक्टर नाही

जिल्हा रुग्णालयातील आराेग्य सेवेतील ढिसाळपणा या आपत्कालीन परिस्थितीतही उपस्थितांना अनूभवास आला. अत्यावस्थ रुग्णांना तत्काळ मुंबईला घेवून जाण्याकरिता १०८ क्रमांकाची सरकारी रुग्णवाहीका अपेक्षीत हाेती परंतू ती उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णवाहीका घेण्याचा पर्याय जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सांगीतला. तर अत्यावस्थ रुग्णां साेबत रुग्णवाहीकेत डाॅक्टर देणे आवश्यक असल्याचे अलिबाग उप विभागीय पाेलीस अधिकारी दत्तात्रेय निघाेट यांनी सांगीतल्यावर सरकारी डाॅक्टर उपलब्ध नसल्याने खाजगी डाॅक्टर घेवून जावा लागेल, त्यांचे पैसे रुग्णांच्या नातेवाईकांना द्यावे लागतील, असे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगीतले.