शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

मोठ्या जहाजांमुळे मासेमारीला बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:18 IST

दिघी बंदरामुळे अडचण; पारंपरिक मासेमारी धोक्यात

दिघी : एकीकडे पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ‘सागरमाला’ प्रकल्पातून सरकारने परिणामकारक पावले उचलली आहेत. यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील दिघी येथील रोजगार मिळवून देणारी पारंपरिक मासेमारी समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे. श्रीवर्धन तालुक्यालगत राजपुरी खाडीवर उभे राहत असलेले दिघी बंदर हे पारंपरिक मासेमारीला घातक ठरणार या काळजीने दिघी, आगरदांडा व राजपुरी परिसरातील मच्छीमार चिंताग्रस्त आहेत.दिघी या पारंपरिक बंदर खासगीकरणातून विकास या संकल्पनेतून अत्याधुनिक बंदर उभारण्याचा प्रकल्प बालाजी लिझिंग अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेड ही कंपनी विकसित करत आहे. दिघी बंदर अद्याप ५० टक्केही विकसित झाले नाही. सध्या सुरू असलेला महाकाय जहाजांचा प्रवास यामुळे कालांतराने सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर बंदी घातली जाणार आहे. ही भीती भूमिपुत्रांच्या मनात घर करून आहे. अतिशय कमी भावात दिघी पोर्टसाठी आपल्या जमिनी देताना असा विचारही जमीनदारांच्या मनात आला नव्हता. या प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी त्यांना विविध आश्वासने देण्यात आली होती. त्यात गावातील सुविधा स्थानिकांना रोजगार यासह स्थानिकांना ठेके देऊन येथील तरुणांना स्वयंपूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले होते. या गोष्टींची पूर्तता अद्याप झालेली नाही. कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक तरु णांची फसवणूक केली आहे, त्यामुळे कंपनीच्या विरोधात नाराजी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावातील अनेक स्थानिक या समुद्रामध्ये पारंपरिक पद्धतीने किंवा छोट्या होडीने मच्छीमारी करून उपजीविका करतात. दरम्यान, वातावरणातील बदल, अवेळी वादळाची हजेरी, मासेमारी दुष्काळ होत असताना कंपनीच्या धोरणामुळे पारंपरिक मासेमारी करणाºयांवर उपासमारीची वेळ येणार आहे.दिघी बंदरात गेल्या पाच-सहा वर्षांपासून मोठी जहाजे येत आहेत. ही जहाजे येत असताना दिघी गावातील मच्छीमार बांधवांनी मच्छीसाठी टाकलेली जाळी व डोलवी तुटली जातात, त्यामुळे जाळ्याचे व मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पूर्वी दिघी पोर्ट प्रत्येक जहाजामागे नुकसानभरपाई देत होते. मात्र, सध्या अशी कोणतीही नुकसानभरपाई देत नाही. दिघी बंदरामुळे दिघी गावातील मच्छीमारी करणारी ६० कुटुंबे बाधित झाली आहेत.दिघी बंदरात महाकाय जहाजांच्या होणाºया वाहतुकीमुळे आम्हा मच्छीमारांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, कुणीही मदतीला येत नाही. वेळोवेळी होणाºया नुकसानभरपाईसाठी कंपनीकडून विचारलेसुद्धा जात नाही.- बाळाराम खेलोजी,दिघी कोळी समाज अध्यक्ष

टॅग्स :fishermanमच्छीमार