शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

मोठ्या जहाजांमुळे मासेमारीला बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:18 IST

दिघी बंदरामुळे अडचण; पारंपरिक मासेमारी धोक्यात

दिघी : एकीकडे पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ‘सागरमाला’ प्रकल्पातून सरकारने परिणामकारक पावले उचलली आहेत. यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील दिघी येथील रोजगार मिळवून देणारी पारंपरिक मासेमारी समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे. श्रीवर्धन तालुक्यालगत राजपुरी खाडीवर उभे राहत असलेले दिघी बंदर हे पारंपरिक मासेमारीला घातक ठरणार या काळजीने दिघी, आगरदांडा व राजपुरी परिसरातील मच्छीमार चिंताग्रस्त आहेत.दिघी या पारंपरिक बंदर खासगीकरणातून विकास या संकल्पनेतून अत्याधुनिक बंदर उभारण्याचा प्रकल्प बालाजी लिझिंग अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेड ही कंपनी विकसित करत आहे. दिघी बंदर अद्याप ५० टक्केही विकसित झाले नाही. सध्या सुरू असलेला महाकाय जहाजांचा प्रवास यामुळे कालांतराने सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर बंदी घातली जाणार आहे. ही भीती भूमिपुत्रांच्या मनात घर करून आहे. अतिशय कमी भावात दिघी पोर्टसाठी आपल्या जमिनी देताना असा विचारही जमीनदारांच्या मनात आला नव्हता. या प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी त्यांना विविध आश्वासने देण्यात आली होती. त्यात गावातील सुविधा स्थानिकांना रोजगार यासह स्थानिकांना ठेके देऊन येथील तरुणांना स्वयंपूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले होते. या गोष्टींची पूर्तता अद्याप झालेली नाही. कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक तरु णांची फसवणूक केली आहे, त्यामुळे कंपनीच्या विरोधात नाराजी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावातील अनेक स्थानिक या समुद्रामध्ये पारंपरिक पद्धतीने किंवा छोट्या होडीने मच्छीमारी करून उपजीविका करतात. दरम्यान, वातावरणातील बदल, अवेळी वादळाची हजेरी, मासेमारी दुष्काळ होत असताना कंपनीच्या धोरणामुळे पारंपरिक मासेमारी करणाºयांवर उपासमारीची वेळ येणार आहे.दिघी बंदरात गेल्या पाच-सहा वर्षांपासून मोठी जहाजे येत आहेत. ही जहाजे येत असताना दिघी गावातील मच्छीमार बांधवांनी मच्छीसाठी टाकलेली जाळी व डोलवी तुटली जातात, त्यामुळे जाळ्याचे व मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पूर्वी दिघी पोर्ट प्रत्येक जहाजामागे नुकसानभरपाई देत होते. मात्र, सध्या अशी कोणतीही नुकसानभरपाई देत नाही. दिघी बंदरामुळे दिघी गावातील मच्छीमारी करणारी ६० कुटुंबे बाधित झाली आहेत.दिघी बंदरात महाकाय जहाजांच्या होणाºया वाहतुकीमुळे आम्हा मच्छीमारांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, कुणीही मदतीला येत नाही. वेळोवेळी होणाºया नुकसानभरपाईसाठी कंपनीकडून विचारलेसुद्धा जात नाही.- बाळाराम खेलोजी,दिघी कोळी समाज अध्यक्ष

टॅग्स :fishermanमच्छीमार