शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

हवामान बदलामुळे मुरुडमधील मच्छीमारांची घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 00:03 IST

वादळी वारा सुरू झाल्याने होड्या किनाऱ्यावर

मुरुड : मागील चार दिवसांपासून मुरुड तालुक्यात पावसाळी वातावरण असल्यामुळे समुद्राला मोठी भरती आलेली आहे, त्यामुळे खोल समुद्रात गेलेल्या बोटी या स्थिर राहत नाहीत. त्याचबरोबर वाºयाचा वेग वाढल्याने मुरुड तालुक्यातील होड्यांची घरवापसी झाली आहे. अचानक हवामानात बदल झाल्याने ऐन दिवाळीत मच्छीमारांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. गणपती उत्सवादरम्यान जी स्थती निर्माण झाली होती तीच परिस्थिती दिवाळीत झाल्याने सणासुदीच्या काळात समस्त कोळी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे.

मुरुड तालुक्यात ६५० यांत्रिकी व बिगर यांत्रिकी होड्या असून, वेगाने सुटणार वारा व समुद्रातील पाणी खवळल्यामुळे कोणतीही होडी स्थिर राहत नसल्याने, त्याचप्रमाणे जाळी पाण्यात टाकली असता खवळलेल्या समुद्रामुळे सर्व होड्या आगरदांडा व राजपुरी खाडीत परतल्या आहेत. खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी बर्फ , डिझेल व भोजनासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन निघालेल्या बोटी अचानक हवामान बदलामुळे जेमतेम दोन दिवसांत माघारी यावे लागले.

एका बोटीला सर्व साहित्य खरेदीसाठी किमान ७० हजार रुपयांचा खर्च येत असतो; परंतु बोटी या वेळी लवकर आल्याने हा खर्च कोळी बांधवांना न परवडणारा आहे. आगरदांडा व राजपुरी बंदरात पुन्हा बोटीच बोटी दिसत आहेत. एकाच पावसाळ्यात तीन वेळा मच्छीमारांनापुन्हा किनारा गाठावा लागल्याने मच्छीमारांवर उपासमारीची पाळी आली आहे.

या सर्व संकटांना मच्छीमारांना तोंड द्यावे लागत असतानाच डिझेल परतावा रक्कमसुद्धा शासनाकडून प्राप्त झालेली नाही. २०१७ ते २०१९ अशा तीन वर्षांचा परतावासुद्धा देण्यात न आल्याने कोकणातील समस्त कोळी बांधवांची स्थिती चिंताजनक झाली आहे. तीन वर्षांत डिझेल परतावा न मिळाल्यामुळे मच्छीमार संस्थांची स्थितीसुद्धा बिकट झाली आहे. समुद्रात मासळी मिळत नाही, त्याचप्रमाणे एकाच पावसात तीन वेळा तुफान आल्याने बोटी किनाºयाला आल्याने मच्छीमारांची स्थिती नाजूक झाली आहे.

एकाच पावसाळी हंगामात तीन वेळा हवामानाच्या बदलामुळे मच्छीमारांना किनारा गाठावा लागला आहे. त्यामुळे बोटी ज्या वेळी खोल समुद्रात जात असतात, त्या वेळी सर्व साहित्य घेऊन जात असताना अचानक हवामानाच्या या बदलामुळे लाखो रुपयांचे नुकसान कोळी बांधवांचे झाले आहे. त्याचप्रमाणे मागील तीन वर्षांपासून कोळी बांधवाना परतावा मिळाला नाही. तरी हा डिझेल परतावा लवकरात लवकर मिळण्यासाठी कोळी बांधवांना शासनाकडून परतावा मिळण्यासाठी मदत करावी, जेणेकरून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या समाजाला मदतीचा हात मिळू शकेल.- मनोहर मकू , उपाध्यक्ष,सागरकन्या मच्छीमार संस्था

टॅग्स :fishermanमच्छीमार