शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

मच्छीमार आर्थिक संकटात

By admin | Updated: November 19, 2015 00:26 IST

परराज्यातील मासेमारी करणारे तर दुसरीकडे वेळेत डिझेल परतावा मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील परंपरागत मच्छीमार व्यावसायिक आर्थिक संकटात बुडाले आहेत.

- आविष्कार देसाई,  अलिबागपरराज्यातील मासेमारी करणारे तर दुसरीकडे वेळेत डिझेल परतावा मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील परंपरागत मच्छीमार व्यावसायिक आर्थिक संकटात बुडाले आहेत. पर्साेनेटच्या माध्यमातून होणारी मासेमारी त्वरित थांबवावी आणि सुमारे ५० लाख रुपयांचा डिझेलचा परतावा तातडीने द्यावा, अशी मागणी अलिबाग येथील मच्छीमार व्यावसायिकांची आहे.अलिबागसह मुरुड, उरण, श्रीवर्धन येथील मच्छीमार व्यावसायिकांचीही अशीच बिकट अवस्था असल्याने सर्व मच्छीमार आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगड जिल्हा हा पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा तसाच मासेमारीसाठी प्रसिध्द होता. कालांतराने जिल्ह्यात औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. जिल्ह्यात झपाट्याने मोठ्या संख्येने कारखाने निर्माण झाले. उद्योगांसाठी जमिनी जात असतानाच विविध कारखान्यांमुळे नद्या आणि समुद्राचे पाणी प्रदूषणाची फार मोठी समस्या निर्माण झाली. त्यामुळे मच्छीमारी करणाऱ्यांना मासे कमी प्रमाणात मिळू लागले. रायगड जिल्ह्यामध्ये उरण, रेवस, करंजा, मांडवा, नवगाव, थळ, वरसोली, अलिबाग, नागाव, साखर, रेवदंडा, मुरुड, श्रीवर्धन या चॅनेलमध्ये स्थानिक मच्छीमारी व्यावसायिक मासेमारी करीत आहेत. याच चॅनेलमध्ये आता कर्नाटक आणि गुजरात राज्यातील तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्यांनी हातपाय पसरले आहेत. त्यांच्याकडे आधुनिक बोटी असून बहुतांश मासेमारी व्यावसायिक हे पर्साेनेट जाळ््याने मासेमारी करतात. त्यामुळे कमी वेळेत मोठ्या संख्येने मासेमारी करुन कोट्यवधी रुपये कमवित आहेत.स्थानिक मच्छीमारी करणाऱ्यांकडे मोठ्या संख्येने आधुनिक बोटी नाहीत. ते परंपरागत म्हणजे डोल, गळ, दालदी, मगरमच्छ पध्दतीने मासेमारी करतात. परंपरागत पध्दतीने मासेमारी करणाऱ्यांच्या चॅनेलमध्ये परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील मासेमारी करणारे येत असल्याने परंपरागत मासेमारी करणारे संकटात सापडले असल्याचे अलिबाग शहर कोळी समाजाचे अध्यक्ष प्रकाश भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्राप्तीनुसार संस्थांना मिळणार रक्कमसहायक आयुक्त अविनाश नाखवा हे कामानिमित्त बाहेर होते. त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, डिझेल परताव्याची रक्कम सरकारकडून प्राप्त होते तशी संस्थांना दिली जाते, असे सांगितले.