शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
2
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
3
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
4
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
5
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
6
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
7
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
8
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
9
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
10
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
11
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
12
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
13
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
14
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
15
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
16
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
17
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
18
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
19
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
20
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?

हिराकोटमधील माशांना मिळणार जीवदान

By निखिल म्हात्रे | Updated: January 6, 2024 12:47 IST

मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकाऱ्यांनी हिराकोट तलावाची पाहणी केली.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या हिरकोट तलावातील माशांचे संवर्धन केले जाणार आहे. माशांना बाहेरून देण्यात येणारे खाद्य पुर्णपणे थांबविण्यात यावे अशा सुचना मस्त्य विभागाने अलिबाग नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या आहेत.दे मत्स्यव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त संजय पाटील यांनी अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना याबाबतचे पत्रच सादर केले आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकाऱ्यांनी हिराकोट तलावाची पाहणी केली असता सदर पाहणी दरम्यान तळयातील पाण्याचे विविध गुणधम पासण्यात आले. तसेच मेलेल्या तिलापिया माश्याचे नमुने घेण्यात आले की, पाण्याचा रंग हा हरवा झालेला असून पाण्यामध्ये वनस्पती प्लवंगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याने पाण्यातील प्राणवायुचे प्रमाण कमी झालेले आहे. एकंदरीत पाण्याचा दर्जा बिघडत असल्याचे जाणवते. मरतुक झालेल्या तिलापिया माश्यांना आजार झाल्याचे दिसून आलेले आहेत. तसेच माशांच्या कल्ल्यांचे निरीक्षण केले असता पाण्यामध्ये कमी प्रमाणामध्ये विरघळलेला प्राणवायू असल्याचे जाणवत आहे.

अशी परिस्थिती पाहता, पाण्यामधील प्राणवायूची मागणी कमी करण्यासाठी पाण्यामध्ये असलेलाा मत्स्यसाठा ५०% कमी करणे आवश्यक आहे. जेणेकरून सद्यस्थितीत पाण्यात असलेला प्राणवायू उर्वरीत माशांना पुरेसा ठरून माशांचे मृत्यू होण्याचे प्रमाण थांबेल असा दावाही या पत्रातून करण्यात आला आहे. मृत्यूमुखी पडलेले मासे होणारे मासे तात्काळ काढून टाकण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळाची तरतूद केले जावी. जेणेकरून त्यांच्या कुजण्याच्या क्रियेमुळे तलावातील पाणी दर्जाहीन होणार नाही व इतर माशांना होणारा संसर्ग कमी करता येईल. लोक त्यांच्या घरातील शोभेच्या माशांच्या टाक्यांमधील मासे तलावात सोडत असावेत, यास देखिल अटकाव करावा, असेही मत्स्य विभागाच्या पत्रात नमूद केलेले आहे.बाहेरचे खाद्य बंद करा -

माशांना बाहेरून देण्यात येत असलेले खाद्य देणे तात्काळ थांबवावे. पाण्याचा हिरवा रंग जाण्यासाठी तातडीची उपाय म्हणून सकाळी ९ वाजता १०० लीटर ताजे गोडे पाणी एका बॅलरमध्ये (२०० लि.) घ्यावे त्यात १० घस साखर १० घस तांदळाचे पीठ मिस्क करावे. त्यानंतर ३ ते ४ तासोनो काठीने हलवावे.  ४८ तासांनी हे द्रावण तळावात सगळीकडे फिरुन टाकावे. भविष्यात तळावातील पाण्याचा, मातीचा दर्जा चांगला राहावा यासाठी हे द्रावण नियमीतपणे वापरणे उपयुक्त होईल, अशी सुचनाही करण्यात आली.

टॅग्स :alibaugअलिबाग