शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

अलिबाग : आधी गुन्हे मागे घ्या मगच चर्चा; भूमिपुत्र शेतकऱ्याचा पावित्रा

By राजेश भोस्तेकर | Updated: November 9, 2022 18:07 IST

बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी मुरुड तालुक्यातील १४ गावातील भूमिपुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर १ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता.

अलिबाग : बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी मुरुड तालुक्यातील १४ गावातील भूमिपुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर १ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता. त्यानंतर भूमिपुत्रांसोबत १० नोव्हेंबर रोजी चर्चा करण्याबाबत प्रशासनाकडून पत्र संघटनेला पाठविण्यात आले होते. मात्र शांतता पूर्वक, परवानगी घेऊन आंदोलन करूनही २५ जणांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. जोपर्यंत दाखल केलेले गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत संघटना चर्चेला बसणार नाही असा पवित्रा भूमिपुत्रांनी घेतला आहे. याबाबत ऍड महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी याना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी १० नोव्हेंबर रोजी होणारी चर्चा फिस्कटली आहे.

मुरुड रोहा तालुक्यातील सतरा गावात केंद्राचा रद्द झालेला बल्क औषध निर्मित प्रकल्प राज्य शासनाच्या एमआयडीसीमार्फत उभारला जात आहे. या प्रकल्पाला आधीपासून येथील भूमिपुत्रांचा विरोध आहे. मात्र तरीही भूसंपादन प्रक्रिया प्रशासन स्तरावरून सुरू आहे. प्रकल्पाला असलेला विरोध दर्शविण्यासाठी भूमिपुत्र शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चाबाबत प्रशासनाला कळविण्यात आले होते. शेतकरी यांनी काढलेला मोर्चा हा शांततेत कायद्याचे पालन करून काढला होता. शेतकरी हे चर्चा करण्यासही तयार होते.

मोर्चा संपल्यानंतर अलिबाग पोलिसांनी २५ जणांवर कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हे दाखल केले आहेत. तर जिल्हा प्रशासन तर्फे ३ नोव्हेंबर रोजी संघटनेला १० नोव्हेंबर रोजी चर्चा बैठक लावल्याचे पत्र पाठविले होते. मात्र शेतकऱ्यावर गुन्हे दखल करून दबावतंत्र वापरले जात असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जात नाही तोपर्यंत चर्चेला बसणार नाही असे ऍड महेश मोहिते यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहेत. त्यामुळे शेतकरी आणि प्रशासन यामध्ये होणारी चर्चा झाली नाही.

टॅग्स :Raigadरायगड