शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग : आधी गुन्हे मागे घ्या मगच चर्चा; भूमिपुत्र शेतकऱ्याचा पावित्रा

By राजेश भोस्तेकर | Updated: November 9, 2022 18:07 IST

बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी मुरुड तालुक्यातील १४ गावातील भूमिपुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर १ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता.

अलिबाग : बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी मुरुड तालुक्यातील १४ गावातील भूमिपुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर १ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता. त्यानंतर भूमिपुत्रांसोबत १० नोव्हेंबर रोजी चर्चा करण्याबाबत प्रशासनाकडून पत्र संघटनेला पाठविण्यात आले होते. मात्र शांतता पूर्वक, परवानगी घेऊन आंदोलन करूनही २५ जणांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. जोपर्यंत दाखल केलेले गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत संघटना चर्चेला बसणार नाही असा पवित्रा भूमिपुत्रांनी घेतला आहे. याबाबत ऍड महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी याना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी १० नोव्हेंबर रोजी होणारी चर्चा फिस्कटली आहे.

मुरुड रोहा तालुक्यातील सतरा गावात केंद्राचा रद्द झालेला बल्क औषध निर्मित प्रकल्प राज्य शासनाच्या एमआयडीसीमार्फत उभारला जात आहे. या प्रकल्पाला आधीपासून येथील भूमिपुत्रांचा विरोध आहे. मात्र तरीही भूसंपादन प्रक्रिया प्रशासन स्तरावरून सुरू आहे. प्रकल्पाला असलेला विरोध दर्शविण्यासाठी भूमिपुत्र शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चाबाबत प्रशासनाला कळविण्यात आले होते. शेतकरी यांनी काढलेला मोर्चा हा शांततेत कायद्याचे पालन करून काढला होता. शेतकरी हे चर्चा करण्यासही तयार होते.

मोर्चा संपल्यानंतर अलिबाग पोलिसांनी २५ जणांवर कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हे दाखल केले आहेत. तर जिल्हा प्रशासन तर्फे ३ नोव्हेंबर रोजी संघटनेला १० नोव्हेंबर रोजी चर्चा बैठक लावल्याचे पत्र पाठविले होते. मात्र शेतकऱ्यावर गुन्हे दखल करून दबावतंत्र वापरले जात असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जात नाही तोपर्यंत चर्चेला बसणार नाही असे ऍड महेश मोहिते यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहेत. त्यामुळे शेतकरी आणि प्रशासन यामध्ये होणारी चर्चा झाली नाही.

टॅग्स :Raigadरायगड