शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

महाडमध्ये भरली कोकणातील पहिली जल नियोजन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:14 IST

संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट घोंगावत असताना भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकणालाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत

महाड : संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट घोंगावत असताना भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकणालाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत, यासाठी जलनियोजन आणि जलसाक्षरता महत्त्वपूर्ण असल्याने, कोकणातील पहिल्या जलनियोजन अंदाजपत्रक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन बुधवारपासून हिरवळ संस्थेच्या वतीने महाड शहरातील मिलिटरी बोर्डिंगच्या कॅम्पसमध्ये केले आहे.कोकणात पाऊस चांगला पडत असतानाही पाण्याच्या नियोजनाअभावी दरवर्षी कोकणातील अनेक तालुक्यांत उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसतात, यासाठी ठिकठिकाणी जलदूतांमार्फत जनजागृती पाणी नियोजनात सुसूत्रता होऊन आपला जलनियोजनाचा हेतू सफल होईल, असा विश्वास हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. भविष्यात जलनियोजन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन धारिया यांनी या वेळी केले.चार दिवस चालणाºया या कार्यशाळेमध्ये यशदा, पुणे, अ‍ॅक्शन आॅन क्लायमेट टुडे., आॅटर या संस्थांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह पालघर, मोखाडा भागातील जलदूत या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. कोकणातील जमीन, उतार, मातीचा पोत, भौगोलिक परिस्थिती सर्व काही वेगळे आहे, त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राचे निकष लावून कोकणात पाणी नियोजनाबाबत कार्यक्रम राबवले जाऊ नयेत, अशी गरज या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली.हिरवळ प्रतिष्ठान या संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी विष्णू साळवे, यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंंत पांडे, लघू पाटबंधारे विभागाचे एस. एम. गोडसे, संजय परांजपे, महाड पंचायत समिती सभापती सपना मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.