शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

अखेर दिवेआगर येथील रस्त्याची दुरुस्ती; समुद्रकिनारी जाणाऱ्या मुख्य मार्गाचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 00:58 IST

निळाशार, नितांत स्वच्छ समुद्रकिनारा असलेले शहर अशी दिवेआगरची खास ओळख आहे. पावसाळ्यात पर्यटन हंगाम कमी असला तरी आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची हमखास गर्दी पाहायला मिळते

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर येथे दरवर्षी पावसाळ्यात खड्डेमय रस्त्याबरोबर चिखलातून ये-जा करावी लागते. समुद्रकिनारी जाणारा मुख्य मार्ग असल्याने नेहमीच रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच याची दखल घेऊन अखेर दिवेआगर ग्रामपंचायतच्या पाठपुराव्यामुळे या मार्गाचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे.

निळाशार, नितांत स्वच्छ समुद्रकिनारा असलेले शहर अशी दिवेआगरची खास ओळख आहे. पावसाळ्यात पर्यटन हंगाम कमी असला तरी आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची हमखास गर्दी पाहायला मिळते. मात्र, समुद्रकिनारी खड्डेमय रस्त्याबरोबर चिखलातून पर्यटक व स्थानिकांना चालावे लागायचे. सध्या हा रस्ता खड्डेमुक्त होऊन नव्याने डांबरीकरण झाल्याने पर्यटक व स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात फिरण्यासाठी अनेक पर्यटक दिवेआगर समुद्रकिनाऱ्याला पसंती देतात. मुख्य रस्त्याची ग्रामपंचायतच्या पुढाकाराने दुरुस्ती झाल्याने या भागातून ये जा करणे सोयीचे झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पक्क्या रस्त्यांची मागणी दिवेआगर प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. एका बाजूला शासन पर्यटकांच्या वाढीसाठी विविध उपक्रम राबविते. तर दुसऱ्या बाजूला तेच उपक्रम निधीअभावी फोल ठरत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. दिवेआगर समुद्रालगत जाणारे रस्ते पक्क्या स्वरूपात करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :tourismपर्यटन