शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

अखेर दिवेआगर येथील रस्त्याची दुरुस्ती; समुद्रकिनारी जाणाऱ्या मुख्य मार्गाचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 00:58 IST

निळाशार, नितांत स्वच्छ समुद्रकिनारा असलेले शहर अशी दिवेआगरची खास ओळख आहे. पावसाळ्यात पर्यटन हंगाम कमी असला तरी आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची हमखास गर्दी पाहायला मिळते

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर येथे दरवर्षी पावसाळ्यात खड्डेमय रस्त्याबरोबर चिखलातून ये-जा करावी लागते. समुद्रकिनारी जाणारा मुख्य मार्ग असल्याने नेहमीच रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच याची दखल घेऊन अखेर दिवेआगर ग्रामपंचायतच्या पाठपुराव्यामुळे या मार्गाचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे.

निळाशार, नितांत स्वच्छ समुद्रकिनारा असलेले शहर अशी दिवेआगरची खास ओळख आहे. पावसाळ्यात पर्यटन हंगाम कमी असला तरी आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची हमखास गर्दी पाहायला मिळते. मात्र, समुद्रकिनारी खड्डेमय रस्त्याबरोबर चिखलातून पर्यटक व स्थानिकांना चालावे लागायचे. सध्या हा रस्ता खड्डेमुक्त होऊन नव्याने डांबरीकरण झाल्याने पर्यटक व स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात फिरण्यासाठी अनेक पर्यटक दिवेआगर समुद्रकिनाऱ्याला पसंती देतात. मुख्य रस्त्याची ग्रामपंचायतच्या पुढाकाराने दुरुस्ती झाल्याने या भागातून ये जा करणे सोयीचे झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पक्क्या रस्त्यांची मागणी दिवेआगर प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. एका बाजूला शासन पर्यटकांच्या वाढीसाठी विविध उपक्रम राबविते. तर दुसऱ्या बाजूला तेच उपक्रम निधीअभावी फोल ठरत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. दिवेआगर समुद्रालगत जाणारे रस्ते पक्क्या स्वरूपात करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :tourismपर्यटन