शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

कालव्यांसाठी ड्रोन कॅमेऱ्यांनी चित्रीकरण

By admin | Updated: June 13, 2017 02:59 IST

तालुक्यातील रेल्वेपट्टा हिरवागार करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाली-भूतीवली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

कर्जत : तालुक्यातील रेल्वेपट्टा हिरवागार करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाली-भूतीवली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. मात्र कालवे नसल्याने धरणाचे पाणी मागील एक दशक तसेच पडून आहे. धरणाचे पाणी शेतीसाठी देण्याकरिता आवश्यक असलेले कालवे बनविण्यासाठी पाटबंधारे विभागाने कालव्यांच्या सीमा निश्चित करण्याचे काम हाती घेतले आहे. कालव्यांचे सीमांकन करण्यासाठी कर्जत पाटबंधारे विभागाने त्या कामासाठी ड्रोन कॅमेरे वापरले.कर्जत तालुक्यातील सावरगावपासून आंबिवली या रेल्वेपट्ट्यातील गावातील जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी पाली-भूतीवली लघु पाटबंधारे प्रकल्पाची निर्मिती केली आहे. ५० कोटीहून अधिक खर्च करण्यात आलेल्या या धरणाचे पाणी परिसरातील २० गावांमधील १००० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यासाठी मुख्य कालवा तसेच उजवा आणि डावा असे १५ किलोमीटरचे कालवे निर्माण केले जाणार होते. पाटबंधारे खात्याच्या तत्कालीन अधिकारी वर्गाने केलेल्या चुकीच्या नियोजनामुळे धरणाच्या जलाशयात पाणीसाठा होत असताना आवश्यक कालवे तयार करून घेतले नाहीत. त्यामुळे धरणाचे पाणी २००३पासून जलाशयात पडून आहेत. दुसरीकडे कालव्याचे सीमांकन त्यावेळी पाटबंधारे खात्याने केले नसल्याने शेतकऱ्यांनी कालव्यांच्या मार्गात अन्य कामे करून कालवे रोखून धरले. त्याचवेळी कालव्यांसाठी लागणारी जमीन मिळावी म्हणून त्याचे अधिग्रहण देखील करण्यात आले नसल्याने शेतकरी विना मोबदला जमीन देण्यास विरोध करीत आहेत. त्याचा परिणाम कालवे निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकले नाहीत आणि धरणाचे पाणी १००० हेक्टर जमिनीपर्यंत शेतीसाठी पोहचू शकले नाही.जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने कालवे जाणाऱ्या मार्गातील जमिनी अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळणार म्हणून विकल्या आहेत.त्यामुळे कालव्यांच्या मार्गात मागील काळात अडथळे निर्माण झाले आहेत. परंतु कोट्यवधी रु पये खर्चून पाणी असेच पडून ठेवले जाणार नाही अशी भूमिका स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी घेतली आहे.त्यामुळे पाटबंधारे विभागाने कालव्यांची कामे करण्याचे मनावर घेतले आहे. एकूण १५ किलोमीटर कालव्यांपैकी जेमतेम ५ किलोमीटरचे कालवे पाटबंधारे खात्याने खोदून घेतले आहेत. मात्र ते कालवे देखील अखंड नसल्याने धरणातील पाणी कालव्यात सोडता आले नाही. कालवे करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी पाटबंधारे विभाग सरसावला आहे. त्यांनी कालव्याचे सीमांकन करण्यासाठी ड्रोन कॅमेरे आणून त्यांच्या माध्यमातून सर्व भागातील कालव्याच्या सीमा निश्चित केल्या आहेत. आता पावसाळ्यानंतर कालव्यांच्या कामाला सुरु वात होण्याची शक्यता असून दरम्यानच्या चार महिन्यात पाटबंधारे विभाग जमीन अधिग्रहण करण्यासाठी कार्यवाही करणार आहे.आमच्या भागातील शेतकरी २००३ पासून पाली-भूतीवली धरणात असलेले पाणी पाहत आहे. शेतीसाठी कधी पाणी येईल याची वाट शेतकरी अनेक वर्षे पाहत होता. त्यामुळे शेतात पाणी आणण्यासाठी आवश्यक असलेले कालवे तयार करण्यासाठी प्राथमिक पाऊल पाटबंधारे विभागाने उचलले असल्याने येथील शेतकरी आनंदी आहे. - किशोर गायकवाड, स्थानिक शेतकरी