शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पेणच्या पाच गावांचा पाण्यासाठी लढा

By admin | Updated: February 5, 2017 02:52 IST

पेणमधील पाच गावांच्या ग्रामस्थांकडून आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण

नवी मुंबई : पेणमधील पाच गावांच्या ग्रामस्थांकडून आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. असे असतानाही प्रशासन व लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ, शनिवारी पाच गावांच्या ग्रामस्थांनी मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला आहे.देश स्वातंत्र होऊन ६९ वर्षांचा कालावधी उलटला, तरीही अद्याप पेणमधील पाच गावांतील ग्रामस्थांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. या पाचही गावांमध्ये सुमारे नऊ हजार लोकवस्ती आहे. मात्र, पाण्याविना त्यांचे अतोनात हाल सुरू आहेत. पिण्यासाठी पाणीच नसल्यामुळे रात्री-अपरात्री दूरवरून हंडे भरून आणावे लागत आहेत, परंतु चालण्यासाठी चांगले रस्तेदेखील नसल्यामुळे पाण्यासाठी पायपीट करताना, महिला, मुलांसह वृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेकदा पाणी विकत घेण्याचे वेळदेखील ग्रामस्थांवर येत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंडही बसत आहे. या गावांना हेटवणे धरणाचे पाणी मिळावेत, अशी ग्रामस्थांची पूर्वीपासून मागणी आहे. यासाठी त्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडेदेखील पत्रव्यवहार केलेला आहे. त्यानंतर, काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातून पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग व रस्ते बांधकाम विभागांकडे कळविण्यात आले आहे.त्यानंतरही पाण्याचा प्रश्न न सुटल्यामुळे ग्रामस्थांनी तीन दिवस उपोषणदेखील केले होते, परंतु काही केल्या प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे, ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा मार्ग निवडला आहे. पाण्याचा प्रश्न न सुटल्यास, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. तर याचा इशारा प्रशासनाला देण्याकरिता शनिवारी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पाचही गावांचे दहा हजारांहून अधिक ग्रामस्थ सहभागी झाले होते. या जमावाने लगतच्या प्रत्येक गावांत व पाड्यात जाऊन इतर ग्रामस्थांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर, पोलीस व जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन दिल्याचे ग्रामस्थ नरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले. तर जोपर्यंत पाचही गावांच्या पाण्याचा प्रश्न व इतर मूलभूत प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत ग्रामस्थ मंडळ मतदानावर बहिष्काराच्या निर्णयावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.