शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
3
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
4
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
5
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
6
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
7
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासरखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
8
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
9
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
10
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
11
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
12
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
13
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
14
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
15
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
16
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
17
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
18
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
19
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
20
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती

रायगडमध्ये पंधरवड्यात १२ पर्यटकांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:10 IST

जयंत धुळप  अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १० ते १५ दिवसांत विविध ठिकाणचे धबधबे, ओढे, नद्या, तलाव या ठिकाणी पावसाळी पर्यटन आणि ट्रेकिंगकरिता आलेल्या १२ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विशेषत: पालकवर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत असतानाच माहितीच्या नसलेल्या पाण्याच्या जलाशय आणि धबधब्याच्या ठिकाणी जाताना स्थानिकांकडून माहिती न ...

जयंत धुळप  अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १० ते १५ दिवसांत विविध ठिकाणचे धबधबे, ओढे, नद्या, तलाव या ठिकाणी पावसाळी पर्यटन आणि ट्रेकिंगकरिता आलेल्या १२ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विशेषत: पालकवर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत असतानाच माहितीच्या नसलेल्या पाण्याच्या जलाशय आणि धबधब्याच्या ठिकाणी जाताना स्थानिकांकडून माहिती न घेणे आणि अनेकदा स्थानिकांनी सांगून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे अपघाती मृत्यू झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये मुंबई-पुण्यातून आलेल्या पर्यटक व युवकांचा समावेश असल्याचेही स्पष्ट झाले आहे.पर्यटक आणि विशेषत: बुडून मृत्यू होण्याच्या या समस्येला आळा घालण्याकरिता प्रत्येकवेळी पोलिसांना वा सरकारी यंत्रणेला जबाबदार धरणे योग्य नाही. मुळात येणाºया पर्यटकांनी आत्मसंयम ठेवणे आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेकरिता अत्यावश्यक आहे, असे मत या निमित्ताने ‘चला मुलांना घडवू या’ या बालक-पालक प्रबोधन उपक्रमाचे प्रणेते व ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. मुंबई-पुण्यातील महाविद्यालयातील अनेक मुले-मुली आपल्या पालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता रायगड किल्ला, रायगडमधील अन्य पर्यटन स्थळे आणि विशेषत: समुद्र किनारी येत असतात. अशा मुला-मुलींचे देखील अपघाती मृत्यू झाल्याचे अनेक प्रसंग आहेत. अशा वेळी दोष कुणाचा, त्या मुलांच्या पालकांचा, सरकारी यंत्रणेचा की पोलिसांचा असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु या तिघांपैकी दोष कुणाचाही नसतो, आयुष्याचे नुकसान मात्र त्यांचे स्वत:चेच होते. यातून स्वसुरक्षेचा विचार युवक-युवतींनी गांभीर्याने करणे अनिवार्य असल्याचेही डॉ.दाभाडकर यांनी नमूद केले. मद्यप्राशन करून समुद्रात पोहायला गेल्यावर बुडून मृत्यू झाल्याचीही उदाहरणे जिल्ह्याच्या किनारपट्टीत घडली आहेत. या समस्येला आळा घालणे कायद्याने शक्य नाही. त्याकरिता आत्मसंयम आवश्यक आहे, तो पर्यटनाकरिता आलेल्या गटातील एकानेजरी विचारात घेतला तरी असे दुर्धर प्रसंग ओढावणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.पोलिसांना न जुमानता चालते मस्तीअलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनारी विशेष आणि मोबाइल पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करतात. अलिबाग, वरसोली आदि समुद्रकिनारी भरती ओहोटीच्या वेळा दर्शविणारे फलक देखील लावण्यात आले आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेक पर्यटक समुद्रात ओहोटीच्या वेळी पोहण्याकरिता जातात आणि मग काही वेळेस दुर्घटना घडते. समुद्र किनाºयावरील स्थानिक नागरिक वा छोटे व्यावसायिक आवर्जून समुद्राच्या भरती-ओहोटीबाबत सूचना करतात, परंतु त्या नाकारून समुद्रात जाणाºया पर्यटकांना कसे आवरायचे असा प्रश्न तेथे कार्यरत पोलीस कर्मचाºयांना असतो, असे वराडे यांनी सांगितले. दोन दिवसांत कर्जत तालुक्यात वर्षासहलीसाठी येणाºया पाच पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे तर महिन्याभरात कर्जत तालुक्यात धरण, धबधबा, आणि ट्रेकिं साठी येणाºया एकूण नऊ जणांचे बळी गेले आहे. धबधब्यावर, समुद्रकिनारी, धरणावर मौज, मज्जा करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष करु न ही तरु णाई सेल्फीच्या नादात अति उत्साहात जीव धोक्यात घालतात, यामुळे या घटनांमध्ये वाढ होत आहे.सुरक्षेकडे आणि प्रशासनाच्या सूचनांकडे पर्यटक दुर्लक्ष करीत आहेत.