शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

वीज मंडळाविरोधात ५ जुलैपासून उपोषण

By admin | Updated: June 28, 2017 03:25 IST

मुरु ड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वीज मंडळाचा अनागोंदी कारभार सुरू असून, विजेचा पुरवठा कायम न ठेवल्याने येथील

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/ मुरुड : मुरु ड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वीज मंडळाचा अनागोंदी कारभार सुरू असून, विजेचा पुरवठा कायम न ठेवल्याने येथील स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती नसताना ही वीज अनेक तास गायब होत असून, दिवसा गेलेली वीज मध्यरात्रीनंतर येत असल्याने लोकांची झोप उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वीज का गायब होत आहे? याचे साधे स्पष्टीकरणसुद्धा देता येत नसेल, तर हा अन्याय मुरुड तालुक्यातील नागरिकांनी का सहन करावा? या लोकभावनेतून नांदगाव येथे राहणारे समाजसेवक चिंतामणी गोपाळ जोशी हे मुरुड तहसील कार्यालयाजवळ ५ जुलैपासून उपोषणास सुरु वात करणार आहेत. याबाबतचे रीतसर निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले असून, त्याच्या प्रती ऊर्जामंत्री, पालकमंत्री रायगड तसेच वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाला पाठवल्या आहेत.विद्युत मंडळाच्या गेल्या वर्षभरातला जो अनागोंदी कारभार आहे. त्याला त्रासूनच लोकांचा जनक्षोभ उसळून आला होता. जे अधिकारी हलगर्जी करीत होते व करीत आहेत. खरी कारवाई त्यांच्यावरच होणे आवश्यक आहे. तसे न करता, रागाची भावना व्यक्त करणाऱ्या असाहाय्य व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले, तरी याबाबतीत जर समाजाला योग्य न्याय द्यावयाचा असेल, तर संबंधित वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होणे आवश्यक आहे. जर प्रशासनाला अधिकारी वर्गावर कार्यवाही करावयाची नसेल तर संबंधितांवरचे गुन्हेसुद्धा मागे घेण्यात यावेत, अशी मागणी चिंतामणी जोशी यांनी निवेदनात नमूद केली आहे.वीज मंडळाचा हा त्रास वाढला असून, कायमस्वरूपी मुरुडमधील नागरिकांना न्याय मिळावा, यासाठी लोकशाही मार्गाने हा लढा लढण्याचा निर्धार व्यक्त करून ५ जुलैपासून तहसील कार्यालयाजवळ उपोषणास बसण्याचा इशारा जोशींनी दिला.