शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई

By admin | Updated: November 2, 2015 02:11 IST

समुद्राच्या पाण्याला आलेल्या उधाणामुळे चिंचोटी गावातील बंधारा फुटून शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात झालेले आर्थिक नुकसान भरून देण्यात येणार आहे.

अलिबाग : समुद्राच्या पाण्याला आलेल्या उधाणामुळे चिंचोटी गावातील बंधारा फुटून शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात झालेले आर्थिक नुकसान भरून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रोजगार हमीच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांनी केलेल्या कामाचा मोबदलाही प्रशासनामार्फत मिळणार असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.२८ आॅक्टोबरला चिंचोटी येथील बंधारा फुटून सुमारे २७ एकर शेतीमधील ८१० क्विंटल भाताचे सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. खारभूमी आणि कृषी विभागाने या नुकसानीचे साधे पंचनामेही केलेले नव्हते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केल्याने लोकप्रतिनिधींसह प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली. अलिबागचे आ. सुभाष पाटील यांनी सरकारी लवाजम्यासह शनिवारी घटनास्थळी भेट दिली. या प्रसंगी तहसीलदार प्रकाश सकपाळ, खारभूमी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भारती, उपअभियंता सुरेश शिरसाट, तलाठी, मंडल अधिकारी यांची तारांबळ उडाली.चिंचोटीमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे आदेश आमदार सुभाष पाटील यांनी तहसीलदार प्रकाश सकपाळ यांना दिले. शेतकऱ्यांच्या शेतातील फुटलेले बांध घालण्याचे काम तातडीने सुरू करण्यात येतील, त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातही येथे खांड गेली होती. त्याची डागडुजी शेतकऱ्यांनीच केली होती. त्याचा मोबदलाही शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे खारभूमीचे कार्यकारी अभियंता अशोक भारती यांनी सांगितले. नव्याने बंधारा बांधण्यासाठी १० लाखांचा निधी देण्याची शिफारस करणार असल्याचे उपअभियंता शिरसाट सांगितले.