शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: October 31, 2015 00:11 IST

अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावातील भातशेतीच्या बंधाऱ्याला समुद्राच्या पाण्याने भलेमोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे सुमारे २७ एकरांमध्ये समुद्राचे पाणी घुसून ८१० क्विंटल

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावातील भातशेतीच्या बंधाऱ्याला समुद्राच्या पाण्याने भलेमोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे सुमारे २७ एकरांमध्ये समुद्राचे पाणी घुसून ८१० क्विंटल भाताचे सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. खारभूमी विभाग आणि जिल्हा कृषी अधीक्षक विभागाने अद्याप याचा पंचनामा केला नसल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. खारभूमी विभागाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीने केली आहे.चिंचोटी गावाचा समावेश आदर्श सांसद ग्राम योजनमध्ये करण्यात आला आहे. या गावामध्ये मोठ्या स्तरावर बेकायदा रेतीचे उत्खनन सुरू आहे. रेतीच्या बेसुमार उत्खननामुळे २८ आॅक्टोबरला शेतकऱ्यांच्या शेतातील बंधाऱ्याला भले मोठे भगदाड पडून शेतीला धोका पोचला आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे येथील शेतातील पीक नष्ट झाले असल्याचे आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी सांगितले. बेकायदा रेती उत्खननावर कारवाई करून शेती वाचवावी, यासाठी २ फेब्रुवारी २०१५ ला रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते; मात्र त्यावर वेळीच कारवाई झाली नसल्याने आता शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसल्याचे पाटील यांनी सांगितले.३५ शेतकऱ्यांच्या सुमारे २७ एकर शेतामध्ये समुद्राचे पाणी घुसून ८१० क्विंटल भाताचे सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अद्यापही पंचनामे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याबाबत साशंकता आहे. पंचनामे करून लवकरच नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीने केली आहे.फेब्रुवारी महिन्यात खांड गेल्याने ती बुजविण्यासाठी ग्रामस्थांनी मेहनत केली होती. त्याची मजुरी किमान दीड लाख रुपये होते. (प्रतिनिधी)