शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: October 31, 2015 00:11 IST

अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावातील भातशेतीच्या बंधाऱ्याला समुद्राच्या पाण्याने भलेमोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे सुमारे २७ एकरांमध्ये समुद्राचे पाणी घुसून ८१० क्विंटल

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावातील भातशेतीच्या बंधाऱ्याला समुद्राच्या पाण्याने भलेमोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे सुमारे २७ एकरांमध्ये समुद्राचे पाणी घुसून ८१० क्विंटल भाताचे सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. खारभूमी विभाग आणि जिल्हा कृषी अधीक्षक विभागाने अद्याप याचा पंचनामा केला नसल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. खारभूमी विभागाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीने केली आहे.चिंचोटी गावाचा समावेश आदर्श सांसद ग्राम योजनमध्ये करण्यात आला आहे. या गावामध्ये मोठ्या स्तरावर बेकायदा रेतीचे उत्खनन सुरू आहे. रेतीच्या बेसुमार उत्खननामुळे २८ आॅक्टोबरला शेतकऱ्यांच्या शेतातील बंधाऱ्याला भले मोठे भगदाड पडून शेतीला धोका पोचला आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे येथील शेतातील पीक नष्ट झाले असल्याचे आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी सांगितले. बेकायदा रेती उत्खननावर कारवाई करून शेती वाचवावी, यासाठी २ फेब्रुवारी २०१५ ला रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते; मात्र त्यावर वेळीच कारवाई झाली नसल्याने आता शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसल्याचे पाटील यांनी सांगितले.३५ शेतकऱ्यांच्या सुमारे २७ एकर शेतामध्ये समुद्राचे पाणी घुसून ८१० क्विंटल भाताचे सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अद्यापही पंचनामे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याबाबत साशंकता आहे. पंचनामे करून लवकरच नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीने केली आहे.फेब्रुवारी महिन्यात खांड गेल्याने ती बुजविण्यासाठी ग्रामस्थांनी मेहनत केली होती. त्याची मजुरी किमान दीड लाख रुपये होते. (प्रतिनिधी)