शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना शेती बाबतचे पूरक ज्ञान असणे आवश्यक आहे - अर्चना सुळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2023 18:31 IST

शेतकऱ्यांना शेतीबाबतचे पूरक ज्ञान व विविध योजनांची माहिती असणे आवश्यक आहे.

मधुकर ठाकूर 

उरण: शेतकऱ्यांना शेतीबाबतचे पूरक ज्ञान व विविध योजनांची माहिती असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन उरण तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ - नारनवर यांनी केले. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिवशी उरण तालुका कृषी कार्यालय आणि उरण पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी (१) उरण पंचायत समितीच्या सभागृहात कृषी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्या बोलत होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण,  विस्तार अधिकारी साळवे,  प्रकाश ठाकूर,  प्रफुल्ल खारपाटील, कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे, कृषी सहाय्यक निखिल देशमुख, कृषी सहाय्यक आर. पी.  भजनावळे ,कृषी सहाय्यक सुरज पाटील, कृषी सहाय्यक विभावरी चव्हाण तसेच अन्य कृषी अधिकारी , कृषीमित्र व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढे अर्चना सुळ यांनी कृषी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना विकसित ज्ञानाबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती देणे हे कृषी विभागाचे काम असून, शेतकऱ्यांना आता पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत हंगामातील  पिकांसाठी विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा काढता येणार आहे. विम्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार अदा करणार आहे. 

या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या  पिकांच्या नोंदी सातबाऱ्यावर करून, घ्याव्यात .नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाचा या मागचा हा उद्देश असल्याचे , त्यांनी सांगितले. तदनंतर मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण यांनी गटशेती संकल्पना आणि प्रकल्पाच्या कार्यपद्धती विषयी सविस्तर माहिती दिली. या माध्यमातून सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करण्यावर शेतकऱ्यांनी अधिक भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले. तर उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रकाश ठाकूर यांनी शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा  कणा  मानला जातो. मुसळधार पाऊस, परतीचा पाऊस व  अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आला असून, सद्यस्थितीत हा कणा मोडून पडताना दिसत आहे. तर प्रगतशील शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी भाताची चार सूत्री लागवड ,रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड आणि विविध शेती विषयक योजना आदी विषयावर सविस्तर माहिती दिली.

दरम्यान २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या भात पीक स्पर्धेत सलग दोन वर्ष प्रथम क्रमांकाने येणाऱ्या प्रफुल्ल काळूराम खारपाटील (चिरनेर)  यांना तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तर  भातपीक स्पर्धेत मधुकर रामकृष्ण पाटील (द्वितीय)  व  दत्ताराम पांडुरंग पाटील (तृतीय) क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यांनाही  प्रशस्तीपत्र देऊन, सन्मानित केले .त्याचबरोबर महिला कृषी उद्योजक शेतकरी नेहा भोईर आणि सर्व गावातील कृषीमित्र शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण