शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

शेतकऱ्यांना शेती बाबतचे पूरक ज्ञान असणे आवश्यक आहे - अर्चना सुळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2023 18:31 IST

शेतकऱ्यांना शेतीबाबतचे पूरक ज्ञान व विविध योजनांची माहिती असणे आवश्यक आहे.

मधुकर ठाकूर 

उरण: शेतकऱ्यांना शेतीबाबतचे पूरक ज्ञान व विविध योजनांची माहिती असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन उरण तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ - नारनवर यांनी केले. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिवशी उरण तालुका कृषी कार्यालय आणि उरण पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी (१) उरण पंचायत समितीच्या सभागृहात कृषी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्या बोलत होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण,  विस्तार अधिकारी साळवे,  प्रकाश ठाकूर,  प्रफुल्ल खारपाटील, कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे, कृषी सहाय्यक निखिल देशमुख, कृषी सहाय्यक आर. पी.  भजनावळे ,कृषी सहाय्यक सुरज पाटील, कृषी सहाय्यक विभावरी चव्हाण तसेच अन्य कृषी अधिकारी , कृषीमित्र व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढे अर्चना सुळ यांनी कृषी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना विकसित ज्ञानाबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती देणे हे कृषी विभागाचे काम असून, शेतकऱ्यांना आता पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत हंगामातील  पिकांसाठी विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा काढता येणार आहे. विम्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार अदा करणार आहे. 

या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या  पिकांच्या नोंदी सातबाऱ्यावर करून, घ्याव्यात .नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाचा या मागचा हा उद्देश असल्याचे , त्यांनी सांगितले. तदनंतर मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण यांनी गटशेती संकल्पना आणि प्रकल्पाच्या कार्यपद्धती विषयी सविस्तर माहिती दिली. या माध्यमातून सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करण्यावर शेतकऱ्यांनी अधिक भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले. तर उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रकाश ठाकूर यांनी शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा  कणा  मानला जातो. मुसळधार पाऊस, परतीचा पाऊस व  अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आला असून, सद्यस्थितीत हा कणा मोडून पडताना दिसत आहे. तर प्रगतशील शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी भाताची चार सूत्री लागवड ,रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड आणि विविध शेती विषयक योजना आदी विषयावर सविस्तर माहिती दिली.

दरम्यान २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या भात पीक स्पर्धेत सलग दोन वर्ष प्रथम क्रमांकाने येणाऱ्या प्रफुल्ल काळूराम खारपाटील (चिरनेर)  यांना तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तर  भातपीक स्पर्धेत मधुकर रामकृष्ण पाटील (द्वितीय)  व  दत्ताराम पांडुरंग पाटील (तृतीय) क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यांनाही  प्रशस्तीपत्र देऊन, सन्मानित केले .त्याचबरोबर महिला कृषी उद्योजक शेतकरी नेहा भोईर आणि सर्व गावातील कृषीमित्र शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण