शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

रुंदीकरणात शेतजमिनी बाधित, शेतकऱ्यांचे शासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 03:30 IST

कर्जत-मुरबाड राज्यमार्गाला आता राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी एमएसआरडीसीकडून सर्व्हेचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे; परंतु कर्जत तालुक्यातील ज्या गावातून हा मार्ग जात आहे, तेथील शेतजमिनी रस्ता रुंदीकरणात जात आहेत.

- कांता हाबळेनेरळ  - कर्जत-मुरबाड राज्यमार्गाला आता राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी एमएसआरडीसीकडून सर्व्हेचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे; परंतु कर्जत तालुक्यातील ज्या गावातून हा मार्ग जात आहे, तेथील शेतजमिनी रस्ता रुंदीकरणात जात आहेत. प्रशासनाने याबाबतीत काही शेतकºयांना कोणत्याही प्रकारची माहिती अथवा नोटीस न देता काम सुरू केल्याने शेतकरी नाराज असून शेतजमिनीचा मोबदला मिळावा यासाठी प्रशासनाकडे निवेदन दिले आहे.जोपर्यंत शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू नये, अशी मागणी कर्जत तालुक्यातील कळंब, वारे, पोही गावातील बाधित शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. कर्जत-मुरबाड रस्ता एमएसआरडीसीकडे वर्ग झाला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे काँक्र ीटीकरणाचे टेंडर सुद्धा निघाले आहे; परंतु हा रस्ता नक्की किती मीटर होणार आहे? साइडपट्टी किंवा गटार यांची रु ंदी किती मीटर असेल. ज्या गावांतून रस्ता जात आहे, त्या गावातील दुकाने आणि घरे तोडणार का? अनेक वर्षांपूर्वी जुना रस्ता बांधण्यासाठी काही ठिकाणी भूमिअधिग्रहन झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे; परंतु काही गावांमध्ये यापूर्वी कोणालाही मोबदला मिळाला नव्हता.तसेच ७/१२ उताºयावर तशी नोंद ही झालेली नाही किंवा त्याचे क.जा.प.(आकार फोड- कमी जास्ती पत्रक) झाले नाही त्या शेतकºयांबाबत सरकारचे काय धोरण असणार आहे किंवा आता ज्या ठिकाणी वळण आहे ते काढून रस्ता सरळ करण्यासाठी ज्या शेतकºयांच्या जमिनी जाणार त्यांना नक्की किती आणि कधी मोबदला मिळणार याबाबत सर्व बाधितांच्या मनात संभ्रम आहे.ठेकेदार कंपनीने काही दिवसांपासून रस्त्याच्या सर्व्हेचे काम सुरू केले आहे. त्यांनी मार्किंग करीत असताना रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर, वीस मीटर आणि काही ठिकाणी पंचवीस मीटरवर मार्किंग केल्याने अजूनच संभ्रम वाढला आहे. ठेकेदाराने किंवा एमएसआरडीसीच्या अधिकाºयांनी काम सुरू करण्यापूर्वी ज्या गावांतून किंवा ज्यांच्या जमिनीतून रस्ता जाणार आहे त्यांची बैठक घेऊन माहिती देणे गरजेचे होते, परंतु कोणालाही विश्वासात न घेता हे काम सुरू केल्याने शेतकरी संतापले आहेत.रोजीरोटीचा प्रश्नकर्जत तालुक्यातून जाणाºया व समृद्धी मार्गास जोडणाºया या राष्ट्रीय मार्गाच्या रु ंदीकरणामुळे आमच्या शेतजमिनी, घरे, दुकाने जात असून त्यामुळे शेतकºयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे, दुकानदार बेरोजगार होणार आहेत त्यामुळे आम्हाला शासनाने योग्य मोबदला द्यावा, नंतर रस्त्याचे काम करावे, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीकडून करण्यात येत आहे.सरकार अन्यायाने जमिनी बळकावणार असेल तर याला शेतकरी प्रखर विरोध करतील हे अधिकाºयांनी ध्यानात घ्यावे, उगाचच मनमानी करू नये. या विरोधात आम्ही नक्कीच खूप मोठा लढा उभारू.- उदय पाटील, सरचिटणीस,राष्ट्रवादी युवा संघटना कर्जत

टॅग्स :Raigadरायगड