शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

रुंदीकरणात शेतजमिनी बाधित, शेतकऱ्यांचे शासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 03:30 IST

कर्जत-मुरबाड राज्यमार्गाला आता राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी एमएसआरडीसीकडून सर्व्हेचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे; परंतु कर्जत तालुक्यातील ज्या गावातून हा मार्ग जात आहे, तेथील शेतजमिनी रस्ता रुंदीकरणात जात आहेत.

- कांता हाबळेनेरळ  - कर्जत-मुरबाड राज्यमार्गाला आता राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी एमएसआरडीसीकडून सर्व्हेचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे; परंतु कर्जत तालुक्यातील ज्या गावातून हा मार्ग जात आहे, तेथील शेतजमिनी रस्ता रुंदीकरणात जात आहेत. प्रशासनाने याबाबतीत काही शेतकºयांना कोणत्याही प्रकारची माहिती अथवा नोटीस न देता काम सुरू केल्याने शेतकरी नाराज असून शेतजमिनीचा मोबदला मिळावा यासाठी प्रशासनाकडे निवेदन दिले आहे.जोपर्यंत शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू नये, अशी मागणी कर्जत तालुक्यातील कळंब, वारे, पोही गावातील बाधित शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. कर्जत-मुरबाड रस्ता एमएसआरडीसीकडे वर्ग झाला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे काँक्र ीटीकरणाचे टेंडर सुद्धा निघाले आहे; परंतु हा रस्ता नक्की किती मीटर होणार आहे? साइडपट्टी किंवा गटार यांची रु ंदी किती मीटर असेल. ज्या गावांतून रस्ता जात आहे, त्या गावातील दुकाने आणि घरे तोडणार का? अनेक वर्षांपूर्वी जुना रस्ता बांधण्यासाठी काही ठिकाणी भूमिअधिग्रहन झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे; परंतु काही गावांमध्ये यापूर्वी कोणालाही मोबदला मिळाला नव्हता.तसेच ७/१२ उताºयावर तशी नोंद ही झालेली नाही किंवा त्याचे क.जा.प.(आकार फोड- कमी जास्ती पत्रक) झाले नाही त्या शेतकºयांबाबत सरकारचे काय धोरण असणार आहे किंवा आता ज्या ठिकाणी वळण आहे ते काढून रस्ता सरळ करण्यासाठी ज्या शेतकºयांच्या जमिनी जाणार त्यांना नक्की किती आणि कधी मोबदला मिळणार याबाबत सर्व बाधितांच्या मनात संभ्रम आहे.ठेकेदार कंपनीने काही दिवसांपासून रस्त्याच्या सर्व्हेचे काम सुरू केले आहे. त्यांनी मार्किंग करीत असताना रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर, वीस मीटर आणि काही ठिकाणी पंचवीस मीटरवर मार्किंग केल्याने अजूनच संभ्रम वाढला आहे. ठेकेदाराने किंवा एमएसआरडीसीच्या अधिकाºयांनी काम सुरू करण्यापूर्वी ज्या गावांतून किंवा ज्यांच्या जमिनीतून रस्ता जाणार आहे त्यांची बैठक घेऊन माहिती देणे गरजेचे होते, परंतु कोणालाही विश्वासात न घेता हे काम सुरू केल्याने शेतकरी संतापले आहेत.रोजीरोटीचा प्रश्नकर्जत तालुक्यातून जाणाºया व समृद्धी मार्गास जोडणाºया या राष्ट्रीय मार्गाच्या रु ंदीकरणामुळे आमच्या शेतजमिनी, घरे, दुकाने जात असून त्यामुळे शेतकºयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे, दुकानदार बेरोजगार होणार आहेत त्यामुळे आम्हाला शासनाने योग्य मोबदला द्यावा, नंतर रस्त्याचे काम करावे, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीकडून करण्यात येत आहे.सरकार अन्यायाने जमिनी बळकावणार असेल तर याला शेतकरी प्रखर विरोध करतील हे अधिकाºयांनी ध्यानात घ्यावे, उगाचच मनमानी करू नये. या विरोधात आम्ही नक्कीच खूप मोठा लढा उभारू.- उदय पाटील, सरचिटणीस,राष्ट्रवादी युवा संघटना कर्जत

टॅग्स :Raigadरायगड