शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बंधा-याच्या दुरु स्तीसाठी शेतक-यांचे प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 06:58 IST

होळीच्या सागरी उधाणात पेण तालुक्यातील ढोंबी व माचेला गावांमधील २३०० एकर भातशेती जमिनीत समुद्राचे खारे पाणी शिरून हाहाकार उडाल्याने खाडी किनारच्या समुद्र संरक्षक बंधाºयांना पडलेल्या भगदाडांची (खांडीची) दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे झाले आहे.

- जयंत धुळपअलिबाग : होळीच्या सागरी उधाणात पेण तालुक्यातील ढोंबी व माचेला गावांमधील २३०० एकर भातशेती जमिनीत समुद्राचे खारे पाणी शिरून हाहाकार उडाल्याने खाडी किनारच्या समुद्र संरक्षक बंधाºयांना पडलेल्या भगदाडांची (खांडीची) दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे झाले आहे. पेण तालुक्यातील माचेला गावच्या काही शेतकºयांनी जेएसडब्लू कंपनीच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेल्या दाव्यामुळे माचेला गावाच्या गट नं. ९४ मधील न्यायालयीन बाब टाळून काम करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतला आहे. खार देवळी उघाडीच्या नाल्यात पाइप टाकून तात्पुरता पूल तयार करून बांधबंदिस्ती मार्गे भराव करीत ढोंबी व माचेला नजीक संरक्षक बंधाºयाला (बाहेरकाठ्याला) पडलेली भगदाडे (खांडी) जेएसडब्लू कंपनीच्या वतीने बांधण्यासाठी शेतकºयांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अरु ण शिवकर यांनी दिली आहे.फुटलेल्या या समुद्र संरक्षक बंधाºयांच्या अनुषंगाने पेण उप विभागीय महसूल अधिकारी कार्यालयात शेतकºयांच्या समवेत झालेल्या सभेमध्ये, न्यायालयीन बाब टाळून नवीन मार्ग शोधून संरक्षक बंधारे दुरुस्तीकरिता प्रयत्न करावा,असे पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी सांगितले होते. त्यानुसार शेतकरी प्रतिनिधी व खारभूमी खात्याचे अधिकारी सुभाष निंबाळकर यांनी फेर सर्व्हे करून एच.आर.जॉन्सन कंपनीच्या बाजूने काराव गट क्र . २९,२०,२१,२२ व खार देवळी गट क्र . ३,४,५ येथून मार्ग शोधला आहे.५ मार्च रोजी सामाजिक कार्यकर्ते अरु ण शिवकर यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात काराव ग्रामपंचायतीमध्ये तातडीची बैठक घेतली. या बैठकीला काराव ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन पाटील, खार डोंगर मेहनत आघाडीचे अध्यक्ष पांडुरंग तुरे, काराव ग्रा.पं.च्या सदस्य व जुईअब्बास, खारपाले, ढोंबी व गडब भागातील शेतकरी हजर होते. संरक्षक बंधारे (खांडी) बांधण्यासाठी सुचविलेल्या मार्गात किरण मढवी, यशवंत पाटील, दत्ताराम म्हात्रे, किसान म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, दामोदर पाटील, काशिनाथ जांभूळकर हे शेतकरी येत असून त्यांच्या घरी जाऊन समितीने भेट घेतली व त्यांच्या शेतातून मार्गासाठी संमती मिळवली. या सर्व शेतक ºयांनी हजारो शेतकºयांची उपासमार लक्षात घेऊन सामाजिक भावनेने ही संमती दिली.न्यायप्रविष्ट बाब टाळून मार्ग निश्चित१होळीच्या समुद्र उधाणात नेहमीपेक्षा जास्त २३०० एकरांत खारे पाणी शिरून नुकसान झाले आहे. शासनाची व जेएसडब्लू कंपनीची हे संरक्षक बंधारे (खांडी) बांधून देण्याची तयारी असली तरी माचेला गावाच्या काही शेतकºयांनी राष्ट्रीय हरित प्राधिकरणात दावा दाखल केला आहे.२यामध्ये रायगड जिल्हाधिकाºयांना प्रतिवादी करण्यात आले आहे, तर खार माचेला गट क्र . ९४ मधील कांदळवन तोडीबाबत जेएसडब्लू कंपनीवर दिवाणी न्यायालय दोषारोप निश्चितीवर प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे गट नं. ९४ मधील न्यायप्रविष्ट बाब टाळून वरील मार्ग निश्चित करण्यात आला असल्याचे शिवकर यांनी सांगितले.बांधबंदिस्तीमार्गे संरक्षक बंधारे बांधणारच्माचेला-चिर्बी ही खारभूमी योजना असून यामध्ये माचेला, चिर्बी, खारघाट, जांभेळा या गावाच्या भातशेती जमिनी अंतर्भूत आहेत.च्माचेला-चिर्बी संरक्षक बंधाºयाच्या (बाहेरकाठ्याच्या) बाजूला गट नं. ९४ हे दक्षिणेच्या बाजूने समांतर रेषेत लांबलचक पसरलेले आहे.च्या बांधावर खारभूमी विकास खात्याचा अधिकार आहे व आजच्या गंभीर परिस्थितीत शेतकºयांची उपजीविका त्यावर अवलंबून असल्याने शासनाने न्यायालयाचा अवमान न करता कोणत्याही शेतकºयांच्या शेतात भराव न टाकता फक्त बांधबंदिस्तीमार्गे या संरक्षक बंधारे (खांडी) बांधण्यासाठी स्पष्ट भूमिका घ्यावी. वेळ पडल्यास कायद्याचा आधार घ्यावा, असे आवाहन काराव व खारपाले ग्रामपंचायत तसेच बाधित शेतकºयांनी केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड