शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
2
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
3
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्म-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
4
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
5
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
6
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
7
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
8
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
9
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
10
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
11
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
12
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
13
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
14
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
15
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
16
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
17
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
18
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
19
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
20
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी

मोबदला न मिळाल्याने शेतकरी आक्रमक, वर्ष होऊनही पैसे मिळाले नसल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 00:52 IST

एक वर्षाचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप एक दमडीही पडलेली नाही. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे शेतकºयांमध्ये प्रंचड संतापाची लाट उसळली आहे.

अलिबाग : तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे २०० एकर शेतीच्या दुरुस्तीची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली होती, यासाठी त्यांना एकूण चार लाख रुपये मिळणार होते. मात्र, एक वर्षाचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप एक दमडीही पडलेली नाही. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे शेतकºयांमध्ये प्रंचड संतापाची लाट उसळली आहे.रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने शेती हाच व्यवसाय आहे. शेती सोबतच येथील शेतकरी अन्य जोडधंदे करतात. शेतीची कामे करताना शेतकरी हे एकमेकांच्या शेतीमध्ये मजुरी करतात, ही परंपरा फार जुनी आहे. सध्या मजूर उपलब्ध नसल्याने याच पद्धतीने शेतीची कामे केली जातात. शेतकºयांच्या श्रमाला मोल देण्यासाठी शेती संदर्भातील कामे रोजगार हमी योजनेतून घेण्यात यावी, अशी सर्वप्रथम मागणी शहापूर-धेरंडमधील शेतकºयांनी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून केली होती.गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची बैठक घेऊन भात खाचरांची दुरु स्ती अर्थात कांडवणीची कामे केल्यास रोजगार हमी योजनेच्या मापदंडानुसार बचत खात्यात रक्कम जमा होईल, असे सांगितले होते. त्यानुसार सुमारे १५० एकरमध्ये येथील शेतकºयांनी शेतीची कामे केली होती; परंतु कृषी विभागाने या झालेल्या कामाची नोंद न घेतल्यामुळे शेतकºयांना रोहयोनुसार रक्कम मिळाली नाही. शेतकरी शेतामध्ये हंदा पद्धतीने (आलटपालट ) एकमेकाची कामे करीत असतात. त्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी १ अशी असते. काही शेतकºयांकडे जॉब कार्ड असतात तर काहींकडे ती नसतात. सातबारा आणि आठ-अचे उतारेही नसतात, काही शेतकºयांची बँक खाती असतात, तर काहींची नसतात. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तलाठी यांचा एकमेकांमध्ये सुसंवाद नसल्याने केवळ याच तांत्रिक बाबींची पूर्तता नसल्याने कामे होऊनदेखील त्याची मापे घेतली जात नाहीत, अशी खंत श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) रवींद्र मठपती यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.>२०० एकर क्षेत्राची भात खाचराची दुरु स्तीया वर्षीही आम्ही सुमारे २०० एकर क्षेत्राची भात खाचराची दुरु स्तीची कामे केली आहेत. काही ठिकाणी अद्यापही कामे सुरू आहेत. ग्रामसभेचा ठराव घेतलेला आहे तरी केवळ आपल्या काही विभागाच्या हट्टीपणामुळे या कामाची नोंद होत नाही.आपण लक्ष घालून सुसंवाद साधून केलेल्या कामाची मापे कृषी खात्याने घेऊन शेतकºयांना रोजगार हमी योजनेनुसार रक्कम देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी कोकण आयुक्तांना दिलेल्या निवेदनात के ली.>एका हेक्टरमध्ये५२ जणांना रोजगारएका एकराला दोन हजार रुपयांप्रमाणे २०० एकरांचे चार लाख रुपये शेतकºयांना मिळू शकतात. संपूर्ण पश्चिम खारेपाटातील सुमारे २० गावांतील तब्बल ८० लाख रुपयांची कामे रोजगार हमी योजनेतून होऊ शकतात, असेही श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी स्पष्ट केले.आपण केवळ कागदी निर्देश न देता आमच्या भागास भेट द्यावी आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी करून कृषी खात्यास जागे करावे, अशी विनंती त्यांनी केली.एका हेक्टरमध्ये तब्बल ५२ जणांना वर्षभरासाठी रोजगार उपलब्ध होतो. शेतकरी एकमेकांच्या शेतामध्ये काम करत असल्याने २०० एकरमध्ये सुमारे १५० जणांना रोजगार मिळतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.