शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना ३१ कोटी ५० लाखांचा फटका, भाताला क्विंटलमागे १२० रुपये कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 02:21 IST

रायगड जिल्ह्यातील धान खरेदीसाठी सरकारने तब्बल १ हजार ५५० रुपयांचा हमी भाव जाहीर केला आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील धान खरेदीसाठी सरकारने तब्बल १ हजार ५५० रुपयांचा हमी भाव जाहीर केला आहे. परंतु यावर्षी अद्याप सरकारने बोनस जाहीर न केल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा हमी भाव हा एका क्विंटलमागे १२० रुपयांनी कमी दिला आहे. त्यामुळे तब्बल ३१ कोटी ५० लाख रुपयांचा फटका जिल्ह्यातील शेतकºयांना बसण्याची शक्यता आहे. सरकारने अधिवेशनामध्ये बोनस जाहीर केल्यास शेतकºयांना चांगला दर मिळणार असल्याचे बोलले जाते.जिल्ह्यात एक लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्या माध्यमातून २६ लाख २५ हजार क्विंटल भाताचे उत्पादन होण्याचा कृषी विभागाने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला तर, रायगड जिल्ह्यात ४०६ कोटी ८७ लाख ५० हजार रुपयांची विक्रमी उलाढाल होणार आहे.कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न होण्यासाठी सरकारने जाहीर केलेला एक हजार ५५० रुपयांचा हमी भाव गृहीत धरला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच मालामाल होणार असल्याचे बोलले जाते. केंद्र सरकार देशात सर्वत्र एकच हमी भाव जाहीर करते.गेल्या पाच वर्षांच्या हमीभावावर नजर टाकली असता २०१६-१७ साली सरकारने एक हजार ४७० अधिक २०० रुपये बोनस असा एकूण एक हजार ६७० रुपयांचा हमी भाव दिला होता. त्याचप्रमाणे २०१५-१६ एक हजार ४१० अधिक २५० (१६१० रुपये), २०१४-१५ एक हजार ३५० रुपये, तर २०१३-१४ साली एक हजार २६० अधिक २०० रुपये बोनस (१४६० रुपये) असा दर दिला होता.सरकारने यंदासाठी एक हजार ५५० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे, मात्र त्यामध्ये बोनस जाहीर केलेला नाही. त्यामध्ये २०० रुपये बोनस जाहीर केला असता तर, एक हजार ७५० रुपये प्रति क्विंटल हमी भाव शेतकºयांना मिळाला असता.सरकारने आतासाठी एक हजार ५५० रुपये हमीभाव दिला आहे. गेल्यावर्षी सरकारने १ हजार ४७० अधिक २०० रुपये बोनस असा एकूण एक हजार ६७० हमी भाव दिला होता. यंदा बोनस जाहीर न केल्याने १२० रुपये प्रतिक्विंटल कमी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकºयांचे चांगलेच आर्थिक नुकसान होणार असल्याचे दिसून येते. रायगड जिल्हा हे पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे त्यानंतर औद्योगिकरणाच्या रेट्यामध्ये ती ओळख आता पुसटशी होत आहे. उद्योगांसाठी जमिनी गेल्याने शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. २०१७-१८ साठी जिल्ह्यात १ लाख ५ हजार हेक्टरवर भाताच्या लागवडीचे क्षेत्र आहे.