शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

शेतक-यांना ३१ कोटी ५० लाखांचा फटका, भाताला क्विंटलमागे १२० रुपये कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 02:21 IST

रायगड जिल्ह्यातील धान खरेदीसाठी सरकारने तब्बल १ हजार ५५० रुपयांचा हमी भाव जाहीर केला आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील धान खरेदीसाठी सरकारने तब्बल १ हजार ५५० रुपयांचा हमी भाव जाहीर केला आहे. परंतु यावर्षी अद्याप सरकारने बोनस जाहीर न केल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा हमी भाव हा एका क्विंटलमागे १२० रुपयांनी कमी दिला आहे. त्यामुळे तब्बल ३१ कोटी ५० लाख रुपयांचा फटका जिल्ह्यातील शेतकºयांना बसण्याची शक्यता आहे. सरकारने अधिवेशनामध्ये बोनस जाहीर केल्यास शेतकºयांना चांगला दर मिळणार असल्याचे बोलले जाते.जिल्ह्यात एक लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्या माध्यमातून २६ लाख २५ हजार क्विंटल भाताचे उत्पादन होण्याचा कृषी विभागाने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला तर, रायगड जिल्ह्यात ४०६ कोटी ८७ लाख ५० हजार रुपयांची विक्रमी उलाढाल होणार आहे.कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न होण्यासाठी सरकारने जाहीर केलेला एक हजार ५५० रुपयांचा हमी भाव गृहीत धरला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच मालामाल होणार असल्याचे बोलले जाते. केंद्र सरकार देशात सर्वत्र एकच हमी भाव जाहीर करते.गेल्या पाच वर्षांच्या हमीभावावर नजर टाकली असता २०१६-१७ साली सरकारने एक हजार ४७० अधिक २०० रुपये बोनस असा एकूण एक हजार ६७० रुपयांचा हमी भाव दिला होता. त्याचप्रमाणे २०१५-१६ एक हजार ४१० अधिक २५० (१६१० रुपये), २०१४-१५ एक हजार ३५० रुपये, तर २०१३-१४ साली एक हजार २६० अधिक २०० रुपये बोनस (१४६० रुपये) असा दर दिला होता.सरकारने यंदासाठी एक हजार ५५० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे, मात्र त्यामध्ये बोनस जाहीर केलेला नाही. त्यामध्ये २०० रुपये बोनस जाहीर केला असता तर, एक हजार ७५० रुपये प्रति क्विंटल हमी भाव शेतकºयांना मिळाला असता.सरकारने आतासाठी एक हजार ५५० रुपये हमीभाव दिला आहे. गेल्यावर्षी सरकारने १ हजार ४७० अधिक २०० रुपये बोनस असा एकूण एक हजार ६७० हमी भाव दिला होता. यंदा बोनस जाहीर न केल्याने १२० रुपये प्रतिक्विंटल कमी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकºयांचे चांगलेच आर्थिक नुकसान होणार असल्याचे दिसून येते. रायगड जिल्हा हे पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे त्यानंतर औद्योगिकरणाच्या रेट्यामध्ये ती ओळख आता पुसटशी होत आहे. उद्योगांसाठी जमिनी गेल्याने शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. २०१७-१८ साठी जिल्ह्यात १ लाख ५ हजार हेक्टरवर भाताच्या लागवडीचे क्षेत्र आहे.