शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

जिल्हा प्रशासनावर शेतक-यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:25 IST

रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकºयांच्या मुळावर उठलेल्या रिलायन्स एसईझेडमधील (सेझ) जमिनी पुन्हा परत मिळाव्यात, यासाठी शेतकरी संघटित झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकºयांच्या मुळावर उठलेल्या रिलायन्स एसईझेडमधील (सेझ) जमिनी पुन्हा परत मिळाव्यात, यासाठी शेतकरी संघटित झाले आहेत. जमिनीचा मोबदला परत घेऊन, त्या जमिनी शेतकºयांच्या नावावर परत कराव्यात, या मागणीसाठी त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली उरणमधील शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. रायगड जिल्ह्यासाठी २००५ साली तब्बल २६ सेझ मंजूर केले होते. त्या माध्यमातून शेकडो गावांतील हजारो हेक्टर सुपीक क्षेत्र नष्ट होणार होते. २६ सेझमधील रिलायन्सचा महामुंबई सेझ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकार आणि रिलायन्ससाठी अत्यंत महत्त्वाचा होता. महामुंबई सेझमध्ये पेण, पनवेल आणि उरण तालुक्यांतील ४४ गावांमध्ये प्रस्तावित करण्यात आला होता. हजारो हेक्टर क्षेत्र संपादनात गेले होते. काही शेतकºयांनी जमीन दिली, तर काही शेतकºयांनी त्याला प्रचंड विरोध केला होता. तसेच काही शेतकºयांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी लुबाडण्यात आल्या होत्या. रिलायन्स कंपनीचा उद्योगविश्वात असलेला दबदबा आणि शेतकºयांच्या आंदोलनाला विविध दिग्गज सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली धार, त्यामुळे या आंदोलनाची दखल थेट जागतिक माध्यमांनी घेतली होती.एखादा उद्योग उभारण्यासाठी खरेदी केलेल्या जमिनीवर १५ वर्षांत तेथे प्रकल्प उभारला नाही, तर ती जमीन रक्कम भरून शेतकºयांना परत करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. रिलायन्स कंपनीला ७० टक्के जमिनी खरेदी करता न आल्याने त्यांचा प्रकल्प बारगळला. शेतकºयांच्या आंदोलनापुढे सरकार आणि रिलायन्स कंपनीला झुकावे लागले. त्यांनी महामुंबई सेझ प्रकल्प रद्द केला. उद्योग विभागाच्या १६ जून २००५च्या कायद्याचा आधार घेत, शेतकºयांनी आपापल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी संघटित होऊन जमिनी परत मिळवण्यासाठी संमती दिली.७/१२ वरील कं पनीच्याशिक्क्याने अडचणउरण तालुक्यातील सुमारे सोळाशे शेतकºयांचे सुमारे ४५० हेक्टर क्षेत्र महामुंबईमध्ये समाविष्ट झाले आहे. यासाठी शेतकºयांना एकरी १० ते १५ लाख रु पयांचा दर दिला होता. ती रक्कम सरकारला परत करून आम्हाला आमच्या जमिनी परत मिळाव्यात, अशी मागणी उरण तालुक्यातील शेतकरी रामनाथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. सात-बारावर कंपनीचा शिक्का असल्याने त्यावर काहीच करता येत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शेतकºयांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या पाहिजेत, शेतकरी त्यासाठी रक्कम भरण्यास तयार आहेत. साता-बारावरील रिलायन्सचा शिक्का पुसला पाहिजे, अशी मागणी श्याम म्हात्रे यांनी केली. शेतकºयांकडे उद्योग विभागाच्या आदेशाचा अधिकार आहे, त्यामुळे सरकारने शेतकºयांच्या जमिनी मूळ किमतीमध्ये परत केल्या पाहिजेत, असे अ‍ॅड. दत्तात्रेय नवाळे यांनी सांगितले. शेतकºयांनी आपापल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.