शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनावर शेतक-यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:25 IST

रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकºयांच्या मुळावर उठलेल्या रिलायन्स एसईझेडमधील (सेझ) जमिनी पुन्हा परत मिळाव्यात, यासाठी शेतकरी संघटित झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकºयांच्या मुळावर उठलेल्या रिलायन्स एसईझेडमधील (सेझ) जमिनी पुन्हा परत मिळाव्यात, यासाठी शेतकरी संघटित झाले आहेत. जमिनीचा मोबदला परत घेऊन, त्या जमिनी शेतकºयांच्या नावावर परत कराव्यात, या मागणीसाठी त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली उरणमधील शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. रायगड जिल्ह्यासाठी २००५ साली तब्बल २६ सेझ मंजूर केले होते. त्या माध्यमातून शेकडो गावांतील हजारो हेक्टर सुपीक क्षेत्र नष्ट होणार होते. २६ सेझमधील रिलायन्सचा महामुंबई सेझ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकार आणि रिलायन्ससाठी अत्यंत महत्त्वाचा होता. महामुंबई सेझमध्ये पेण, पनवेल आणि उरण तालुक्यांतील ४४ गावांमध्ये प्रस्तावित करण्यात आला होता. हजारो हेक्टर क्षेत्र संपादनात गेले होते. काही शेतकºयांनी जमीन दिली, तर काही शेतकºयांनी त्याला प्रचंड विरोध केला होता. तसेच काही शेतकºयांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी लुबाडण्यात आल्या होत्या. रिलायन्स कंपनीचा उद्योगविश्वात असलेला दबदबा आणि शेतकºयांच्या आंदोलनाला विविध दिग्गज सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली धार, त्यामुळे या आंदोलनाची दखल थेट जागतिक माध्यमांनी घेतली होती.एखादा उद्योग उभारण्यासाठी खरेदी केलेल्या जमिनीवर १५ वर्षांत तेथे प्रकल्प उभारला नाही, तर ती जमीन रक्कम भरून शेतकºयांना परत करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. रिलायन्स कंपनीला ७० टक्के जमिनी खरेदी करता न आल्याने त्यांचा प्रकल्प बारगळला. शेतकºयांच्या आंदोलनापुढे सरकार आणि रिलायन्स कंपनीला झुकावे लागले. त्यांनी महामुंबई सेझ प्रकल्प रद्द केला. उद्योग विभागाच्या १६ जून २००५च्या कायद्याचा आधार घेत, शेतकºयांनी आपापल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी संघटित होऊन जमिनी परत मिळवण्यासाठी संमती दिली.७/१२ वरील कं पनीच्याशिक्क्याने अडचणउरण तालुक्यातील सुमारे सोळाशे शेतकºयांचे सुमारे ४५० हेक्टर क्षेत्र महामुंबईमध्ये समाविष्ट झाले आहे. यासाठी शेतकºयांना एकरी १० ते १५ लाख रु पयांचा दर दिला होता. ती रक्कम सरकारला परत करून आम्हाला आमच्या जमिनी परत मिळाव्यात, अशी मागणी उरण तालुक्यातील शेतकरी रामनाथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. सात-बारावर कंपनीचा शिक्का असल्याने त्यावर काहीच करता येत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शेतकºयांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या पाहिजेत, शेतकरी त्यासाठी रक्कम भरण्यास तयार आहेत. साता-बारावरील रिलायन्सचा शिक्का पुसला पाहिजे, अशी मागणी श्याम म्हात्रे यांनी केली. शेतकºयांकडे उद्योग विभागाच्या आदेशाचा अधिकार आहे, त्यामुळे सरकारने शेतकºयांच्या जमिनी मूळ किमतीमध्ये परत केल्या पाहिजेत, असे अ‍ॅड. दत्तात्रेय नवाळे यांनी सांगितले. शेतकºयांनी आपापल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.