शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी होणार मालामाल!

By admin | Updated: May 5, 2016 00:46 IST

रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख पुसण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने चंग बांधला आहे. भाताच्या पिकावरच अवलंबून न राहता नगदी पिके शेतकऱ्यांनी

- आविष्कार देसाई, अलिबाग

रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख पुसण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने चंग बांधला आहे. भाताच्या पिकावरच अवलंबून न राहता नगदी पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. केरळची लाल केळी, हळद आणि त्यापाठोपाठ आता भुईमुगाच्या शेंगाचे पीक जिल्ह्यातील पोलादपूर, माणगाव आणि महाड तालुक्यात घेतले आहे. एक हजार एकराच्या माध्यमातून सुमारे १४ कोटी रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरात पडून शेतकरी मालामाल होणार आहेत.जिल्ह्यात पूर्वी भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. भाताच्या पिकामुळे रायगड जिल्हा समृध्द होता. कालांतराने औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागल्याने शेतकऱ्यांच्या बहुतांश जमिनी या उद्योगामध्ये गेल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार मोठ्या संख्येनेही भाताच्या पिकावरच राहिली होती. त्यामुळे आर्थिक सुबत्ता येण्यात अडचणी निर्माण झाल्या. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा यासाठी त्यांनी नगदी पिकांकडे वळले पाहिजे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेने अलीकडच्या काळात प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती अरविंद म्हात्रे यांनी लोकमतला दिली.भुईमुगाच्या पिकावर पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी असायची त्याच पावलावर पाऊल ठेवत रायगड जिल्ह्यातील माणगाव, पोलादपूर आणि महाड तालुक्यात भुईमुगाचे पीक घेण्यात आले आहे. महाड तालुक्यात ७०० एकरावर, पोलादपूर तालुक्यात सुमारे २०० एकरामध्ये आणि माणगाव तालुक्यातील १० यासह अन्य ठिकाणी ९० एकरामध्ये भुईमुगाचे पीक घेण्यात आले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.३० ते ३०० क्विंटल भुईमुगाचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. शेतीच्या कामांसाठी मजूर मिळत नसल्याने भुईमूग तोडणी यंत्र ५० टक्के अनुदानावर कृषी विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या यंत्राची किंमत ४८ हजार रुपये आहे. शेतकऱ्यांना फक्त २४ हजार रुपयांमध्ये हे यंत्र मिळणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.एकरामध्ये सुमारे २० क्विंटल भुईमूग- भुईमुगाला बाजारामध्ये सुमारे सात हजार रुपये क्विंटल दर आहे. - एका एकरामध्ये सुमारे २० क्विंटल भुईमूग तयार होतो. त्याची किंमत एक लाख ४० हजार रुपये होते. - सध्या एक हजार एकरावर हे पीक घेण्यात आले आहे. त्यानुसार १४ कोटी रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे. - महाड तालुक्यामध्ये सहा लाख रुपये किमतीची मिनी आॅईल मिलही उभारण्यात आली आहे.