शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

महामार्गाच्या कामाचा शेतकऱ्याला फटका

By admin | Updated: May 7, 2017 06:17 IST

महामार्गाच्या रुंदीकरणात नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीची खालील बाजूची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात

राजू भिसे/ लोकमत न्यूज नेटवर्कनागोठणे : महामार्गाच्या रुंदीकरणात नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीची खालील बाजूची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात शेतात साचणारे पाणी जायला जागाच राहिलेली नाही. उन्हाळ्यातही शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने भात, तसेच कडधान्याचे पीक घेता न आल्याने एका शेतकऱ्याला नुकसान सोसावे लागले आहे. महामार्गाचे ठेकेदार मोरीची सुधारणा करण्याचे गेली ३ वर्षे फक्त आश्वासनच देत असून, तीन ते चार वर्षे शेती नापीकच राहिल्याची माहिती अयुब मुल्ला यांनी दिली.अयुब मुल्ला आणि त्यांच्या बंधूंची मुंबई-गोवा महामार्गाच्या नागोठणे-पेण फाट्यावर पूर्व बाजूला गट नं. १९३ मध्ये १-६५-३ हे. आर. अशी वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या ठिकाणी १० खंडी भात, तसेच १० पोती वाल आणि पावटा या कडधान्याची पिके दरवर्षी घेतली जायची. महामार्गाच्या रुंदीकरणात जुन्या रस्त्याला जोडून दुसरी मोरी बांधण्यात आलेल्या नवीन मोरीची खालील उंची २ फुटांनी वाढविण्यात आल्याने शेतातच अडून राहते, असे अयुब मुल्ला यांनी सांगितले. केवळ आश्वासने महामार्गाचे ठेकेदार असलेल्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत तीन ते चार वेळा ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, आश्वासनांव्यतिरिक्त प्रत्यक्षात काहीही होत नाही. याबाबत दोन वर्षांपूर्वी रोहे तहसीलदारांचेसुद्धा निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते.