शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

फार्म टू फोर्क हापूस आंबा प्रेमींसाठी पोस्टाची सेवा, आपका दोस्त इंडिया पोस्ट ही टॅगलाईन

By वैभव गायकर | Updated: April 27, 2024 15:51 IST

विस्तृत, सुलभ, जलद आणि तळागाळापर्यंत पोहचलेल्या नेटवर्कमुळे आता देशभरातील आंबा प्रेमी दर्जैदार आंबे घरपोच प्राप्त करू शकणार आहेत. 

पनवेल : फळांचा राजा समजला जाणारा आंबा देशातच नव्हे तर आंतराष्ट्रीय स्तरावर पोहचणार आहे.'फार्म टू फोर्क' या नाविन्यपूर्ण संकल्पनेसह भारतीय पोस्ट विभागाने विस्तृत, सुलभ, जलद आणि तळागाळापर्यंत पोहचलेल्या नेटवर्कमुळे आता देशभरातील आंबा प्रेमी दर्जैदार आंबे घरपोच प्राप्त करू शकणार आहेत. 

विशेष म्हणजे पोस्टाच्या सेवांचे दर इतर खासगी कुरिअर सेवांपेक्षा कमी असून त्यामुळे ग्राहकांना कमी दरात आंबे घरपोच मिळण्यास मदत होणार आहे. नवी मुंबई पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक मोहम्मद साहिद यांनी सांगितले की, फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबई पोस्टानं एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी नवी मे. बेरीडेल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत करार केला असून त्याद्वारे शेतातील ताजे व दर्जेदार हापूस आंबे थेट ग्राहकांच्या  घरापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. भारतीय देशांतर्गत बाजारपेठे व्यतिरिक्त जपान, यूएसए, ऑस्ट्रेलिया, कोरिया प्रजासत्ताक, सिंगापूर आणि युरोप या देशांमधे सुद्धा कंपनी आपल्या फळांची निर्यात करत आहे. मे. बेरीडेल फुड्स प्रा लि ही जपानला आंबे निर्यात करणाऱ्या सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहे.भारतीय डाक विभाग आणि प्रसिद्ध आंबा निर्यातदार मे. बेरीडेल फुड्स प्रा लि यांच्यातील सामंजस्य करार हा आंबा पुरवठा क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणार असून  या भागीदारी अंतर्गत बेरीडेल फुड्स फक्त भारतातील ग्राहकांनाच नाही तर त्यांच्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सुद्धा विभागामार्फत त्यांचे दर्जेदार आंबे पोहचू शकणार आहे. 

पोस्ट विभागाच्या 'रोड ट्रान्सपोर्ट नेटवर्क' च्या माध्यमातून 1200 किलो वजनाच्या 380 आंब्यांच्या पेट्यांची घरपोच डिलिव्हरी आतापर्यंत करण्यात आलेली आहे. आंबा उत्पादक शेतकरी आणि पुरवठादारांनी आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी डाक विभागाच्या पार्सल सेवेचा तसेच  डाक विभाग आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने पुरवण्यात येणाऱ्या 'रेल डाक गतीशक्ती योजने' चा वापर करावा असे आवाहन नवी मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक मोहम्मद साहिद यांनी केले आहे. 

'फॉर्म टू फोर्क अल्फांसो डिलिव्हरी' या संकल्पनेच्या माध्यमातून भारतीय टपाल खात्यानं हापुस आंबा पुरवठ्याच्या क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण क्रांती घडवून आणली असून या संकल्पनेच्या माध्यमातून भारतीय डाक विभाग आंबा उत्पादक आणि आंबाप्रेमी यांच्यामधील एक महत्वाचा दुवा ठरत आहे.

टॅग्स :Mangoआंबा