शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पेणमधील ९,४९६ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:52 IST

उत्पादन खर्चही निघेना : तालुक्यातील २८४०.६६ हेक्टर क्षेत्र बाधित

- दत्ता म्हात्रे पेण : अवकाळी पावसामुळे पेण तालुक्यातील १४० गावांमधील ९,४९६ खातेदार शेतकऱ्यांच्या २८४०.६६ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे उत्पादन मातीमोल ठरले आहे. तब्बल सात हजार १०२ एकर भातशेतीला अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले असून शेतकरी देशोधडीला लागला आहे.रायगड जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून नुकसानीचा अहवाल कोकण आयुक्तांना पाठविला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ७९ हजार १३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तब्बल एक हजार ८१६ गावांमधील ७१ हजार १३ खातेदार शेतकºयांचे १८ कोटी, १० लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची आकडेवारी आयुक्तांकडे अहवालातून पाठविण्यात आली आहे. शेष राहिलेल्या भातपीक उत्पादनात उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकºयांचा एकरी १८ हजार ते १९ हजार रुपये उत्पादन खर्च झाला आहे. तर हातात जेमतेम तीन ते चार हजार रुपये पडणार असल्याचे झोडणी केलेल्या भातपीक उतारावरून दिसत आहे. खरिपाचे पीक हातातून गेल्याने वर्षभर मजुरी करून शेतकºयांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागणार आहे.पेण तालुक्यातील आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत महापूर येऊन भातशेतीला पावसाचा पहिला तडाखा बसला होता. पेणच्या पश्चिमेला असलेली खारभूमी शेती पुराने पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर इकडून तिकडून रोपे गोळा करून लागवड केलेली भातशेती आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत आलेल्या अवकाळी पावसामुळे वाया गेली आहे. शासकीय पंचनामे पूर्ण करून जाहीर झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीत पेणची १४० गावातील ९,४९६ खातेदार शेतकºयांची २८४०.६६ हेक्टर क्षेत्रावरील भातशेती नष्ट झाली आहे. आर्थिक नुकसानीची आकडेवारी एक कोटी ९३ लाख १६ हजार रुपये सरकारी अहवालात नमूद करण्यात आली आहे.यंदा खरीपातील उत्पन्नाचा हिशोब द्यावयाचा झाल्यास ‘आमदानी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या’ असा आहे. एक एकरी भातशेती उत्पादन खर्च १८ ते १९ हजार रुपये इतका खर्च होतो. सरासरी अडीच ते तीनपट उत्पादन घेतले जाते. २१ ते २२ क्विंटल एकरी भातशेतीतून भाताचे उत्पादन घेतले जाते. एकरी ५५ ते ६० हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. मात्र, यंदा एकरी जेमतेम तीन ते चार क्विंटल इतकेच हाती उत्पन्न मिळत असल्याने केलेला खर्च भरून निघणार नाही.शेती उत्पादनाचा एकरी खर्चएक एकर शेतीला टॅक्टरद्वारे जमीन उखळणीसाठी १००० रुपये, भातपीक वाफे (राब) तयार करणे १५००, शेताचे बांध मजबुती करणे १५००, बी-बियाणे १२००, खते व कीटकनाशके २५००, तण काढणे १००० रुपये, लागवड ३०००, कापणी ३५००, बांधणी १०००, झोडणी ३०००, असे एकूण १८ ते १९ हजार एकरी खर्च येतो. मात्र, खरिपाच्या उत्पन्नाची बेगमी करून जर हातात जेमतेम पडणार असल्याने अवकाळीने खरीप हंगामाची धूळधाण उडविली आहे.