शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पेणमधील ९,४९६ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:52 IST

उत्पादन खर्चही निघेना : तालुक्यातील २८४०.६६ हेक्टर क्षेत्र बाधित

- दत्ता म्हात्रे पेण : अवकाळी पावसामुळे पेण तालुक्यातील १४० गावांमधील ९,४९६ खातेदार शेतकऱ्यांच्या २८४०.६६ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे उत्पादन मातीमोल ठरले आहे. तब्बल सात हजार १०२ एकर भातशेतीला अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले असून शेतकरी देशोधडीला लागला आहे.रायगड जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून नुकसानीचा अहवाल कोकण आयुक्तांना पाठविला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ७९ हजार १३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तब्बल एक हजार ८१६ गावांमधील ७१ हजार १३ खातेदार शेतकºयांचे १८ कोटी, १० लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची आकडेवारी आयुक्तांकडे अहवालातून पाठविण्यात आली आहे. शेष राहिलेल्या भातपीक उत्पादनात उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकºयांचा एकरी १८ हजार ते १९ हजार रुपये उत्पादन खर्च झाला आहे. तर हातात जेमतेम तीन ते चार हजार रुपये पडणार असल्याचे झोडणी केलेल्या भातपीक उतारावरून दिसत आहे. खरिपाचे पीक हातातून गेल्याने वर्षभर मजुरी करून शेतकºयांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागणार आहे.पेण तालुक्यातील आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत महापूर येऊन भातशेतीला पावसाचा पहिला तडाखा बसला होता. पेणच्या पश्चिमेला असलेली खारभूमी शेती पुराने पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर इकडून तिकडून रोपे गोळा करून लागवड केलेली भातशेती आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत आलेल्या अवकाळी पावसामुळे वाया गेली आहे. शासकीय पंचनामे पूर्ण करून जाहीर झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीत पेणची १४० गावातील ९,४९६ खातेदार शेतकºयांची २८४०.६६ हेक्टर क्षेत्रावरील भातशेती नष्ट झाली आहे. आर्थिक नुकसानीची आकडेवारी एक कोटी ९३ लाख १६ हजार रुपये सरकारी अहवालात नमूद करण्यात आली आहे.यंदा खरीपातील उत्पन्नाचा हिशोब द्यावयाचा झाल्यास ‘आमदानी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या’ असा आहे. एक एकरी भातशेती उत्पादन खर्च १८ ते १९ हजार रुपये इतका खर्च होतो. सरासरी अडीच ते तीनपट उत्पादन घेतले जाते. २१ ते २२ क्विंटल एकरी भातशेतीतून भाताचे उत्पादन घेतले जाते. एकरी ५५ ते ६० हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. मात्र, यंदा एकरी जेमतेम तीन ते चार क्विंटल इतकेच हाती उत्पन्न मिळत असल्याने केलेला खर्च भरून निघणार नाही.शेती उत्पादनाचा एकरी खर्चएक एकर शेतीला टॅक्टरद्वारे जमीन उखळणीसाठी १००० रुपये, भातपीक वाफे (राब) तयार करणे १५००, शेताचे बांध मजबुती करणे १५००, बी-बियाणे १२००, खते व कीटकनाशके २५००, तण काढणे १००० रुपये, लागवड ३०००, कापणी ३५००, बांधणी १०००, झोडणी ३०००, असे एकूण १८ ते १९ हजार एकरी खर्च येतो. मात्र, खरिपाच्या उत्पन्नाची बेगमी करून जर हातात जेमतेम पडणार असल्याने अवकाळीने खरीप हंगामाची धूळधाण उडविली आहे.