शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतीला फटका; दक्षतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 22:44 IST

महाचक्रिवादळामुळे मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात जाण्यास मज्जाव

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अलिबाग, पेण, पाली आणि रोहासह अन्य भागांमध्ये पावसाने कहर केला. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाचक्रिवादळही निर्माण झाले आहे. या महाचक्रिवादळाचा कोकण किनारपट्टीला फटका बसणार नसला तरी ८ नोव्हेंबरपर्यंत महाचक्रिवादळाची तीव्रता राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा भातशेतीला बसला आहे. महाचक्रिवादळामुळे मासेमारी करणाऱ्यांनाही मज्जाव करण्यात आला असल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस अधूनमधून बरसत असल्याने मोठ्या प्रमाणात भातशेती उद्ध्वस्त झाली आहे. दसरा आणि दिवाळीच्या कालावधीमध्ये भात कापणीला सुरुवात करण्यात येते. मात्र, याच कालावधीत परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतामधील भाताचे पीक आडवे झाले. अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, माणगाव या तालुक्यातील शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यानंतरही पावसाचा जोर सुरूच होता. अलिबाग, पेण, पाली आणि रोहा या ठिकाणी पावसाचा जोर अधिक असल्याने जनजीवन विस्कळीत झाले.सतत बदलत जाणाºया हवामानामुळे गेल्या काही दिवसांपासून समुद्रही खवळलेल्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे मासेमारी करणाºया नौकाही किनाºयावरच उभ्या आहेत. त्यामुळे मच्छीमार बांधवांना मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये जाता न आल्याने त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वादळी वाºयासह बरसणाºया पावसामुळे काही ठिकाणच्या घरांचे छप्पर उडून गेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्ष पुन्हा दक्ष करण्यात आला आहे. मदतीसाठी नागरिक या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.नियंत्रण कक्ष २४ तास सुरूगेले काही दिवस पावसाने कहर केल्यामुळे भातशेतीची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात आले आहेत. पंचनामे झाले नसतील, तसेच पंचनाम्यामध्ये काही तक्रारी असल्यास तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.बेलाची वाडीला चक्रिवादळाचा तडाखाकर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास अचानक चक्रिवादळाने थैमान घालत अवघ्या काही मिनिटांत मोठमोठाले झाडे उन्मळून पडली. विजेचे लोखंडी खांब वाकून काही खांब पडले. अनेक ठिकाणी झाडे घरावर व दुकानावर पडून मोठे नुकसान झाले. तर घरावरचे छप्पर उडून सामान्य नागरिकांना याचा आर्थिक फटका बसला आहे.

कर्जत तालुक्यातील अंभेर पाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाची वाडी परिसरात अचानक आलेल्या चक्रिवादळाने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तर महावितरणलाही या चक्रिवादळाचा मोठा फटका बसला. अनेक घरांची पडझड झाली असून झाडे उन्मळून घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यात विद्युत खांब पडल्याने परिसर दोन दिवसांपासून अंधारात आहे. तालुक्यात परतीच्या पावसाचा कहर सुरूच असून बुधवार, ३० आॅक्टोबरला अंभेरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाचीवाडी परिसरात रात्रीच्या वेळी झालेल्या वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. महादू लोहकरे यांच्या घराचे नुकसान झाले असून दुंदा कोकाटे यांच्या वीटभट्टीवर आंब्याचे मोठे झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे़ त्याचप्रमाणे चंद्रकांत कोकाटे यांच्या दुकानाचे व मारुती पारधी यांच्या घराची पत्रे फुटल्याने नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उभे पीक आडवे झाले, शेतातच भिजून कुजल्याने हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतल्याने बळीराजाची यंदाची दिवाळी काळी झाली, यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस