शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतीला फटका; दक्षतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 22:44 IST

महाचक्रिवादळामुळे मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात जाण्यास मज्जाव

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अलिबाग, पेण, पाली आणि रोहासह अन्य भागांमध्ये पावसाने कहर केला. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाचक्रिवादळही निर्माण झाले आहे. या महाचक्रिवादळाचा कोकण किनारपट्टीला फटका बसणार नसला तरी ८ नोव्हेंबरपर्यंत महाचक्रिवादळाची तीव्रता राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा भातशेतीला बसला आहे. महाचक्रिवादळामुळे मासेमारी करणाऱ्यांनाही मज्जाव करण्यात आला असल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस अधूनमधून बरसत असल्याने मोठ्या प्रमाणात भातशेती उद्ध्वस्त झाली आहे. दसरा आणि दिवाळीच्या कालावधीमध्ये भात कापणीला सुरुवात करण्यात येते. मात्र, याच कालावधीत परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतामधील भाताचे पीक आडवे झाले. अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, माणगाव या तालुक्यातील शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यानंतरही पावसाचा जोर सुरूच होता. अलिबाग, पेण, पाली आणि रोहा या ठिकाणी पावसाचा जोर अधिक असल्याने जनजीवन विस्कळीत झाले.सतत बदलत जाणाºया हवामानामुळे गेल्या काही दिवसांपासून समुद्रही खवळलेल्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे मासेमारी करणाºया नौकाही किनाºयावरच उभ्या आहेत. त्यामुळे मच्छीमार बांधवांना मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये जाता न आल्याने त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वादळी वाºयासह बरसणाºया पावसामुळे काही ठिकाणच्या घरांचे छप्पर उडून गेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्ष पुन्हा दक्ष करण्यात आला आहे. मदतीसाठी नागरिक या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.नियंत्रण कक्ष २४ तास सुरूगेले काही दिवस पावसाने कहर केल्यामुळे भातशेतीची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात आले आहेत. पंचनामे झाले नसतील, तसेच पंचनाम्यामध्ये काही तक्रारी असल्यास तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.बेलाची वाडीला चक्रिवादळाचा तडाखाकर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास अचानक चक्रिवादळाने थैमान घालत अवघ्या काही मिनिटांत मोठमोठाले झाडे उन्मळून पडली. विजेचे लोखंडी खांब वाकून काही खांब पडले. अनेक ठिकाणी झाडे घरावर व दुकानावर पडून मोठे नुकसान झाले. तर घरावरचे छप्पर उडून सामान्य नागरिकांना याचा आर्थिक फटका बसला आहे.

कर्जत तालुक्यातील अंभेर पाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाची वाडी परिसरात अचानक आलेल्या चक्रिवादळाने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तर महावितरणलाही या चक्रिवादळाचा मोठा फटका बसला. अनेक घरांची पडझड झाली असून झाडे उन्मळून घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यात विद्युत खांब पडल्याने परिसर दोन दिवसांपासून अंधारात आहे. तालुक्यात परतीच्या पावसाचा कहर सुरूच असून बुधवार, ३० आॅक्टोबरला अंभेरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाचीवाडी परिसरात रात्रीच्या वेळी झालेल्या वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. महादू लोहकरे यांच्या घराचे नुकसान झाले असून दुंदा कोकाटे यांच्या वीटभट्टीवर आंब्याचे मोठे झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे़ त्याचप्रमाणे चंद्रकांत कोकाटे यांच्या दुकानाचे व मारुती पारधी यांच्या घराची पत्रे फुटल्याने नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उभे पीक आडवे झाले, शेतातच भिजून कुजल्याने हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतल्याने बळीराजाची यंदाची दिवाळी काळी झाली, यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस