शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

कुपोषण रोखण्यात आरोग्य यंत्रणेला कर्जतमध्ये अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 02:58 IST

तालुक्यातील आदिवासीबहुल भागात कुपोषण आजही दिसून येत आहे.

कर्जत : तालुक्यातील आदिवासीबहुल भागात कुपोषण आजही दिसून येत आहे. कुपोषण निर्मूलनासाठी सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी अद्याप कुपोषण रोखण्यात यश आलेले नाही. गेल्या तीन वर्षात कुपोषणामुळे तालुक्यात दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. तर तालुक्यातील सॅम आणि मॅममध्ये ३०० च्या आसपास बालके असल्याने आरोग्य यंत्रणेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाने आदिवासी विकास विभाग पेणअंतर्गत प्रकल्प स्थापन केले आहे. मात्र तरीदेखील आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्यात शासकीय यंत्रणा यशस्वी होत नाहीत. तालुक्यात सद्यस्थितीत अतितीव्र कुपोषित म्हणजे सॅम गटात ५६ बालके आहेत तर मध्यमतीव्र गटात म्हणजे मॅम श्रेणीमध्ये १५० हून अधिक बालके आहेत. कुपोषण निर्मूलनासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालकल्याण विभागाला आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा नियोजन मंडळ आर्थिक निधी पुरवून मदत करीत असते तर आरोग्य विभाग गावोगाव जाऊन तपासणी करीत असते.मात्र ज्यांची जबाबदारी आहे, त्या एकात्मिक बालकल्याण विकास विभागाची यंत्रणा कमी पडत असल्याने तालुक्यात कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत.दोन वर्षात कळंब आणि मोरेवाडी येथील अंगणवाडी केंद्रातील बालकांचा कुपोषणाने बळी गेल्यानंतर देखील आरोग्य तसेच एकात्मिक बालकल्याण विकास विभाग सुस्त आहे. तसेच अंगणवाडी विभागही आपली कामे वेळेवर करीत नसल्याने कुपोषण खाली येत नसल्याचा आरोप स्वयंसेवी संस्था करीत असतात.तालुक्यात ३६० अंगणवाडी केंद्रे असून त्या प्रत्येक केंद्रावर दर महिन्याला जाऊन पर्यवेक्षिका बालकांना पोषण आहार मिळतो का? त्यांची वजन आणि उंची मोजली का? हे पहायचे असते.पर्यवेक्षिका या महिन्यातून नाही तर तीन महिन्यातून एकदा अंगणवाडी केंद्राला भेट देतात. तर आदिवासी भागातील अंगणवाडी केंद्रांवर दर दोन महिन्यांनी पोषण आहार पोहोचिवला जात नाही तर सहा महिन्यांचा पोषण आहार एकदम पोहच केला जातो. त्यामुळे मुदत संपलेले अन्न बालकांना खावे लागते. यावर नियंत्रण मिळविण्याचे काम एकात्मिक बालकल्याण विभाग करताना दिसत नाही.>पोषण आहार मिळण्यास विलंबमोरेवाडी येथील आदिवासी बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग जिल्ह्याचे बाल चिकित्सा केंद्र कर्जत येथे सुरू करणार अशी चर्चा होती. मोरेवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असताना त्यात काही नवीन बदल झाले नाहीत.बाल उपचार केंद्र कर्जत उपजिल्हा रु ग्णालयात उघडले जाते पण आदिवासी आणि गरीब कुटुंबातील पालक रोजगार बुडतो म्हणून २१ दिवस राहण्याचे बंधन असताना आठ दिवस पण राहत नाहीत. त्यावेळी अंगणवाडी केंद्र सेविका त्यांना तेथे थांवबून ठेवण्यात यशस्वी ठरत नसल्याने कुपोषण खाली येत नाहीत.