शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

मध्य रेल्वेच्या लौजी स्थानकात सुविधांची वानवा

By admin | Updated: February 23, 2017 06:13 IST

मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून थेट खोपोलीस उपनगरीय सेवा सुरू करून

मोहोपाडा : मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून थेट खोपोलीस उपनगरीय सेवा सुरू करून तब्बल १६ वर्षांचा कालखंड उलटला असला, तरी या मार्गावरील लौजी, डोलवली, केळवली व पळसदरी या स्थानकांची अवस्था बिकटच आहे. या रेल्वेस्थानकांवर मूलभूत सुविधांची वानवा आहे, तसेच फलाटावर झाडे-झुडपे वाढली असून, याचा प्रवाशांना त्रास होत आहे. येथील झाडांची, गवताची कापणी करून फलाट स्वच्छ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.फलाटांवर वाढलेली झुडपे, प्रवाशांना बसण्याची गैरसोय, अपुरी प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची कमतरता, स्वच्छतागृहांचा नुसताच देखावा, फलाटावरील निवारा शेडची कमतरता, परिणामी, ऊन- वारा -पाऊस या तिन्ही हंगामाचा प्रवाशांना करावा लागणारा सामना, तसेच परतीच्या प्रवासाची व पहिल्या वर्गाची तिकिटे न मिळणे, अशा समस्या या मार्गावरील प्रवाशांना सतावत आहेत. तर ६० वर्षांपूर्वी चार पत्र्यांची उभारलेली शेड अद्याप पडक्या अवस्थेत उभी असून त्यामध्ये होणारी घाण व झुडपे यामुळे प्रवाशांंना त्रास होत आहे. मुंबई-पुणे बोरघाट-कर्जत-लोणावळा असा थेट प्रवास सुरू होण्याअगोदर खोपोलीतून प्रवास होत असे. खोपोली रेल्वे १९०२ मध्ये सुरू झाली. मात्र, जुनी रेल्वेसेवा असूनही रेल्वे प्रशासन या मार्गावरील प्रवाशांंना सुविधा देण्यास अद्याप कमी पडत असल्याचे चित्र रेल्वेस्थानकांवरील फलाटांवर पाहावयास मिळत आहेत.केळवली, डोलवली, पळसदरी स्थानकांची दुर्दशाच्खोपोलीचे प्रवेशद्वार म्हणून व नवीन खोपोली म्हणून उदयास येणाऱ्या लौजी स्थानकात गवत व झाडे-झुडपे पाहून हेच रेल्वेचे स्थानक आहे का? असा प्रश्न रेल्वेप्रवासी करीत आहेत. तर याहीपेक्षा बिकट अवस्था केळवली, डोलवली व पळसदरी रेल्वेस्थानकांची आहे. च्मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जत, नेरळ रेल्वेस्थानकांना भेटी देऊन स्थानकांची पाहणी केली. त्यादरम्यान ही स्थानके स्वच्छ व चकचकीत करण्यात आली होती. मात्र, कर्जतच्या पुढील पळसदरी, केळवली, डोलवली व लौजी ही स्थानके अद्यापही जंगली झुडपात हरवलेली असून, असुविधांचे माहेरघर ठरत आहेत.च्केळवली, डोलवली व लौजी या स्थानकांत रेल्वेचा एकही कर्मचारी नाही, अशी स्थानके भारतीय रेल्वेच्या सेवेतील एकमेव स्थानके असावीत आणि तीही भारतीय रेल्वेने अभिमानाने मिरवणाऱ्या व रेल्वेचा उगम असणाऱ्या मुंबईपासून फक्त ११० कि.मी. अंतरावर असणाऱ्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेतील खोपोली मार्गावरील लौजी, डोलवली व केळवली ही स्थानके आहेत.