शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या लौजी स्थानकात सुविधांची वानवा

By admin | Updated: February 23, 2017 06:13 IST

मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून थेट खोपोलीस उपनगरीय सेवा सुरू करून

मोहोपाडा : मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून थेट खोपोलीस उपनगरीय सेवा सुरू करून तब्बल १६ वर्षांचा कालखंड उलटला असला, तरी या मार्गावरील लौजी, डोलवली, केळवली व पळसदरी या स्थानकांची अवस्था बिकटच आहे. या रेल्वेस्थानकांवर मूलभूत सुविधांची वानवा आहे, तसेच फलाटावर झाडे-झुडपे वाढली असून, याचा प्रवाशांना त्रास होत आहे. येथील झाडांची, गवताची कापणी करून फलाट स्वच्छ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.फलाटांवर वाढलेली झुडपे, प्रवाशांना बसण्याची गैरसोय, अपुरी प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची कमतरता, स्वच्छतागृहांचा नुसताच देखावा, फलाटावरील निवारा शेडची कमतरता, परिणामी, ऊन- वारा -पाऊस या तिन्ही हंगामाचा प्रवाशांना करावा लागणारा सामना, तसेच परतीच्या प्रवासाची व पहिल्या वर्गाची तिकिटे न मिळणे, अशा समस्या या मार्गावरील प्रवाशांना सतावत आहेत. तर ६० वर्षांपूर्वी चार पत्र्यांची उभारलेली शेड अद्याप पडक्या अवस्थेत उभी असून त्यामध्ये होणारी घाण व झुडपे यामुळे प्रवाशांंना त्रास होत आहे. मुंबई-पुणे बोरघाट-कर्जत-लोणावळा असा थेट प्रवास सुरू होण्याअगोदर खोपोलीतून प्रवास होत असे. खोपोली रेल्वे १९०२ मध्ये सुरू झाली. मात्र, जुनी रेल्वेसेवा असूनही रेल्वे प्रशासन या मार्गावरील प्रवाशांंना सुविधा देण्यास अद्याप कमी पडत असल्याचे चित्र रेल्वेस्थानकांवरील फलाटांवर पाहावयास मिळत आहेत.केळवली, डोलवली, पळसदरी स्थानकांची दुर्दशाच्खोपोलीचे प्रवेशद्वार म्हणून व नवीन खोपोली म्हणून उदयास येणाऱ्या लौजी स्थानकात गवत व झाडे-झुडपे पाहून हेच रेल्वेचे स्थानक आहे का? असा प्रश्न रेल्वेप्रवासी करीत आहेत. तर याहीपेक्षा बिकट अवस्था केळवली, डोलवली व पळसदरी रेल्वेस्थानकांची आहे. च्मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जत, नेरळ रेल्वेस्थानकांना भेटी देऊन स्थानकांची पाहणी केली. त्यादरम्यान ही स्थानके स्वच्छ व चकचकीत करण्यात आली होती. मात्र, कर्जतच्या पुढील पळसदरी, केळवली, डोलवली व लौजी ही स्थानके अद्यापही जंगली झुडपात हरवलेली असून, असुविधांचे माहेरघर ठरत आहेत.च्केळवली, डोलवली व लौजी या स्थानकांत रेल्वेचा एकही कर्मचारी नाही, अशी स्थानके भारतीय रेल्वेच्या सेवेतील एकमेव स्थानके असावीत आणि तीही भारतीय रेल्वेने अभिमानाने मिरवणाऱ्या व रेल्वेचा उगम असणाऱ्या मुंबईपासून फक्त ११० कि.मी. अंतरावर असणाऱ्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेतील खोपोली मार्गावरील लौजी, डोलवली व केळवली ही स्थानके आहेत.