शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पेयजल योजनेतील नवनवीन भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 02:55 IST

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेकडील राष्ट्रीय पेयजल योजनेतील नवनवीन भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत आहेत.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेकडील राष्ट्रीय पेयजल योजनेतील नवनवीन भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी आखण्यात आलेल्या कोट्यवधी रु पयांच्या योजना ठेकेदार कंपनीच्या घशात संगनमताने घातल्या जात असल्याचे बोलले जाते. या प्रकरणी प्रशासन आणि सरकारने तातडीने कारवाई करून जनतेच्या पैशाचा अपव्यय टाळावा, अशी मागणी जोर धरीत आहे.तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत तीनवीरा वाढीव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र, फिल्टर प्लँट यासारखी प्रमुख कामे अपूर्ण असताना ठेकेदार कंपनीला जवळपास सुमारे पावणेतीन कोटी रुपये बिल अदा केल्याचे समोर आले आहे.ग्राम शिखर समिती तीनवीरा तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व जबाबदार अधिकाºयांची चौकशी करण्याची मागणी अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाकडे लेखी पत्र पाठवून केली आहे. याआधीही उमटे पाणीपुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी मांडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता तीनवीरा धरणाबाबतचा प्रश्न पुढे आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये सावळागोंधळ असल्याचे अधोरेखित होते.तीनवीरा वाढीव पाणीपुरवठा योजनेचे टेंडर शिखर समितीने २६ नोव्हेंबर २0१३ रोजी उघडून ते आमदार सुभाष पाटील यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या सुप्रभात इन्फ्राझोन या ठेकेदार कंपनीला मंजूर केले. ही बाब सावंत यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीनुसार उघड केली.योजनेतील अटी शर्तीनुसार ठेकेदाराला कोणतेही अ‍ॅडव्हान्स देय नसल्याने सनदी लेखापाल यांनी या गोष्टीस हरकत घेतल्याची बाबही माहिती अधिकारात समोर आली आहे. या योजनेस जिल्हा परिषदेने १ आॅक्टोबर २०१३ ला प्रशासकीय मान्यता दिली. त्यापूर्वीच म्हणजे योजना मंजूर होण्यापूर्वीच ग्राम शिखर समिती तीनवीरा यांनी या योजनेसाठीची लोकवर्गणी ४० लाख रु पये बँकेत कसे जमा केले हा मोठा प्रश्न आहे. या योजनेसाठी ५ जुलै २०१४ पर्यंत २ कोटी ६६ लाख ९६३ रुपये सुप्रभात इन्फ्राझोन या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहेत. कामे न करता ठेकेदार कंपनीला जवळजवळ पूर्ण बिल अदा केल्याचे लक्षात आल्यावर सावंत यांनी तीनवीरा धरणाला १९ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तेथे योजनेमध्ये नमूद जलशुध्दीकण केंद्र व फिल्टर प्लँट ज्यासाठी सुमारे एककोटी रुपये सुप्रभात इन्फ्राझोन या ठेकेदार कंपनीला अदा करण्यातआले आहेत ती कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. ती सर्व छायाचित्रे केंद्रीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाकडे पाठविली असल्याचे सावंत यांनी सांगितले.योजनेतील जलशुध्दीकण केंद्र व फिल्टर प्लँटसारखी मूळ कामेच झाली नाहीत, असे असताना ही योजना पूर्ण झाली असल्याची खोटी नोंद केंद्र शासनाच्या वेबसाईटवर टाकणाºया जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता व उप अभियंता पाणीपुरवठा यांच्याविरुध्द शासन नियमानुसार फौजदारी प्रक्रि या सुरू करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.दरम्यान, या योजनेबाबत तक्र ार करण्यात आली आहे. योजनेमध्ये काही अनियमितता आढळल्यास ते पडताळून पाहिले जाईल, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भस्मे यांनी सांगितले.>पहिला हप्ता ८५ लाख १९ हजारपेयजल योजनेसाठी लोकवर्गणी म्हणून ४० लाख रुपये ग्रामसमितीच्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यात ८ एप्रिल २०१३ रोजी रोखीने भरण्यात आले.योजनेचा पहिला हप्ता ८५ लाख १९ हजार ९९५ रु पये २८/१०/२०१३ रोजी जमा झाल्यावर २/१२/२०१३ रोजी तेच ४० लाख रुपये या खात्यातून काढण्यात आल्याचे उघड झाले आहे.पाणीपुरवठा विभागात सावळागोंधळउमटे पाणीपुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी मांडले होते.यामध्ये ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे. त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही गठीत करण्यात आली आहे. ते प्रकरण ताजे असतानाच आता तीनवीरा धरणाबाबतचा प्रश्न पुढे आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये सावळागोंधळ असल्याचे अधोरेखित होते.